शेती

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नांदेड जिल्ह्यातील दहा कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने निलंबित ; दोन परवाने कायमस्वरूपी रद्द

नांदेड जिल्ह्यातील दहा कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने निलंबित ; दोन परवाने कायमस्वरूपी रद्द

शेती
कृषी विभागाची धडक कारवाई नांदेड| नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारी, प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि चौकशीअंती कृषी विभाग यांनी कठोर कारवाई करत नायगाव तालुक्यातील सात कृषी सेवा केंद्रांचे खत परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये दशरथ कृषी सेवा केंद्र, केदार कृषी सेवा केंद्र, वसंत अग्रो सर्व्हिस सेंटर, गजानन कृषी सेवा केंद्र, हनुमान कृषी सेवा केंद्र, मातोश्री ॲग्रो एजन्सी आणि शिवकृपा कृषी सेवा केंद्र, नायगाव यांचा समावेश आहे. याशिवाय मे. वर्षा ॲग्रो ट्रेडर्स, खांबाळा ता. मुदखेड, मे. व्यंकटरमणा कृषि सेवा केंद्र, कुरुळा ता. कंधार आणि मे. तिरुमला कृषि सेवा केंद्र, कुरुळा ता. कंधार यांच्या परवान्यांवरही सुनावणीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच मे. शिवकृपा कृषि विकास केंद्र, माळकौठा ता. मुदखेड आणि व्यंकटेश कृषि भांडार, नवीन मों...
कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी

शेती, करियर
ऑनलाईन अर्ज भरण्यास 10 जूनपर्यंत मुदत नांदेड| वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि तंत्र विद्यालय, नांदेड येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत 10 जून 2026 आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असून विद्यार्थी अधिकृत प्रवेश संकेतस्थळ येथे अर्ज करू शकतात. राज्य शासनाने 18 मे 1972 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची स्थापना परभणी येथे केली. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांचा विद्यापीठ कार्यक्षेत्रात समावेश आहे. विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार या तीन प्रमुख शाखांपैकी निम्नस्तर कृषि शिक्षण शाखेअंतर्गत शासक...
राज्यात यंदा कमी पावसाचा अंदाज; एल निनोमुळे मान्सूनवर सावट

राज्यात यंदा कमी पावसाचा अंदाज; एल निनोमुळे मान्सूनवर सावट

शेती
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पर्जन्यमान घटण्याची शक्यता; जूनमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबई | यंदाच्या मान्सून हंगामात महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. हवामान खात्याने नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार देशात यंदा सरासरीच्या केवळ ९० टक्के पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये हा अंदाज ९२ टक्के होता. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.  राज्यातील पर्जन्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जून महिन्यात एल निनोचा प्रभाव तुलनेने कमी राहील, मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये त्याचा प्रभाव वा...
खत विक्रेत्यांना कृषी विभागाची सक्त ताकीद; हिमायतनगरचा खत साठा बाहेर पाठवल्यास कारवाई

खत विक्रेत्यांना कृषी विभागाची सक्त ताकीद; हिमायतनगरचा खत साठा बाहेर पाठवल्यास कारवाई

शेती
शेतकऱ्यांच्या लुटीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारीनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची खतासाठी होणारी अडवणूक, जादा दराने विक्री आणि स्थानिक साठा परस्पर बाहेर पाठविल्या जात असल्याच्या गंभीर तक्रारीनंतर कृषी विभाग अखेर अॅक्शन मोडमध्ये आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेला खत साठा बाहेरील तालुका, जिल्हा किंवा राज्यात वळवला गेला तर संबंधित कृषी सेवा केंद्रांवर थेट कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटिल वडगांवकर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची खतासाठी कृषी दुकानदारांकडून अडवणूक व आर्थिक लूट होत असल्याची गंभीर तक्रार कृषी विभागाकडे केली होती. तसेच हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेला खत साठा परस्पर विदर्भ, तेलंगणा व बा...
बोगस बियाणे व खत विक्रीवर कारवाईचा इशारा

बोगस बियाणे व खत विक्रीवर कारवाईचा इशारा

शेती
कृषी व्यापाऱ्यांना किसान सेलचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या कडक सूचना हदगाव/हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील सर्व कृषी व्यापाऱ्यांना बोगस बियाणे, खताचा साठा करून जास्त दराने विक्री तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आमदार बाबुराव कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रमुख विवेक देशमुख यांच्या सूचनेनुसार किसान सेनेचे तालुका प्रमुख प्रकाश जाधव (प्रकाश भिया जाधव) यांनी ही सूचना जारी केली आहे. किसान सेना व शिंदे सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, तालुक्यात बोगस बियाणे किंवा खताचा साठा करून जास्त दराने विक्री करणारे व्यापारी आढळल्यास संबंधितांवर शासनामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून देण्यात आल्या असून, अशा गैरप्...
वारंगटाकळी शिवारात वासराचा फडशा; हिमायतनगर तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत, शेतकरी भयभीत

