शेती

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

दोन-तीन वर्षांपासून गायगोठ्याचे अनुदान प्रलंबित; शहापूरचे शेतकरी आर्थिक संकटात

दोन-तीन वर्षांपासून गायगोठ्याचे अनुदान प्रलंबित; शहापूरचे शेतकरी आर्थिक संकटात

शेती
देगलूर /शहापूर,गंगाधर मठवाले | शासनाच्या गायगोठा योजनेअंतर्गत कामे पूर्ण करून दोन ते तीन वर्षांचा कालावधी उलटला असतानाही शहापूर येथील पाच शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने प्रलंबित गायगोठ्याचे अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक, मजूर आणि गरजूंसाठी शासनाकडून विविध योजनांची घोषणा करून त्यांची माहिती दिली जाते. या योजनांच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी नागरिक आवश्यक ती कामे पूर्ण करतात. मात्र, अनेकदा काम सुरू करण्यापूर्वी शासनाकडून कोणतीही रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशातून अथवा उसनवारी करून कामे पूर्ण करावी लागतात. याच पद्धतीने शहापूर येथील मुद्रिका भुमरेडी, भूपतवार यलरेडी भुमरेडी, चामावार प्रकाशरेडी हनमलू चितलवार, चंद्रकलाबाई चंदर इबितवार आणि गगामणी व्...
शहापूर येथे ड्रोनच्या सहाय्याने सोयाबीन पिकावर फवारणी

शहापूर येथे ड्रोनच्या सहाय्याने सोयाबीन पिकावर फवारणी

शेती
मजुरांची कमतरता, वेळेची बचत आणि अचूक फवारणी; शेतकरी गटाचा आधुनिक तंत्रज्ञानाकडे कल देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| खरीप हंगामात शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, शेतीच्या कामांसाठी मजुरांची दिवसेंदिवस जाणवणारी कमतरता आणि वाढलेली मजुरी यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या समस्येवर उपाय म्हणून शहापूर येथील शेतकरी गटाने तब्बल साडेपाच लाख रुपये खर्च करून ड्रोन मशीन खरेदी केली असून, त्याद्वारे सोयाबीन पिकावर फवारणी सुरू केली आहे. पारंपरिक पद्धतीने पिकांवर फवारणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. मात्र, ग्रामीण भागात मजुरांची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांना फवारणीसह निंदणी, कोळपणी ...
कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्याची आत्महत्या?  कुटुंबीयांचा दावा, अधिकृत तपास सुरू

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्याची आत्महत्या? कुटुंबीयांचा दावा, अधिकृत तपास सुरू

शेती
वारंगटाकळीतील शेतकरी चंद्रभान कदम यांनी विष प्राशन करून संपविले जीवन हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथील शेतकरी चंद्रभान दादाराव कदम (वय ६०) यांनी शेतातील विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) घडली. त्यांना तातडीने हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, चंद्रभान कदम हे शेतीच्या कर्जामुळे आर्थिक विवंचनेत होते. शासनाच्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी अनेकदा बँकेच्या फेऱ्या मारल्या तसेच सेतू केंद्रावर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र अद्याप कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने ते मानसिक तणावाखाली असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मृताचे पुत्र निवृत्ती कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जमाफीच्या प्...
हिमायतनगर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी; खरीप पिकांना जीवदान

हिमायतनगर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी; खरीप पिकांना जीवदान

शेती
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर शहर व तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा जोर गुरुवारी सकाळपासून वाढल्याने शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी काही दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या खरीप पिकांना या मुरवणी पावसामुळे नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात अधूनमधून सुरू असलेल्या मौसमी पावसामुळे खरीप पिकांची स्थिती सुधारत आहे. यंदा पिके चांगली उभी असली तरी अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र, सध्या सुरू असलेला पाऊस पिकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरत असल्याचे कृषी जाणकारांचे मत आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तरीही अद्याप तालुक्यात ...
केळी उत्पादकांच्या संतापाचा उद्रेक; भावघसरणीमुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव, बाजार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

केळी उत्पादकांच्या संतापाचा उद्रेक; भावघसरणीमुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव, बाजार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

शेती
नांदेड, प्रतिनिधी| केळीच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, न्याय्य भाव मिळावा आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीला आळा बसावा यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना बाजारात केळीला मिळणारा भाव मात्र कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चही निघत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा वाढला असून, केळी बागा टिकवणेही कठीण झाले आहे. यावेळी शेतकरी शिष्टमंडळाने केळी दर नियंत्रणासाठी स्वतंत्र जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी, व्यापारी आणि दलालांच्या व्यवहारात पारदर्शकता आणावी, तसेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी केली. शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले की, दर ठरविताना शे...
सोयाबीन बियाणे प्रकरणात सहा कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल

