सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

भीम अनुयायांच्या निर्धाराने ३ तासांत अतिक्रमण हटले ; जयंतीच्या प्रेरणेने प्रशासनाला जाग

भीम अनुयायांच्या निर्धाराने ३ तासांत अतिक्रमण हटले ; जयंतीच्या प्रेरणेने प्रशासनाला जाग

सामाजिक
 जयंतीच्या प्रेरणेने प्रशासनाला जाग बिलोली| डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बिलोलीत घडलेली अतिक्रमण हटवण्याची कारवाई ही केवळ प्रशासकीय कृती न राहता, सामाजिक जागृतीचा ठसा उमटवणारी घटना ठरली आहे. भीम अनुयायांच्या ठाम भूमिकेमुळे आणि महिलांच्या तीव्र सहभागामुळे अवघ्या तीन तासांत अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाला भाग पडले. जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नागरिक एकवटले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अतिक्रमणाचा प्रश्न केवळ निवेदनांनी सुटला नव्हता; मात्र यावेळी महिलांनी ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनावर नैतिक दबाव निर्माण केला. त्यांच्या या शांततामय पण ठाम आंदोलनामुळे प्रशासनाला तात्काळ पावले उचलावी लागली. शहरातील पोलीस स्टेशन समोरील, तहसील कार्यालयासमोरील, पंचायत समिती गेटसमोरील अतिक्रमण हटवणे पोलीस आणि प्रशासनाला जमले नाही. या पार्श्वभूमीवर आता नागरि...
‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे १८ एप्रिलला नांदेडमध्ये उद्घाटन

‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ संगीतमय महानाट्याचे १८ एप्रिलला नांदेडमध्ये उद्घाटन

सामाजिक
नांदेड (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आणि चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ या संगीतमय महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता नांदेड येथील सायन्स कॉलेज मधील स्व. पुरणमलजी लाहोटी सभागृहात होणार आहे. या महानाट्याचे उद्घाटन नांदेडचे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या हस्ते होणार असून ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना संबोधित करणार आहेत. हैदराबाद येथील अभ्यूदय आर्टस् एकादमी प्रस्तुत या महानाट्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाची प्रभावी मांडणी हिंदी भाषेत करण्यात येणार आहे. या नाट्यात हैदराबादमधील २२ कलाकारांचा सहभाग असून त्यांनी देशभर विविध ठिकाणी प्रयोग सादर केले आहेत. या कार्यक्रमास सहयोग राशी कुपनधारक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थि...
समाज कल्याण कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

समाज कल्याण कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

सामाजिक
प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांचे आचरण जीवनात करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड| नांदेड येथील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देत बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांचे आचरण प्रत्यक्ष जीवनात करणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे,” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सामाजिक समता सप...
संकटात महिलांना आधार देणारे ‘सखी वन स्टॉप सेंटर’ ठरतंय जीवनदायी केंद्र

संकटात महिलांना आधार देणारे ‘सखी वन स्टॉप सेंटर’ ठरतंय जीवनदायी केंद्र

सामाजिक
नांदेड| महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर पीडितांना तातडीची व सर्वसमावेशक मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेले ‘सखी वन स्टॉप सेंटर’ हे नांदेडमध्ये महिलांसाठी सुरक्षित आधारस्थान ठरत आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय आणि राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून अत्याचारग्रस्त महिलांना कायदेशीर सल्ला, वैद्यकीय मदत, समुपदेशन तसेच सामाजिक व कौटुंबिक आधार एकाच छताखाली उपलब्ध करून दिला जातो. विशेष म्हणजे, गरजूंना तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधाही येथे दिली जाते. महात्मा फुले मार्केटजवळील महिला व बालविकास भवनात सुरू असलेले हे केंद्र २४ तास कार्यरत असून, अनेक महिलांना संकटातून बाहेर पडण्यासाठी याचा मोठा लाभ होत आहे. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, मानवी तस्करी किंवा आर्थिक शोषण अशा विविध प्रकारच...
जनगणना अचूकतेसाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – राहुल कर्डीले

जनगणना अचूकतेसाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – राहुल कर्डीले

सामाजिक
नांदेडमध्ये फील्ड ट्रेनर्स प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ नांदेड| आगामी जनगणना प्रक्रियेसाठी नांदेड जिल्ह्यात फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नागरिकांनी अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भारताची ही १६ वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे. विशेष म्हणजे ही जनगणना प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून त्यामुळे प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे. यामध्ये नागरिकांना ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वगणनेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. जनगणना ही संविधानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून देशाच्या विकास आराखड्याचा पाया आहे. यामधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध योजना, धोरणे आणि प...
सामाजिक समता सप्ताहांतर्गत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

सामाजिक समता सप्ताहांतर्गत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

सामाजिक
नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह-२०२६ अंतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी ९ वाजता महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, तालुका समन्वयक व समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना शुभेच्छा देताना मान्यवरांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समाजसुधारणेतील कार्याचा आढावा घेत प्रेरणादायी विचार मांडले. यानंतर समाज कल्याण कार्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक...
जंगलाची ‘काळी मैना’ ठरत असलेली चारोळी दुर्मिळ; आदिवासींच्या उपजीविकेवर परिणाम

