शेती

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

पोटा येथे शासन दरात खत वितरण; शेतकरी हिताच्या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक

पोटा येथे शासन दरात खत वितरण; शेतकरी हिताच्या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक

शेती
हिमायतनगर | तालुक्यातील मौजे पोटा नगरी येथील सत्यसाई कृषी सेवा केंद्रात शासन दरानुसार खत वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांनी भेट देऊन खत वितरणाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नागोरावजी शेंडगे (बापू), काँग्रेसचे आनंदराव ढवळे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर युवा तालुकाध्यक्ष परशुराम पाटील जाधव उपस्थित होते. त्यांनी शासन दरात आणि नियोजनबद्ध पद्धतीने होत असलेल्या खत वितरण उपक्रमाचे स्वागत करत शेतकरी हिताच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी कैलास माने पाटील यांचे जावई तथा सत्यसाई कृषी सेवा केंद्राचे संचालक शुभम ढुरे पाटील यांच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना शासन दरानुसार खताचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी ...
हिमायतनगरात दुर्मिळ घोरपडीचे दर्शन; वनविभागाच्या तत्परतेने जीव वाचला

हिमायतनगरात दुर्मिळ घोरपडीचे दर्शन; वनविभागाच्या तत्परतेने जीव वाचला

शेती
पत्रकार अनिल मादसवार यांच्या शेतातील कोठ्यात दबा धरून बसलेल्या घोरपडीची सुरक्षित सुटका हिमायतनगर | हिमायतनगर शहरालगतच्या पळसपूर रोडवरील शेतात दुर्मिळ घोरपड आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. पत्रकार अनिल मादसवार यांच्या शेतातील खत-बियाणे ठेवलेल्या कोठ्यात दबा धरून बसलेली घोरपड पाहताच त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे घोरपडीची सुखरूप सुटका करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतातील भडोळ्या बुजल्याने सरपटणारे प्राणी शेतीच्या आखाड्यात व कोठारांमध्ये आश्रय घेत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी गट क्रमांक ३ मधील शेतात पेरणीच्या तयारीत शेतकरी होते. बी बियाणे, खत काढल्यानंतर कोठ्यात दुर्मिळ घोरपड आढळून आली. याची माहिती मिळता...
शेतकऱ्यांची चिंता मिटली; यंदापासून सरकारी सहाय्यकच करणार पीक पेरा नोंदणी

शेतकऱ्यांची चिंता मिटली; यंदापासून सरकारी सहाय्यकच करणार पीक पेरा नोंदणी

शेती
१५ जुलैपासून राज्यभर मोहिमेला प्रारंभ; शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन नांदेड | सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना यापुढे स्वतः ई-पीक पाहणी करण्याची गरज भासणार नाही. गेल्या काही वर्षांत ई-पीक पाहणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि कमी प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने यंदापासून पीक पाहणीची जबाबदारी थेट शासन नियुक्त सहाय्यकांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर ही मोहीम १५ जुलैपासून सुरू होणार आहे. ई-पीक पाहणी ही शासकीय योजना, पीक कर्ज, पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पिकांची अचूक नोंद असल्यास शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे सुलभ होते. नवीन निर्णयानुसार तहसीलदारांमार्फत नियुक्त करण्यात आलेले विशेष सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी...
खरीप पेरणीची घाई टाळा; ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा : तालुका कृषी अधिकारी

खरीप पेरणीची घाई टाळा; ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा : तालुका कृषी अधिकारी

शेती
शेतकऱ्यांना शास्त्रोक्त नियोजनाचे आवाहन; बीज उगवण चाचणी व बीज प्रक्रिया करण्याचा सल्ला नांदेड | खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, अर्धापूर यांनी केले आहे. परिसरात किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, जेणेकरून जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होऊन बियाण्यांची उगवण चांगली होईल आणि पिकांच्या सुरुवातीच्या वाढीस पोषक वातावरण मिळेल, असे त्यांनी सांगितले. हवामानातील सातत्याने होत असलेले बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या हवामान आधारित सल्ल्याचे पालन करावे. योग्य वेळी पेरणी केल्यास पिकांवरील जोखीम कमी होण्यास मदत होते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बीज उगवण चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. बियाण्यांची उगवण क्षमत...
एल निनोच्या सावटाखाली खरीप हंगाम; शेतकऱ्यांना सावध पेरणीचा कृषी विभागाचा सल्ला

एल निनोच्या सावटाखाली खरीप हंगाम; शेतकऱ्यांना सावध पेरणीचा कृषी विभागाचा सल्ला

शेती
कमी पावसाच्या शक्यतेमुळे पीक नियोजन, आंतरपीक आणि जलसंधारणावर भर देण्याचे आवाहन नांदेड | यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असल्याने पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजनबद्ध शेती करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. कृषी विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय मुख्य पिकांची पेरणी टाळावी. किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करणे सुरक्षित ठरेल. अन्यथा उगवण कमी होऊन दुबार पेरणीचा आर्थिक फटका बसू शकतो. सोयाबीन उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना वाढते उत्पादन खर्च आणि हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी. तसेच...
पात्र शेतकऱ्यांनी आधार-अॅग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करावी

