शेती

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

खत टंचाई, लिकिंग व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर धडक तपासणी

खत टंचाई, लिकिंग व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची कृषी सेवा केंद्रांवर धडक तपासणी

शेती
नांदेड, अनिल मादसवार| खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा सुरळीत व योग्य दरात पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड शहरातील कृषी सेवा केंद्रांवर अचानक धडक तपासणी केली. नवीन मोंढा परिसरातील वसुंधरा फर्टीलायझर्स तसेच श्री फर्टीलायझर्स कृषी सेवा केंद्र येथे भेट देत त्यांनी साठा, विक्री प्रक्रिया आणि नोंदींची सखोल पडताळणी केली. तपासणीदरम्यान विक्रेत्यांचे परवाने, साठा रजिस्टर, ई-पॉस मशीन यांची पाहणी करण्यात आली. प्रत्यक्ष साठा आणि ई-पॉसवरील आकडे जुळतात का, याची खात्री करण्यात आली. तसेच खत विक्रीची बिले तपासून शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष खरेदी केली आहे का, याचीही पडताळणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की, ई-पॉस मशीनशिवाय खत विक्री करू नये, कृत्रिम टंचाई निर्माण करू नये आणि साठेबाजी टाळावी. युरिया व डीएपी खतांच्या विक्रीवर विशेष लक्...
नांदेड पिक विमा योजनेअंतर्गत ८१३.९३ कोटींची नुकसानभरपाई; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

नांदेड पिक विमा योजनेअंतर्गत ८१३.९३ कोटींची नुकसानभरपाई; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

शेती
नांदेड, अनिल मादसवार| जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली असून प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२५ मधील पिक नुकसानीसाठी तब्बल ८१३.९३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. या रकमेचे वितरण २१ एप्रिल २०२६ पासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सुरू झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील ४ लाख ३४ हजार ८१९ शेतकऱ्यांनी एकूण ८ लाख २९ हजार ७३७ विमा अर्ज दाखल केले होते. सुमारे ५ लाख १३ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला होता. मात्र ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ७ लाख २७ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीत सोयाबीन, मुग आणि उडीद या पिकांचा सर्वाधिक फटका बसला. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत उंबरठा उत्पादनाच्या आधारे नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली असून सो...
 १९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा सेवा औषधोपचार

 १९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा सेवा औषधोपचार

लेख, शेती
वर्षभरात ४,०१,९९२ कॉल्स, ३.७८ लाख तक्रारींचे निवारण दुर्गम भागातील ३४९७९ पशुपालकांना लाभ  'गोल्डन अवर' मधून ६४७५९ पशुधनाला जीवदान  पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. जनावरांचे आरोग्य धोक्यात आले की, शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडते. मात्र, आता अद्ययावत तंत्रज्ञान आणि १९६२ मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना मोठा आधार मिळाला आहे. या सुविधेमुळे केवळ उपचारांमधील वेळच वाचला नाही, तर दुर्गम भागातील हजारो पशुधनास वेळेत 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. '1962 कॉल सेंटर' आणि मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्यातील तांत्रिक समन्वयामुळे पशुपालकांना आपल्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत, जे ग्रामीण समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. वर्षभरात या कॉल सेंटरकडे एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणज...
दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अनेक संधी ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

दुग्धव्यवसायात निर्माण होणार उद्योजकतेच्या अनेक संधी ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

रोजगार/सरकारी योजना, शेती
पुणे| महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धन विभागाचा महत्त्वपूर्ण वाटा असून राज्याच्या एकूण उत्पन्नात या क्षेत्राचा सुमारे २.८ टक्के, तर कृषी उत्पन्नात तब्बल २५.१ टक्के वाटा आहे. वाढती लोकसंख्या, वाढणारी श्रमशक्ती आणि दुधाची वाढती मागणी लक्षात घेता ग्रामीण युवकांसाठी दुग्धव्यवसायात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरत आहे. दुग्ध उत्पादनात वाढीची मोठी संधी - सध्या महाराष्ट्र दुग्ध उत्पादनात देशात पाचव्या क्रमांकावर असून राज्याचे वार्षिक उत्पादन १६.६२ MMT आहे. मात्र, प्रति व्यक्ती आवश्यक ३५८ ग्रॅम दुधाच्या तुलनेत सध्या केवळ ३०० ग्रॅम उपलब्धता आहे. ही तूट भरून काढण्यासाठी दुग्धव्यवसायात मोठी संधी निर्माण झाली आहे. उद्योजकतेकडे वाटचाल - पारंपारिक शेतीपूरक व्यवसाय म्हणून पाहिल्या जा...
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

