लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

अनिलभाऊ मादसवार : निर्भीड पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा प्रवास

अनिलभाऊ मादसवार : निर्भीड पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा प्रवास

लेख
बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! हिमायतनगर : नांदेड जिल्ह्याच्या पत्रकारिता, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. अनिलभाऊ लक्ष्मणराव मादसवार. धाडसी पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी, माणुसकीची जाण आणि कोणत्याही परिस्थितीत जिद्दीने पुढे जाण्याचा स्वभाव यामुळे त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. निर्भीड पत्रकारितेचा धडाडीचा चेहरा - पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याची प्रक्रिया नसून समाजातील सामान्य माणसाचा आवाज बनण्याचे प्रभावी माध्यम आहे, या भूमिकेतून अनिलभाऊ मादसवार यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम केले आहे. कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता सत्य आणि जनहिताला प्राधान्य देण्याचा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास उल्लेखनीय आहे. नांदेड जिल्ह्यात डिजिटल पत्रकारितेचा विस्तार होण्याच्या ...
शेषराव मोरे : अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांचा निर्भीड विचारयात्री

शेषराव मोरे : अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांचा निर्भीड विचारयात्री

लेख
काही माणसे जन्माला येतात आणि काळाच्या प्रवाहाबरोबर वाहून जातात; काही माणसे मात्र काळाच्या प्रवाहालाच प्रश्न विचारतात. रूढ समजुतींच्या सुरक्षित चौकटीत न राहता, प्रस्थापित निष्कर्षांना धक्का देत, अप्रिय प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तिमत्त्वांची संख्या समाजात फार मोठी नसते. प्रा. डॉ. शेषराव मोरे हे अशाच अस्वस्थ करणाऱ्या, पण विचार करायला भाग पाडणाऱ्या वैचारिक परंपरेतील महत्त्वाचे नाव आहे. १७ ऑगस्ट १९४८ रोजी जन्मलेले शेषराव मोरे व्यवसायाने अभियंता; शिक्षणाने कायद्याचे पदवीधर; अध्यापनाने प्राध्यापक; आणि आयुष्याच्या पुढील टप्प्यात स्वतःला इतिहास, धर्म, समाज, राजकारण आणि राष्ट्रजीवनाच्या चिकित्सक अभ्यासाला वाहून घेतलेले लेखक-विचारवंत आहेत. नांदेड शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर नांदेडच्या वैचारिक भूम...
 *अमरनाथ गुहेतून* – भाग 16  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 *अमरनाथ गुहेतून* – भाग 16 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
आजच्या अंकात प्रवासात सोबत असलेल्या यात्रेकरुंच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. *सुभाष देवकत्ते* दिलीपभाऊंसोबतची ही माझी सलग अकरावी अमरनाथ यात्रा. प्रत्येक वर्षी त्यांच्यासोबत प्रवास करताना त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्याने उलगडत जाते. माझ्या दृष्टीने ते पर्यटन क्षेत्राचे भीष्म पितामह आहेत. आजवर त्यांनी विक्रमी २७ वेळा श्री अमरनाथचे दर्शन घेतले असून, प्रत्येक वेळी शेकडो भाविकांना सुरक्षित, सुखकर आणि संस्मरणीय यात्रा घडवून आणली आहे. एवढ्या मोठ्या यात्रेचे व्यवस्थापन करणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र कोणतेही संकट आले, अडचण निर्माण झाली किंवा परिस्थिती बदलली तरी दिलीपभाऊ कधीही गोंधळत नाहीत. शांत डोक्याने निर्णय घेऊन ते प्रत्येक प्रश्नावर सहज मार्ग काढतात. शंभराहून अधिक यात्रेकरूंचा संपूर्ण समूह ते अक्षरशः एकहाती सांभाळतात. प्रत्येकाची माहिती, प्रवासाचे वेळापत्रक, मुक्काम, जेवण, दर्शन, वाहतूक, आरो...
‘अमरनाथ गुहेतून’ – भाग १५  लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर

‘अमरनाथ गुहेतून’ – भाग १५ लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर

लेख
प्रवास संपला… पण नात्यांचा प्रवास अधिक दृढ झाला! तेरा दिवसांचा सहवास आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला होता. रेल्वे महाराष्ट्राच्या दिशेने धावत होती आणि प्रत्येक स्थानकासोबत प्रवासाची सांगता जवळ येत होती. मात्र या शेवटच्या दिवसातही प्रेम, आत्मीयता आणि सेवाभावाचा वर्षाव तितक्याच ओलाव्याने होत राहिला. पहाट सरून सकाळ झाली आणि रेल्वे भोपाळ स्थानकावर थांबली. तेथे माझे जुने स्नेही, उद्योगपती प्रदीप शुक्ला यांच्या परिवाराने पुन्हा एकदा आपुलकीची परंपरा जपली. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रतिभा शुक्ला स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह भरगच्च नाश्त्याची व्यवस्था करून स्थानकावर उपस्थित होत्या. पदार्थांची चव, मांडणी आणि प्रेमाचा स्पर्श इतका सुंदर होता की क्षणभर एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील नाश्त्याचा अनुभव घेत असल्याची भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली. प्रदीपजींशी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी रेल्वे...
‘अमरनाथ गुहेतून’ – भाग 14 (लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

