महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मंगरूळमधील नागरिक त्रस्त
जीवितहानीची वाट पाहताय का?
हिमायतनगर | तालुक्यातील मौजे मंगरूळ गावातील विद्युत समस्यांकडे महावितरण प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, एखाद्याचा जीव गेल्यानंतरच उपाययोजना केली जाणार का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मंगरूळ येथील रहिवासी गंगाधर पुंजाराम पांडलवाड यांनी उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभागीय कार्यालय हिमायतनगर यांच्याकडे विविध विद्युत कामांसंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला आहे.
पांडलवाड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ऑक्टोबर 2025 पासून संबंधित कामांसाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, आजपर्यंत कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत 16 एप्रिल रोजी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनासही बाब आणून द...