शेती
'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा' तयार करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो' (El-Nino) या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी व संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व तातडीचे निर्देश दिले आहेत. राज्यात सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याची ४३.९८% तर सुक्या चाऱ्याची २५.१२% तूट असते. 'एल-निनो'मुळे पाऊस कमी झाल्यास ही तूट वाढण्याची भीती आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने 'जिल्हा नियोजन व विकास समिती' अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीसाठी निधीला प्राधान्य द्यावे. बियाणांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या चारा बियाणांचे का...
पालकमंत्र्यांकडून विविध योजनांचा आढावा; शेतकरी हित, आरोग्य सेवा व निधी वापरावर भर

पालकमंत्र्यांकडून विविध योजनांचा आढावा; शेतकरी हित, आरोग्य सेवा व निधी वापरावर भर

शेती
नांदेड(प्रतिनिधी) जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेतला. यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, आयुष्यमान भारत कार्ड योजना, पाटबंधारे विभागाचे प्रकल्प तसेच जिल्हा नियोजन निधीच्या विनियोगाचा समावेश होता. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शेतकरी हिताला प्राधान्य बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. शासनाचे धोरण शेतकरी हिताला प्राधान्य देणारे असून त्यांच्य...
पशुपालकांसाठी मोठी संधी; ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’मधून ३ लाखांपर्यंत कर्ज

पशुपालकांसाठी मोठी संधी; ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’मधून ३ लाखांपर्यंत कर्ज

शेती
नांदेड| राज्यातील पशुपालकांना आर्थिक बळ देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ (KCC) योजना राबविण्यात येत असून, या अंतर्गत ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन व वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायी ठरत आहे. या योजनेत ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण मिळू शकते. दूध संस्थेची हमी असल्यास ही मर्यादा ३ लाखांपर्यंत वाढवता येते. तसेच आधीच KCC असलेल्या शेतकऱ्यांनाही पतमर्यादा वाढवून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. कर्जाचा मूळ व्याजदर ९ टक्के असला, तरी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ३ टक्के व राज्य शासनाकडून ४ टक्के अशी एकूण ७ टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळते. याशिवाय बँकांकडून २ टक्के सवलत मिळाल्यास प्रभावी व्याजदर शून्य टक्क्यां...
पाणी आवर्तन तात्काळ सुरू करा; शेतकरी संघर्ष समितीचा इशारा

पाणी आवर्तन तात्काळ सुरू करा; शेतकरी संघर्ष समितीचा इशारा

शेती
नांदेड/हदगाव (प्रतिनिधी ) हदगांव तालुक्यातील तसेच हिमायतनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांवर पाण्याअभावी संकट कोसळले असून, गुराढोरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हदगाव तहसीलदार तसेच उर्ध्व पैनगंगा पाटबंधारे विभाग क्र. ४ यांना निवेदन देत पाण्याचे आवर्तन तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ चार दिवस पाणी सोडून नंतर पुन्हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. “धरणात पाणी असूनही आमच्या शेतात येत नाही,” अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. यावेळी निवेदन देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात गेल्यावर एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. “कार्यालयात अधिकारी कधी येतात, कधी जातात याचा पत्ता नाही. संपूर्ण कारभार ‘रामभरोसे’ स...
प्रशासकीय अनास्था; हदगावमध्ये शेतकरी व रुग्ण वाऱ्यावर

प्रशासकीय अनास्था; हदगावमध्ये शेतकरी व रुग्ण वाऱ्यावर

आरोग्य, शेती
हदगाव (गौतम वाठोरे) एकीकडे विकासाच्या घोषणा होत असताना, दुसरीकडे हदगाव तालुक्यातील शेतकरी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असल्याचे चित्र समोर आले आहे. कर्जमुक्तीचा रखडलेला प्रश्न, पीक विम्यातील अडचणी आणि उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका करत “निवडणुकीपुरते दर्शन देणारे नेते जनतेच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. हवामान बदलामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला असताना शेतकऱ्यांना ना कर्जमुक्तीचा लाभ मिळतो आहे, ना वेळेवर पीक विमा. विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याची तक्रार आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) हदगाव शाखेत ‘KYC’ प्रक्रियेच्या नावाखाली ग्र...
फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी

शेती
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) प्रणाली लागू करण्यात येत आहे. यानुसार, फार्मर आयडी विना कोणत्याही शेतकऱ्याला खत मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक राहील. आयडीशिवाय खत वितरण केले जाणार नाही. रासायनिक खतांवरील शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. खतांचा काळाबाजार, साठेबाजी व अनावश्यक लिंकिंग रोखण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरणार असून वितरण प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. डिजिटल नोंदणी प्रणाली - या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांची जमीन, पीक व योजनांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल. खत खरेदी करताना आयडी क्रमांक किंव...
error: Content is protected !!