‘अमरनाथ गुहेतून’ – भाग 14 (लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
*अखेरच्या टप्प्यातील अविस्मरणीय प्रवास* अमरनाथ यात्रेचा शेवट आता अगदी जवळ आला होता. दोन दिवसांनंतर प्रत्येकजण आपल्या घरी परतणार होता. मनात बाबा बर्फानींच्या दर्शनाचे समाधान होते, तर दुसरीकडे सहप्रवाशांचा सहवास संपणार याची हळवी जाणीवही होती.रात्रीच ठरल्याप्रमाणे पहाटे तीन वाजता सर्वांना वेकअप कॉल देण्यात आला. दिवसभराच्या धावपळीमुळे प्रत्येकाची झोप गाढ झाली होती, त्यामुळे कुणालाही उठवण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. सर्वांनी वेळेत तयारी केली आणि चार जणांनी मिळून एक ऑटो करत अमृतसर रेल्वे स्थानक गाठले. प्रत्येकी ऑटोचे २५० रुपये भाडे देऊन आम्ही वेळेआधीच स्टेशनवर पोहोचलो. सर्वांचे रेल्वे आरक्षण निश्चित असल्यामुळे कोणतीही धावपळ किंवा तणाव नव्हता. पहाटे पावणे पाच वाजता शताब्दी एक्सप्रेसने आमचा दिल्लीकडे प्रवास सुरू झाला. लुधियाना येथे नेहमीप्रमाणे सरदार कुलदीपसिंघ आमच्या स्वागतासाठी ह...
 अमरनाथ गुहेतून –  भाग 13 :   (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून –  भाग 13 :  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
कटरा ते अमृतसर… देशभक्ती, सहप्रवास आणि अविस्मरणीय क्षण काल वैष्णोदेवीचे दर्शन घेताना सर्व यात्रेकरूंनी अक्षरशः आपल्या क्षमतेची परीक्षा दिली होती. डोंगर चढणे, दर्शनासाठी रांगेत उभे राहणे आणि पुन्हा परतीचा प्रवास यामुळे जवळपास सर्वच जण थकले होते. म्हणूनच यावेळी मी मुद्दाम एक वेगळा निर्णय घेतला. अमृतसरला जाण्यासाठी बसेस नेहमीपेक्षा थोड्या उशिरा, म्हणजे दुपारी बारा वाजता बोलावल्या. सर्वांना रात्रीची झोप पूर्ण करता यावी आणि सकाळी निवांत उठता यावे, एवढाच त्यामागचा हेतू होता. पण सकाळी उठून पाहतो तर काय, बरेच जण सात वाजण्यापूर्वीच तयार! सीनियर सिटीजन कितीही म्हटले तरी त्यांच्या अंगची लवकर उठण्याची सवय काही जात नाही, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. आजच्या सकाळच्या नाश्त्याचे प्रायोजक होते उमरीचे भगवानशेठ आसवा. काही वर्षांपूर्वी ते आमच्यासोबत अमरनाथ यात्रेला आले होते. त्यांच्या वतीने सर्वांसाठी ...
बाबा… तुमच्यासाठी! : कुटुंब संस्थेच्या पुनर्जागरणातून संस्कारित राष्ट्रनिर्मितीचा संकल्प

बाबा… तुमच्यासाठी! : कुटुंब संस्थेच्या पुनर्जागरणातून संस्कारित राष्ट्रनिर्मितीचा संकल्प