सोयाबीन बियाणे प्रकरणात सहा कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल

शेती
नांदेड| खरीप हंगाम 2026 मध्ये जिल्ह्यातील सोयाबीन बियाणे उगवण तक्रारी आणि प्रयोगशाळेत अप्रमाणित ठरलेल्या नमुन्यांच्या प्रकरणी सहा बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात यंदा 4 लाख 56 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी बियाणे निरीक्षकांनी तपासणी मोहीम राबवली होती. या मोहिमेत 751 सोयाबीन बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालात काही नमुने अप्रमाणित आढळून आले. तसेच बियाण्यांची उगवण न झाल्याबाबत प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पाहणी करण्यात आली. या पाहणीत बियाण्यांमध्ये दोष आढळल्याने संबंधित कंपन्यांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955, बियाणे अधिनियम, 1966, बियाणे नियम, 196...
पीक विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका – तालुका कृषी अधिकारी बिऱ्हाडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

पीक विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका – तालुका कृषी अधिकारी बिऱ्हाडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

शेती
नांदेड| प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६ अंतर्गत पीक विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या हप्त्याव्यतिरिक्त ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) चालकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये, असे आवाहन अर्धापूरचे तालुका कृषी अधिकारी श्री. बिऱ्हाडे यांनी केले आहे. पीक विमा अर्ज भरण्याची सुविधा ग्राहक सेवा केंद्रामार्फत विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील काही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालकांकडून प्रत्येक अर्जामागे सुमारे १०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. शासनाने विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेसाठी अतिरिक्त रक्कम आकारणे नियमबाह्य असून, शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही मागणीस बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. ३१ जुलै अंतिम मुदत - प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६ अंतर्...
लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १३ ऑगस्टपासून सुरुवात

लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १३ ऑगस्टपासून सुरुवात

शेती
फेरी-९ अंतर्गत राज्यभर लसीकरण; १ कोटी लसमात्रांचे वितरण सुरू नांदेड| राज्यातील पशुधनाचे लाळखुरकूत (एफएमडी) या घातक विषाणूजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे ‘लाळखुरकूत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-९’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला १३ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभर सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आयव्हीबीपी संस्थेकडून प्राप्त झालेल्या १ कोटी लसमात्रांचे शीत साखळीच्या माध्यमातून सुरक्षितपणे वितरण सुरू करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेच्या कोल्ड रूममध्ये लस साठवून ठेवण्यात आली असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत लस वेळेत पोहोचविण्याची कार्यवाही सुरू आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक लससाठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यानुसार उपलब्ध १ कोटी लस...
श्री मारोतीराया आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पावसाची दमदार सुरुवात

श्री मारोतीराया आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पावसाची दमदार सुरुवात

शेती
पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन; सुकत चाललेल्या खरीप पिकांना मिळाले जीवदान हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात आणि ठिकठिकाणी देवदेवतांना पावसासाठी घातलेल्या साकड्यानंतर शनिवारच्या रात्रीपासून तालुक्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली. श्री मारोतीराया आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पावसाची दमदार सुरुवात झाल्याची भावना शेतकरी व नागरिक व्यक्त करीत आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतातील खरीप पिके सुकू लागली होती. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पिके वाचविण्याची धडपड सुरू केली होती, तर बहुतांश शेतकरी आभाळाकडे डोळे लाव...
कर्तव्यतत्पर पशुवैद्यकीय सेवेला सलाम!

कर्तव्यतत्पर पशुवैद्यकीय सेवेला सलाम!

शेती
गोवंश तस्करीप्रकरणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्पर सेवा; घटनास्थळी उपचार व नमुने संकलित नांदेड, अनिल मादसवार| मौजे बोंढार तर्फे हवेली, ता. नांदेड परिसरात गोवंश तस्करी व कत्तलीच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाकडून संपर्क साधण्यात आल्यानंतर जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, नांदेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव तरपेवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दि. १८ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या घटनेत भूल देण्यात आलेल्या गोवंशावर डॉ. तरपेवाड यांनी तत्परतेने आवश्यक पशुवैद्यकीय उपचार केले. तसेच कत्तल करण्यात आलेल्या एका गोवंशाचे आवश्यक नमुने शास्त्रीय पद्धतीने संकलित करून पुढील तपासासाठी पोलिस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत संवेदनशीलता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावत पशुवैद्यकीय विभागाने केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. डॉ. राजीव तरपेवाड व त्य...
error: Content is protected !!