महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ बोधचिन्हाचे अनावरण

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ बोधचिन्हाचे अनावरण

महाराष्ट्र
मुंबई| नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)m उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (sunetra Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने देशव्यापी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. निवड प्रक्रियेनंतर तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे पुणे येथील सुमित काटे (Sumit Kate) यांना तीन लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक विजेते नोएडा येथील मयांक नायक (Mayank Nayak) यांना दोन लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमां...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी ८८४.७२ कोटींची नुकसानभरपाई मंजूर ; ४९९.६० कोटी वितरित

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी ८८४.७२ कोटींची नुकसानभरपाई मंजूर ; ४९९.६० कोटी वितरित

शेती
नांदेड| प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत खरीप हंगाम 2025-26 मध्ये सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ८८४.७२ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व ९३ महसूल मंडळे पात्र ठरली असून ६ लाख ३४ हजार ६२३ शेतकरी अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे ४ लाख ४४ हजार ८७९.३७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. दि. ७ मे २०२६ पर्यंतच्या अहवालानुसार सोयाबीन पिकासाठी निश्चित करण्यात आलेल्या ८८४.७२ कोटी रुपयांपैकी ४९९.६० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले असून ३८५.११ कोटी रुपये अद्याप प्रलंबित आहेत. विमा कंपनीच्या अद्ययावत माहितीनुसार सोयाबीन, मुग, उडीद, तूर आणि खरीप ज्वारी या पिकांसाठी मंजूर नुकसानभरपाईची एकूण रक्कम ८८८.६७ कोटी रुपये आहे. त्यापैकी ५०२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून...
हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छतेबाबत रेल्वे प्रशासनाची भूमिका स्पष्ट

हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छतेबाबत रेल्वे प्रशासनाची भूमिका स्पष्ट

महाराष्ट्र, तेलंगणा
नांदेड| हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेश व निर्गमन मार्गांजवळ विखुरलेला कचरा आणि अस्वच्छतेबाबत अलीकडे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. स्थानकाबाहेरील परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेची नोंद घेण्यात आली असून, हुजूर साहिब नांदेड हे शहराचे महत्त्वाचे प्रवेशद्वार तसेच प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने परिसराची स्वच्छता आणि चांगली प्रतिमा राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. ज्या ठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे ती ठिकाणे रेल्वेच्या अधिकारक्षेत्राबाहेर असून संबंधित नागरी प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात येतात, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र प्रवासी व नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित महानगरपालिका प्रशासनाशी रेल्वे अधिकाऱ्यांचा...
उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर नांदेड–निजामुद्दीन विशेष रेल्वेची घोषणा

उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर नांदेड–निजामुद्दीन विशेष रेल्वेची घोषणा

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड| उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने नांदेड–निजामुद्दीन–नांदेड दरम्यान विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे आदिलाबाद, पिंपळखुट्टी, नागपूर, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी आणि आग्रा कॅन्ट मार्गे धावणार असून दिल्लीकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे. गाडी क्रमांक 07660 नांदेड–निजामुद्दीन विशेष रेल्वे दिनांक 22 मे 2026 रोजी नांदेड येथून सकाळी 6.35 वाजता सुटेल. ही गाडी आदिलाबाद (10:00), नागपूर (15:55), राणी कमलापती (00:10), वीरांगना लक्ष्मीबाई झाशी (06:00), आग्रा कॅन्ट (10:45) मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी 2.30 वाजता निजामुद्दीन येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 07661 निजामुद्दीन–नांदेड विशेष रेल्वे दिनांक 25 मे 2026 रोजी निजामुद्दीन येथून रात्री 1.25 वाजता सुटेल. ही गाडी...
ओखा–मदुराई विशेष रेल्वे आता नियमित “ओखा–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस” म्हणून धावणार

ओखा–मदुराई विशेष रेल्वे आता नियमित “ओखा–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस” म्हणून धावणार

महाराष्ट्र, तेलंगणा
नांदेड| पश्चिम रेल्वेने सध्या धावणारी गाडी क्रमांक 09520/09519 ओखा–मदुराई–ओखा विशेष साप्ताहिक रेल्वे नियमित करण्यात आली असून ती आता गाडी क्रमांक 19560/19559 ओखा–तिरुपती–ओखा साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. या निर्णयामुळे गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक नियमित व सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. गाडी क्रमांक 19560 ओखा–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस ओखा येथून 11 मे 2026 पासून दर सोमवारी रात्री 11.35 वाजता सुटणार असून द्वारका, जामनगर, राजकोट, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, बासर, निजामाबाद, काचेगुडा, गडवाल, कर्नुल सिटी आणि ढोणे मार्गे बुधवारी रात्री 11.30 वाजता तिरुपती येथे पोहोचणार आहे. तसेच गाडी क्रमांक 19559 तिरुपती–ओखा साप्ताहिक एक्सप्रेस तिरुपती येथून 14 मे 2026 प...
जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट; विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट; विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी

महाराष्ट्र
नांदेड| जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमवारी (दि. 12 मे) अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी महसूल विभागासह पंचायत समिती, गट विकास अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, रोजगार हमी योजना विभाग, पुरवठा विभाग, उपकोषागार कार्यालय आणि भूमि अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तहसील कार्यालयात त्यांनी महसूल विभागातील विविध कार्यासनांना भेट देत प्रत्येक विभागाच्या जाबचार्टची तपासणी केली. तसेच ‘आरटीएस’ अंतर्गत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांची पडताळणी करून प्रलंबित प्रकरणे नसल्याची खात्री केली. अभिलेख कक्षालाही भेट देऊन अभिलेखांच्या नक्कल वितरण प्रक्रियेची पाहणी करत कामकाज अधिक सुलभ व प्रभावी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी तहसील कार्यालयाच्या सभागृहात शासकीय जमिनींच्या अभिलेख ...
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली : 7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली : 7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड

महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्ये यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. 9 मे 2026 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद, एन.आय. अॅक्ट प्रकरणे, नांदेड वाघाळा महानगरपालिका मालमत्ता कर प्रकरणे, गुन्हा कबुली प्रकरणे, आरटीओ व रेल्वे पोलीस विभागाची प्रकरणे, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बँक व फायनान्स कंपनी प्रकरणे, पंचायत समिती कर वसुली, बीएसएनएल व एमएसईडीसीएल कंपनीची प्रकरणे आदी विविध प्रकारच्या प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. यासाठी जिल्ह्यात एकूण 30 पॅनल तयार करण्य...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हिमायतनगर तालुक्यात ग्रामपंचायतींचे मूल्यमापन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हिमायतनगर तालुक्यात ग्रामपंचायतींचे मूल्यमापन

महाराष्ट्र
लोकाभिमुख कामांची समितीकडून पाहणी; विविध योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा हिमायतनगर | मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हिमायतनगर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात आलेल्या लोकाभिमुख योजनांचे मूल्यमापन तालुका स्तरीय समितीकडून करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने ८ मे २०२६ रोजी हिमायतनगर पंचायत समिती अंतर्गत विविध ग्रामपंचायतींना भेट देत विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या समितीत सहायक गटविकास अधिकारी अनिलकुमार विसावे (भुसावळ), विस्तार अधिकारी संजोग भारती, केंद्रप्रमुख गोपाल नारायण पाटील, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण सपकाळे, सय्यद इकलास तसेच पत्रकार गोपीचंद सुरवाडे यांचा समावेश होता. समितीने बोरगडी, करंजी, सिरंजनी, सरसम पोटा (बु.) आणि टेंभी या ग्रामपंचायतींमधील विकासकामा...
नांदेडमध्ये जलसंधारण कामांना वेग

नांदेडमध्ये जलसंधारण कामांना वेग

शेती
379 पैकी 177 कामे पूर्ण; भूजल वाढीसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा नांदेड | एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली मृद व जलसंधारण विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या एकूण ३७९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी १७७ कामे पूर्ण झाली असून २०२ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत १ लाख ७८ हजार ६६८ मीटर खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून आणखी ८६ हजार ५८३ मीटर खोलीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या कामांमुळे पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचून होणारे नुकसान कमी होणार असून भूजल पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. परिणामी पाणीटंचाई निवा...
पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग

पाणी टंचाई निवारणासाठी इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा : जलसंपदा विभाग

महाराष्ट्र
नांदेड | नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. संबंधित गावांतील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व नियोजनपूर्वक करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने नागरिकांना कालवे व नाल्यांमधून बेकायदेशीर पाणी उपसा (पंपिंग) न करण्याचे तसेच पाण्याची नासाडी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्व गावांपर्यंत पाणी पोहोचविणे सोयीचे होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणीटंचाई निवारणासाठी विभाग कटिबद्ध असून उर्वरित पाण्याचे नियोजन वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे. ३० मार्च २०२६ च्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यासाठी ३.०० दलघमी पाणी मंजूर करण्यात आले आहे. त...
error: Content is protected !!