लेख
"राष्ट्र संसदेत घडत नाही; ते प्रत्येक घरात घडते. आणि घर घडते ते आईच्या मायेने, वडिलांच्या त्यागाने आणि संस्कारांच्या अखंड परंपरेने." आज भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, अवकाश संशोधन, अर्थव्यवस्था आणि डिजिटल क्रांती यांमध्ये भारताने अभूतपूर्व प्रगती केली आहे. परंतु या विकासाच्या प्रवासात एक प्रश्न सातत्याने अस्वस्थ करतो—ज्यांच्या खांद्यावर उद्याचा भारत उभा राहणार आहे, त्या पिढीचे चारित्र्य कोण घडविणार? उत्तर स्पष्ट आहे—कुटुंब संस्था. कुटुंब ही केवळ रक्ताच्या नात्यांची चौकट नाही; ती संस्कृतीचा श्वास आहे, मूल्यांचे विद्यापीठ आहे आणि राष्ट्रनिर्मितीची पहिली प्रयोगशाळा आहे. म्हणूनच मानवी इतिहासात राज्य, न्याय, शिक्षण किंवा अर्थव्यवस्था यांच्याही आधी कुटुंब संस्थेचा जन्म झाला. मानवाने भटक्या जीवनातून स्थिर जीवनाकडे वाटचाल केली, शेतीचा...
 अमरनाथ गुहेतून – भाग 12  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून – भाग 12 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
“मातेच्या चरणी नतमस्तक… भैरवनाथाचे दर्शन आणि श्रद्धेचा अविस्मरणीय प्रवास!” - भवनाचे पहिले दर्शन होताच आमच्या सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. कित्येक तासांची चढाई, घामाने भिजलेले कपडे आणि दमलेले पाय क्षणात विसरून गेलो. समोर त्रिकूट पर्वताच्या कुशीत वसलेले माता वैष्णोदेवीचे पवित्र भवन तेजाने उजळून निघाले होते. हजारो भाविकांच्या मुखातून घुमणारा “जय माता दी”चा जयघोष संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. सुरक्षा तपासणी पूर्ण करून आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. अत्यंत शिस्तबद्ध व्यवस्था, स्वयंसेवकांचे मार्गदर्शन आणि भाविकांची संयमी शिस्त पाहून समाधान वाटले. अखेर तो बहुप्रतीक्षित क्षण आला. समोर मातेच्या तीन पवित्र पिंडींचे दर्शन होताच हात आपोआप जोडले गेले. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या त्या दिव्य रूपासमोर उभे राहून मी एकच प्रार्थना केली— “हे जगन्माते, माझ्या परिवारावर, सहप्रवाशां...
 अमरनाथ गुहेतून – भाग ११  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून – भाग ११ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
“जय माता दी”च्या जयघोषात… कटऱ्यापासून भवनापर्यंत श्रद्धेची अविस्मरणीय चढाई! - रात्रभराच्या प्रवासानंतर शरीराला विश्रांतीची गरज होती, पण मनाला मात्र झोप कुठे होती? कारण आजचा दिवस होता जगप्रसिद्ध माता वैष्णोदेवीच्या दर्शनाचा! बहुतेक हे माझे 31 वे माताराणी चे दर्शन असावे. बाबा बर्फानींच्या पवित्र गुहेत नतमस्तक झाल्यानंतर आता त्रिकूट पर्वतावर विराजमान असलेल्या जगन्मातेच्या चरणी माथा टेकविण्याचा योग आमच्या संपूर्ण परिवाराला लाभणार होता. पहाटे चार वाजताच हॉटेल ग्रँड शरणमध्ये प्रत्येक खोलीत हालचाल सुरू झाली. कुणी खोलीतील केटलमध्ये चहा बनवत होते, कुणी गरम पाण्याने स्नान करून तयार होत होते, तर कुणी एकमेकांच्या दरवाजावर टकटक करून, “चला… वेळ झाली!” अशी हाक देत होते. नऊ दिवसांपासून एकत्र राहिलेल्या या शंभर जणांच्या परिवारात आता औपचारिकतेचा लवलेशही उरला नव्हता. कोणाचे औषध कोणाकडे आहे, कोणाचा मोबाईल चार...
 अमरनाथ गुहेतून – भाग १०   (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून – भाग १०  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
दल सरोवराच्या लाटांवरून कटऱ्याच्या कुशीत… १०० यात्रेकरूंच्या आठवणींचा जिवंत प्रवास! - अमरनाथ यात्रा म्हणजे केवळ एका पवित्र गुहेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास नाही. ही यात्रा माणसांना जवळ आणते, अनोळखी चेहऱ्यांना मित्र बनवते आणि काही दिवसांतच शंभर वेगवेगळ्या व्यक्तींना एका विशाल कुटुंबात गुंफते. आज त्या कुटुंबाच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा दिवस उजाडला होता. आजचा दिवस माझ्यासाठी आणखी एका कारणाने खास होता. १९९७ साली मी, माझी पत्नी जयश्री आणि त्यावेळी अगदी लहान असलेल्या माझ्या मुली नेहा व पूजा यांनी काश्मिरी पोशाखात काढलेला एक फोटो मुलींनी आजही जपून ठेवला आहे. त्याच शैलीत पुन्हा एकदा फोटो काढण्याचा योग आज आला. त्या वेळी हातात बोट धरून चालणाऱ्या त्या दोन चिमुकल्या मुलींना आज प्रत्येकी दोन-दोन लेकरं आहेत. काळ इतक्या वेगाने पुढे निघून गेला, हे त्या क्षणी प्रकर्षाने जाणवले. काही क्षण कॅमेऱ्यात ब...
error: Content is protected !!