पात्र शेतकऱ्यांनी आधार-अॅग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करावी

शेती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रशासनाचे आवाहन नांदेड | राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आधार प्रमाणीकरण व अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक मोबाईलशी संलग्न करून आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शाहुराज हिरे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची वेळेत परतफेड करू शकले नाहीत. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ही योजना लागू केली असून, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर...
पेरणीपूर्वी बियाण्यांची चाचणी करा; दुबार पेरणीचे संकट टाळा

पेरणीपूर्वी बियाण्यांची चाचणी करा; दुबार पेरणीचे संकट टाळा

शेती
कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन, उगवण क्षमता तपासूनच पेरणीचा निर्णय घ्या नांदेड, अनिल मादसवार| खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांनी घरचे किंवा बाजारातून खरेदी केलेले बियाणे थेट पेरणीसाठी न वापरता त्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. कमी पाऊस, बदलते हवामान आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची गुणवत्ता तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यंदाच्या हंगामात पावसाचे अनिश्चित स्वरूप लक्षात घेता एकदाच योग्य पेरणी होणे महत्त्वाचे आहे. निकृष्ट किंवा कमी उगवणक्षम बियाण्यामुळे रोपांची संख्या घटते, दुबार पेरणीचा खर्च वाढतो आणि उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी साध्या पद्धतीने बियाण्यांची चाचणी करून त्यांचा दर्जा निश्चित करावा, असे कृषी विभागाने म्हटले आहे. गोण...
मृग नक्षत्र उलटले, तरी पावसाचा पत्ता नाही; शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे

मृग नक्षत्र उलटले, तरी पावसाचा पत्ता नाही; शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे

शेती
पेरणीची कामे रखडली : शेतकरी चिंतेत पाणीपातळी खालावण्यास सुरुवात : पशू-पक्ष्यांनाही फटका आभाळात ढगांची गर्दी, पण वरुणराजाची प्रतीक्षा अद्याप कायम हिमायतनगर/नांदेड, अनिल मादसवार| मृग नक्षत्र लागून तब्बल १५ दिवस उलटले तरी नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी शेतकरी चिंतेत असून पेरणीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. रविवार (दि. २१) पासून वातावरणात काहीसा बदल जाणवू लागला आहे. काही भागांत थंड तर काही ठिकाणी उष्ण वारे वाहत असून आकाशात पावसाळी ढगांची गर्दी दिसत आहे. सायंकाळच्या वेळी आभाळ दाटून येत असले तरी अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे "केव्हा बरसणार वरुणराजा?" हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाला सतावत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेताची मशागत पूर्ण करून...
हिमायतनगर तालुक्यात बोगस खत विक्रीचा संशय; शेतकऱ्यांनी सतर्क राहावे – वामनराव वडगावकर

हिमायतनगर तालुक्यात बोगस खत विक्रीचा संशय; शेतकऱ्यांनी सतर्क राहावे – वामनराव वडगावकर

शेती
ब्रँडेड नावाखाली बनावट खत विक्री? कृषी विभागाने चौकशी करावी अशी मागणी हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुका आणि शहर परिसरात काही ठिकाणी बोगस व निकृष्ट दर्जाच्या खतांची विक्री होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात येत असून शेतकरी बांधवांनी खत खरेदी करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी केले आहे. हिमायतनगर शहरातील काही कृषी बी -बियाणे व खत विक्रेते नामांकित आणि ब्रँडेड कंपन्यांच्या नावाखाली संशयास्पद खतांची विक्री करत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच पिकांच्या उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वामनराव वडगावकर यांनी शेतकऱ्यांना खत खरेदी करताना खताच्या पोत्यावरील कंपनीचे नाव, बॅच नंबर, उत्पादनाची माहिती आणि सील ...
जलसंधारणातून आर्थिक समृद्धीकडे; लोह्यातील शेतकऱ्याच्या ‘बांबू बेटा’ची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जलसंधारणातून आर्थिक समृद्धीकडे; लोह्यातील शेतकऱ्याच्या ‘बांबू बेटा’ची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

शेती
नांदेड | जलसंधारणाच्या कामातून पर्यावरण संवर्धनासह शाश्वत उत्पन्नाचा मार्ग कसा निर्माण होऊ शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण लोहा तालुक्यातील शेतकरी बालाजी कोटगीरे यांनी उभे केले आहे. त्यांच्या शेतावरील अभिनव ‘बांबू बेट’ प्रकल्पाची जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि या प्रयोगाची सविस्तर माहिती घेतली. सन २०२३ मध्ये उन्हाळ्यात कोटगीरे यांनी आपल्या शेतातील नाल्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण केले. सुमारे ५०० फूट लांबी, ५ फूट खोली आणि ८ फूट रुंदी असलेल्या नाल्यातून काढलेली माती दोन्ही बाजूंना टाकण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात ही माती पुन्हा नाल्यात वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून त्यांनी नाल्याच्या दोन्ही काठांवर ५ बाय ५ फूट अंतरावर आलोव्हेरी जातीच्या बांबूची लागवड करण्याचा निर्णय घेतला. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले...
error: Content is protected !!