वारंगटाकळी शिवारात वासराचा फडशा; हिमायतनगर तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत, शेतकरी भयभीत

शेती
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत डोके वर काढताना दिसत असून, वारंगटाकळी शिवारातील ताज्या घटनेने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. सोमवारी मध्यरात्री वारंगटाकळी येथील शेतकरी आशिष ज्ञानेश्वर मोहिते यांच्या वासराचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली असून, या हल्ल्यामागे बिबट्याचा सहभाग असल्याची जोरदार शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी परिसरात भीतीचे सावट पसरले असून शेतकरी अक्षरशः दहशतीखाली वावरत आहेत. काही महिन्यांपूर्वीही याच परिसरात बिबट्याने जनावरांवर हल्ले करत मोठी दहशत निर्माण केली होती. आता पुन्हा त्याच पद्धतीने पाळीव जनावरांवर हल्ले सुरू झाल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शेतकरी रात्रभर शेतात जाण्यास धजावत नाहीत, तर मजूरही कामावर जाण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्...
खरीपासाठी नांदेड जिल्ह्यात मुबलक खतसाठा उपलब्ध

खरीपासाठी नांदेड जिल्ह्यात मुबलक खतसाठा उपलब्ध

शेती
अफवांवर विश्वास ठेवू नका; गरजेनुसारच खत खरेदी करा – कृषी विभागाचे आवाहन नांदेड| खरीप हंगाम 2026 साठी नांदेड जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी खत टंचाईच्या भीतीपोटी अनावश्यक खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार, जमीन आरोग्य पत्रिकेच्या अहवालानुसार तसेच पिकांच्या वाढीच्या टप्प्यानुसार खतांचा वापर करावा, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. खत उपलब्धतेबाबत अफवा पसरवल्या जात असल्यास, जादा दराने विक्री, खतासोबत अन्य वस्तूंची सक्ती (लिंकिंग) किंवा बोगस खतांची विक्री आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खरीप हंगामात खत ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची कृषी निविष्ठा मानली जाते. राज्यस्तरावर कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून खत नियोजन केले जाते. नांदेड जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2026 मध्ये सुमारे 2 ...
हिमायतनगर कृषी कार्यालयाचा भोंगळ कारभार?; तीन वर्षांत शेतकऱ्यांसाठी एकही प्रभावी मार्गदर्शन शिबिर नाही!

हिमायतनगर कृषी कार्यालयाचा भोंगळ कारभार?; तीन वर्षांत शेतकऱ्यांसाठी एकही प्रभावी मार्गदर्शन शिबिर नाही!

शेती
कागदावर शिबिरे, प्रत्यक्षात शेतकरी अंधारात; लाखोंच्या निधीच्या खर्चावर संशय, वामनराव पाटील वडगांवकर यांनी केली चौकशीची मागणी हिमायतनगर, अनिल मादसवार| एकीकडे शासन “शेतकरी समृद्धी”चे गोडवे गात असताना दुसरीकडे हिमायतनगर तालुका कृषी कार्यालयाच्या कथित निष्क्रिय आणि ढिसाळ कारभारामुळे शेतकरी पेरणीपूर्वीच अडचणीत सापडल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी तहसीलदार व संबंधित कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना पीक नियोजन, माती परीक्षण, खत व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण व शासन योजनांबाबत मार्गदर्शन मिळणे अपेक्षित असते. मात्र, मागील तीन वर्षांत हिमायतनगर शहरात एकही प्रभावी कृषी कार्यशाळा किंवा मार्गदर्शन शिबिर न झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. शासनाकडून खरीप ...
हिमायतनगरात खत टंचाई की काळाबाजार?; शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप

हिमायतनगरात खत टंचाई की काळाबाजार?; शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप

शेती, राजकारण
स्टॉक असूनही “खत संपले”चा फलक; कृषी विभागाच्या भूमिकेवर वडगांवकर यांनी उपस्थित केला प्रश्नचिन्ह हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतासाठी वणवण भटकावे लागत असून, काही कृषी सेवा केंद्रांकडून खत साठा लपवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप वामनराव पाटील वडगांवकर यांनी केला आहे. काही दुकानदारांनी दुकानाच्या नावावरील खताचा स्टॉक मित्र, नातेवाईक व इतर व्यक्तींच्या आधार कार्डवर OTP घेऊन ‘स्कॅन’ करून उडवण्याचा प्रकार सुरू केला असल्याची चर्चा शेतकरी बांधवांत रंगू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिमायतनगर शहरातील अनेक कृषी दुकानांमध्ये शेतकरी खत मागण्यासाठी गेल्यास “स्टