महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

कृषी दिनानिमित्त सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण; राज्यभरात १५ दिवसांत वाटप पूर्ण होणार

कृषी दिनानिमित्त सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण; राज्यभरात १५ दिवसांत वाटप पूर्ण होणार

महाराष्ट्र
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व अधिकारी यांचा सन्मान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक वितरण; कृषी विभागात आनंदाचे वातावरण मुंबई | कृषी दिनानिमित्त कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, कृषिमंत्री दत्ता भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, फलोत्पादन मंत्री भारतशेठ गोगावले, प्रधान सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे आणि कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांच्या हस्ते हा वितरण सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष वसंत...
नांदेड रेल्वे परिसरात ५१ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प; वन महोत्सव २०२६ ला उत्साहात प्रारंभ

नांदेड रेल्वे परिसरात ५१ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प; वन महोत्सव २०२६ ला उत्साहात प्रारंभ

महाराष्ट्र, तेलंगणा
'एक पेड माँ के नाम' उपक्रमातून हरित महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल नांदेड, अनिल मादसवार| हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान, वन महोत्सव २०२६ आणि 'एक पेड माँ के नाम' उपक्रमांतर्गत नांदेड रेल्वे परिसरात तब्बल ५१ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषी दिनाचे औचित्य साधत सामाजिक वनीकरण विभाग, नांदेड आणि मंडळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी वन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा उपक्रम विभागीय वन अधिकारी संदीप चव्हाण आणि सहाय्यक वनसंरक्षक नितेश निघडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कल्याण राजू, मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. एम. के. श्रीनिवासा, तसेच रेल्...
नवतंत्रज्ञान व जोड व्यवसायातून शेतीची प्रगती साधा : संदीप माळोदे

नवतंत्रज्ञान व जोड व्यवसायातून शेतीची प्रगती साधा : संदीप माळोदे

शेती
जिल्हा परिषदेत कृषी दिन उत्साहात साजरा; पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव नांदेड| शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती अधिक उत्पादनक्षम करावी. तसेच पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्यव्यवसाय यांसारख्या जोड व्यवसायांची सांगड घालून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि पंचायत समिती, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कै. वसंतराव नाईक जयंती आणि कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संदीप माळोदे बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पूनम पवार, कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. अर...
हिमायतनगर तालुका कृषी विभागाच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप; निकृष्ट बियाणे, मार्गदर्शनाचा अभाव आणि विविध योजनांतील गैरव्यवहाराचे गंभीर आरोप

हिमायतनगर तालुका कृषी विभागाच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप; निकृष्ट बियाणे, मार्गदर्शनाचा अभाव आणि विविध योजनांतील गैरव्यवहाराचे गंभीर आरोप

शेती
कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे आर्थिक संकटात सापडून एखाद्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्यास जबादार कोण?? हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या निष्क्रिय कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निकृष्ट बियाणे, वेळेवर न मिळणारे अहवाल, मार्गदर्शन शिबिरांचा अभाव आणि शासकीय योजनांतील कथित गैरव्यवहारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळं तालुका कृषी अधिकारी व कृषी दुकानदार यांनी मिलिभगत करून शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारली गेली कि काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका कृषी अधिकारी व गुण नियंत्रण अधिकारी यांनी हिमाय...
नरसीप्रमाणे बिलोलीतही अतिक्रमण हटवा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

नरसीप्रमाणे बिलोलीतही अतिक्रमण हटवा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र
उपविभागीय अधिकाऱ्यांना नागरिकांचे निवेदन; प्रशासनाच्या दिरंगाईवर संतप्त सवाल बिलोली, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यातील नरसी (नायगाव) येथे अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने राबविलेल्या प्रभावी कारवाईच्या धर्तीवर बिलोली शहरातील वाढते अतिक्रमणही तातडीने हटविण्यात यावे, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, बिलोली यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नाकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, बिलोलीतील जुने पंचायत समिती कार्यालय, नवीन पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालयासमोरील मुख्य रस्ता तसेच शहरालगतच्या मालगुजारी (वमन) तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून, त्यामुळे वाहतूक, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर विपरीत परिणाम ...
किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात हदगावचा समावेश करू नका; दिव्यांग विकास संघर्ष समितीची मागणी

किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात हदगावचा समावेश करू नका; दिव्यांग विकास संघर्ष समितीची मागणी

महाराष्ट्र
प्रशासकीय बदलामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्यांचे हाल होतील – समीर पटेल नांदेड / हदगाव | नवनिर्मित किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात हदगाव तालुक्याचा समावेश करू नये आणि हा तालुका पूर्वीप्रमाणेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कायम ठेवावा, अशी ठाम मागणी दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला निवेदन सादर करून तीव्र आक्षेप नोंदविला. निवेदनात म्हटले आहे की, हदगाव तालुक्यात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि निराधार व्यक्तींची संख्या मोठी आहे. अशा नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, प्रमाणपत्रे, महसूल व इतर प्रशासकीय कामांसाठी वारंवार जिल्हास्तरीय कार्यालयात जावे लागते. हदगावहून किनवट हे अंतर मोठे असल्याने प्रवासासाठी अधिक वेळ आणि खर्च करावा लागणार असून त्य...
हदगाव वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड; ॲड. शिवकिरण भारती अध्यक्षपदी

हदगाव वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड; ॲड. शिवकिरण भारती अध्यक्षपदी

महाराष्ट्र
हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड उत्साहपूर्ण व सलोख्याच्या वातावरणात पार पडली. बिनविरोध झालेल्या या निवड प्रक्रियेत ॲड. शिवकिरण भारती यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीने वकिलांच्या हितसंवर्धनाबरोबरच न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. नवीन कार्यकारिणीत ॲड. दीपक आर. पवार यांची उपाध्यक्ष, ॲड. रेखा हिवराळे यांची महिला उपाध्यक्ष, ॲड. शिवराज फाळेगावकर यांची सचिव, ॲड. मारोती बनसोडे यांची सहसचिव, ॲड. रामदास डावरे यांची कोषाध्यक्ष, ॲड. अविनाश नरवाडे यांची विशिष्ट सहाय्यक (पुरुष) आणि ॲड. स्वरूपा भोसले यांची विशिष्ट सहाय्यक (महिला) म्हणून निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. दिगंबर कदम, ॲड. नवनाथ बाभळीकर, ॲड. एस. जे. तोष्णीवाल, ॲड. डी. एस. माने, ॲड. ए. एस. सावतकर आणि ॲड. ए. पी. राऊत यांची सर्वानुमते निव...
पोटा येथे शासन दरात खत वितरण; शेतकरी हिताच्या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक

पोटा येथे शासन दरात खत वितरण; शेतकरी हिताच्या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक

शेती
हिमायतनगर | तालुक्यातील मौजे पोटा नगरी येथील सत्यसाई कृषी सेवा केंद्रात शासन दरानुसार खत वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांनी भेट देऊन खत वितरणाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नागोरावजी शेंडगे (बापू), काँग्रेसचे आनंदराव ढवळे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर युवा तालुकाध्यक्ष परशुराम पाटील जाधव उपस्थित होते. त्यांनी शासन दरात आणि नियोजनबद्ध पद्धतीने होत असलेल्या खत वितरण उपक्रमाचे स्वागत करत शेतकरी हिताच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी कैलास माने पाटील यांचे जावई तथा सत्यसाई कृषी सेवा केंद्राचे संचालक शुभम ढुरे पाटील यांच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना शासन दरानुसार खताचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी ...
एकल महिला धोरणासाठी अभिप्राय नोंदवा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

एकल महिला धोरणासाठी अभिप्राय नोंदवा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

महाराष्ट्र
नांदेडमध्ये जिल्हास्तरीय कार्यशाळा; जिल्ह्यात 99,789 एकल महिलांची नोंद नांदेड | राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कायदेशीर सक्षमीकरणासाठी स्वतंत्र 'एकल महिला धोरण' तयार करण्यात येत असून, हे धोरण अधिक लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना व अभिप्राय लवकरात लवकर नोंदवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित घटक उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यातील सर्वेक्षणानुसार 99 हजार 789 एकल महिलांची नोंद झाली आहे. या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि सुविधा उपलब्ध क...
मुंबई–हैदराबाद ‘वंदे भारत स्लीपर’ रेल्वेसाठी खा. अशोकराव चव्हाण यांची मागणी

मुंबई–हैदराबाद ‘वंदे भारत स्लीपर’ रेल्वेसाठी खा. अशोकराव चव्हाण यांची मागणी

तेलंगणा, महाराष्ट्र
मनमाड–छत्रपती संभाजीनगर–नांदेड मार्गे सेवा सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना पत्र नांदेड | मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना अत्याधुनिक रेल्वे सेवेचा लाभ मिळावा, यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी मनमाड–छत्रपती संभाजीनगर–नांदेड मार्गे मुंबई–हैदराबाद 'वंदे भारत स्लीपर' रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले आहे. भारतीय रेल्वेकडून देशातील प्रमुख शहरांना 'वंदे भारत स्लीपर' सेवेद्वारे जोडण्याची तयारी सुरू असताना, या मार्गाचाही विचार व्हावा, अशी विनंती खा. चव्हाण यांनी केली आहे. पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, मनमाड–छत्रपती संभाजीनगर–नांदेड मार्गे मुंबई–हैदराबाद वंदे भारत स्लीपर सेवा सुरू झाल्यास मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आधु...
error: Content is protected !!