जंगलाची ‘काळी मैना’ ठरत असलेली चारोळी दुर्मिळ; आदिवासींच्या उपजीविकेवर परिणाम

सामाजिक
नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार | संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या आदिवासी समाजाच्या जीवनात वनउपजांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांच्या दैनंदिन जगण्याला चव देण्याबरोबरच आर्थिक आधार देणाऱ्या या वनसंपदेमध्ये ‘चारोळी’ या फळाचे विशेष स्थान आहे. मात्र सध्या हीच चारोळी दुर्मिळ होत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात आढळणाऱ्या चारोळीला ग्रामीण भागात ‘जंगलाची काळी मैना’ असे संबोधले जाते. पूर्वी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे हे फळ आता हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर शहरातील नागरिकांना चारोळी पाहायलाही मिळणे कठीण झाले आहे. यामागे मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड, जंगलांचा घटता विस्तार आणि पर्यावरणातील बदल ही प्रमुख कारणे असल्याचे जाणकार सांगतात. जंगलांची होणारी सततची हानी ही केवळ जैवविविधतेसाठीच नव्हे, तर आदिवासींच्या पारंपरिक उपजीविकेसाठीही घातक ठर...
बिलोलीत कुंचनवार परिवार आणि शहर विकास कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने पाणपोई

बिलोलीत कुंचनवार परिवार आणि शहर विकास कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने पाणपोई

सामाजिक
बिलोली (प्रतिनिधी) कै.व्यंकटेश कुंचनवार यांच्या स्मरणार्थ आणि बिलोली शहर विकास कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने बिलोली शहरात जुन्या बसस्थानक परिसरात शुक्रवारी पाणपोईचे यंदाही मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गत 35 वर्षापासून ही पाणपोईची परंपरा जोपासली गेली आहे. शहर विकासाचा ध्यास घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून बिलोली शहर विकास कृती समिती काम करते. त्याच अनुषंगाने कै. व्यंकटेश कुंचनवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी पाणपोईचे स्टॉल लावून तहानलेल्यांची तृष्णा भागविली जाते. या सामाजिक कार्यास 35 वर्षाचा इतिहास आहे. हीच परंपरा यंदाही उष्णतेची तीव्रता पाहून आणि या मार्गावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना पिण्यास पाणी मिळावे या हेतूने कायम राखण्यात आली. बिलोली शहर विकास कृती समितीतर्फे शुक्रवारी जुना बस स्थानक परिसरात पाणपोईचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांच्...
लोहा तालुक्यातील भारसावडा गावात सामाजिक परिवर्तनाचा नवा आदर्श

लोहा तालुक्यातील भारसावडा गावात सामाजिक परिवर्तनाचा नवा आदर्श

सामाजिक, स्थानिक
लोहा| सामाजिक परिवर्तन केवळ विचारांपुरते न राहता कृतीत उतरवण्याचा प्रेरणादायी आदर्श लोहा तालुक्यातील भारसावडा गावाने घालून दिला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मांडलेल्या स्त्री-पुरुष समतेच्या विचारांना साजेसा निर्णय घेत धनुरे कुटुंबाने समाजासमोर नवा संदेश ठेवला आहे. भारसावडा (ता. लोहा) येथील संतोष सुभाष धनुरे (वय २४) यांचा सहा महिन्यांपूर्वी शीतल यांच्याशी विवाह झाला होता. संसार आनंदात सुरू असतानाच २१ मार्च रोजी परभणी जिल्ह्यातील राहटी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात संतोष यांचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातच शीतल या तीन महिन्यांच्या गर्भवती असल्याने परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली. या पार्श्वभूमीवर गावचे माजी सरपंच पप्पू पाटील हालगे यांनी पुढाकार घेत शीतल आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. त्यांनी संतोष यांचा धाकटा भाऊ राज...
कुंडलवाडीत थरारक घटना; क्रिकेटचा चेंडू आणताना 9 वर्षीय मुलगा विद्युत तारेने भाजला

कुंडलवाडीत थरारक घटना; क्रिकेटचा चेंडू आणताना 9 वर्षीय मुलगा विद्युत तारेने भाजला

सामाजिक
कुंडलवाडी | कुंडलवाडी शहरातील चुंगी नाका परिसरात क्रिकेट खेळताना घडलेल्या भीषण अपघातात एका 9 वर्षीय मुलगा गंभीर भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारच्या सुट्टीत अमेरखान सुलतान खान पठाण (वय 9) हा आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळताना चेंडू जवळच असलेल्या पत्र्याच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सवर जाऊन पडला. चेंडू आणण्यासाठी मुलगा वर चढला असता, वरून गेलेल्या उच्च दाब विद्युत ताऱ्यांच्या संपर्कात येऊन तो गंभीररीत्या जखमी झाला. विजेच्या धक्क्यामुळे त्याच्या कपड्यांना आग लागून तो जळू लागला. घटनेच्या वेळी परिसरातील एका तरुणाने प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कॉम्प्लेक्सवर चढून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी वर बारदानाची पोती फेकली, त्या सहाय्याने आग विझवण्यात आली. या घटनेत मुलगा गंभीर भाजला असून त्याला तातडीने नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आल...
error: Content is protected !!