भीम अनुयायांच्या निर्धाराने ३ तासांत अतिक्रमण हटले ; जयंतीच्या प्रेरणेने प्रशासनाला जाग
जयंतीच्या प्रेरणेने प्रशासनाला जाग
बिलोली| डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बिलोलीत घडलेली अतिक्रमण हटवण्याची कारवाई ही केवळ प्रशासकीय कृती न राहता, सामाजिक जागृतीचा ठसा उमटवणारी घटना ठरली आहे. भीम अनुयायांच्या ठाम भूमिकेमुळे आणि महिलांच्या तीव्र सहभागामुळे अवघ्या तीन तासांत अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाला भाग पडले.
जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नागरिक एकवटले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अतिक्रमणाचा प्रश्न केवळ निवेदनांनी सुटला नव्हता; मात्र यावेळी महिलांनी ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनावर नैतिक दबाव निर्माण केला. त्यांच्या या शांततामय पण ठाम आंदोलनामुळे प्रशासनाला तात्काळ पावले उचलावी लागली.
शहरातील पोलीस स्टेशन समोरील, तहसील कार्यालयासमोरील, पंचायत समिती गेटसमोरील अतिक्रमण हटवणे पोलीस आणि प्रशासनाला जमले नाही. या पार्श्वभूमीवर आता नागरि...









