महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा 7 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान नांदेड दौरा जाहीर

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा 7 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान नांदेड दौरा जाहीर

महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती 7 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून विविध शासकीय विभागांच्या कामांची पाहणी करणार आहे. या दौऱ्यात समिती विविध प्रकल्प, योजना आणि कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. मंगळवार, 7 एप्रिल 2026 - रात्री: शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे मुक्काम बुधवार 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथील संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यां समवेत चर्चा. सकाळी 9.30 ते 10 वाजेपर्यंत समितीची अंतर्गत बैठक- विविध विभागाचे प्रकल्प, कामे, योजना कार्यालयांना भेटी पाहणी व बैठकी संदर्भात नियोजन करणे. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी ...
भोंदूगिरी प्रकरणावर माकप आक्रमक; ३९ आमदारांच्या राजीनाम्याची मागणी, नांदेडमध्ये तीव्र आंदोलन

भोंदूगिरी प्रकरणावर माकप आक्रमक; ३९ आमदारांच्या राजीनाम्याची मागणी, नांदेडमध्ये तीव्र आंदोलन

महाराष्ट्र
नांदेड| राज्यातील काही आमदार, मंत्री व अधिकाऱ्यांनी भोंदूगिरीला शरण जाऊन तंत्र-मंत्राच्या नावाखालील प्रकारांना पाठबळ दिल्याचा गंभीर आरोप करत, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ३९ आमदारांची यादी जाहीर करून त्यांचे तात्काळ राजीनामे घ्यावेत, तसेच अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माकपच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी सोमवार (दि. ६ एप्रिल) रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. माकपने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे निवेदन सादर केले. माकपच्या नेत्यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींवर संविधानाने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. मात्र, काही जण अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत असल्याने समाजात चुकीचे संदेश जात आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक ...
रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर

रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड/हिंगोली| मराठवाड्यातील तिरुपती बालाजी भक्तांसाठी थेट आणि सोयीस्कर रेल्वे सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी रायलसीमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील भाविकांना तिरुपतीला जाण्यासाठी थेट रेल्वे पर्याय अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे प्रवास करताना अनेकदा बदल करावे लागतात, ज्यामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढतात. विशेषतः वयोवृद्ध आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्या भक्तांसाठी ही बाब अधिक त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी हजारो भाविक तिरुपतीला दर्शनासाठी जात असल्याने, या भागातून थेट रेल्वे सेवा सुरू होणे ही दीर्घकालीन गरज बनली आहे. रायलसीमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार झाल्यास प्रवाशांना अधिक सु...
RPF चा धाडसी पराक्रम; परभणीत प्रवाशाचा जीव वाचवला, सेलूत हरवलेली पर्स परत

RPF चा धाडसी पराक्रम; परभणीत प्रवाशाचा जीव वाचवला, सेलूत हरवलेली पर्स परत

महाराष्ट्र
नांदेड (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) जवानांनी आपल्या तत्परतेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा उत्कृष्ट नमुना सादर करत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रवाशांचा जीव व मालमत्ता वाचवून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. परभणी रेल्वे स्थानकावर ५ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेत, गाडी क्रमांक १२७८८ नागरसोल–नरसापूर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येत असताना एक प्रवासी गाडीत चढताना अचानक घसरून प्लॅटफॉर्म आणि गाडीमधील धोकादायक फटीत अडकला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हेड कॉन्स्टेबल मोगरे पद्माकर यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत त्या प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. सदर प्रवासी शेख मोहम्मद हे परभणी ते नांदेड प्रवास करत होते. दरम्यान, ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत दुसऱ्या घटनेत सेलू रेल्वे स्थानकावर हरवलेली पर्स परत मिळवून देण्यात...
हिमायतनगरात शिवाजी महाराज पुतळा जागेसाठी आंदोलन तीव्र; ‘गाव बंद’चा इशारा..!

हिमायतनगरात शिवाजी महाराज पुतळा जागेसाठी आंदोलन तीव्र; ‘गाव बंद’चा इशारा..!

महाराष्ट्र
हिमायतनगर अनिल मादसवार | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी नगरपंचायत समोर सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी अधिकच तीव्र झाले असून, शहरातील वातावरण तापू लागले आहे. उपोषणकर्ते माधव शिंदे यांनी “जागा मिळेपर्यंत माघार नाही” असा निर्धार व्यक्त केला असून, आंदोलनस्थळी जमलेल्या समर्थकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, तातडीने जागा उपलब्ध करून दिली नाही तर सर्व समाजाला सोबत घेऊन गाव बंद आंदोलन छेडण्यात येईल. दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने यापूर्वी सुचविलेल्या पाचही जागांपैकी एकही जागा देऊ शकत नसल्याचे पत्र दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयामुळे उपोषणकर्त्यांची एकप्रकारे अवहेलना झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी नगरपंचायत प्रशासनाच्या काही अधिकाऱ्याने भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी उपोषणकर्त्याने जोपर्यंत जाग...
नांदेड रेल्वे विभागाची कामगिरी उजळली; वेळेचे पालन व प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा

नांदेड रेल्वे विभागाची कामगिरी उजळली; वेळेचे पालन व प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा

महाराष्ट्र
नांदेड | दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत नांदेड विभागाच्या संचालन (ऑपरेटिंग) विभागाने आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये वेळेचे काटेकोर पालन, कार्यक्षम संचालन आणि प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. विभागाने गाड्यांची वेळ अचूक ठेवणे, वहन क्षमता वाढवणे आणि प्रवाशांच्या सोयी सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले. वेळेच्या अचूकतेत मोठी झेप या वर्षात मेल/एक्सप्रेस गाड्यांनी तब्बल ३९ वेळा १०० टक्के समयपालन साध्य केले, तर मागील वर्षी ही संख्या केवळ ४ होती. प्रवासी गाड्यांनी ४८ दिवस १०० टक्के समयपालन नोंदविले, जे मागील वर्षी २३ दिवस होते. तसेच मेल/एक्सप्रेस व प्रवासी गाड्यांनी मिळून १२ दिवस १०० टक्के समयपालन साध्य केले, जे मागील वर्षी फक्त १ दिवस होते. वेगवाढीमुळे सेवा अधिक विश्वासार्ह संचालन कार्यक्षमता वाढविण्यासाठी ३८६ किलोमीटर मार्गावर गाड्यांचा वेग १०० किमी प्रतितासवरून ११० किमी प्रतितासपर्...
दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी तीव्र

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी तीव्र

महाराष्ट्र
नांदेड | मंत्रालय मुंबई येथील दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी करण्यात आलेली बदली रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सकल दिव्यांग संघटना, नांदेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात निवेदन देत तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, ही बदली नियमबाह्य असून लाखो दिव्यांगांवर अन्याय करणारी आहे. तुकाराम मुंढे हे कर्तव्यदक्ष व भ्रष्टाचारविरोधी अधिकारी असून त्यांनी दिव्यांग कल्याण विभागात सुरू असलेल्या गैरप्रकारांवर आळा घालण्याचे काम अल्पावधीतच सुरू केले होते. दिव्यांग योजनांच्या नावाखाली काही बोगस लाभार्थी, बनावट कर्मचारी व संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या निधीची लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केल्यामुळेच काही संस्थाचालक व प्रभावशाली व्यक्तींनी दबाव टाक...
अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश

अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश

शेती
नांदेड| अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान सहन करणाऱ्या अर्धापूरमधील १०२ शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत रोजगार हमी योजना विभागाला कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी अतिवृष्टीमुळे खचल्या किंवा बुजल्या होत्या. शासनाच्या विशेष मदत पॅकेजअंतर्गत मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज व पंचनामे पूर्ण केले होते. मात्र ‘मनरेगा’ योजना ग्रामीण भागापुरती मर्यादित असल्याने केवळ तांत्रिक कारणामुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. या अन्यायकारक परिस्थितीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण (Shrijaya Chavan) यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लक्ष वेधले. “नुकसान समान असताना केवळ प्र...
बांधकाम कामगारांसाठी योजना मोफत; दलालांपासून सावध राहा – प्रशासनाचा इशारा

बांधकाम कामगारांसाठी योजना मोफत; दलालांपासून सावध राहा – प्रशासनाचा इशारा

महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ आता पूर्णपणे मोफत मिळत असून, कामगारांनी अनधिकृत एजंटांच्या जाळ्यात अडकू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध योजनांसाठी अर्ज प्रक्रिया MAHABOCW.IN या अधिकृत संकेतस्थळावरून केली जाते. या संकेतस्थळावरील सर्व सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहेत. मात्र, काही दलाल व मध्यस्थ कामगारांकडून अर्ज भरण्याच्या नावाखाली पैसे उकळत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही एजंटला पैसे देऊ नयेत. अर्ज स्वतः किंवा अधिकृत सेवा केंद्र (CSC / सेतू केंद्र) मार्फतच करावा. लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, तसेच आधार, बँक तपशील व OTP यांसारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. दरम्यान, काम...
पोलिसांचा लातूरमध्ये धडाकेबाज छापा; 13 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

पोलिसांचा लातूरमध्ये धडाकेबाज छापा; 13 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

क्राइम, महाराष्ट्र
नांदेड/लातूर| अवैध गुटखा विक्रीवर मोठा आघात करत पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने लातूर जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई करत तब्बल 13 लाख रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या गुटखा विरोधी मोहिमेनंतरही काही विक्रेते गुपचूप व्यवसाय सुरू ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 1 एप्रिल रोजी वडवणा (ता. अहमदपूर) येथे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या वेळी एका मारुती इर्टिगा वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनासह सुमारे 6 लाख 24 हजारांचा गुटखा जप्त केला, तसेच एका खासगी कंपनीची सुमारे 13 लाख 24 हजार रुपये किमतीची कारही ताब्यात घेतली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहि...
error: Content is protected !!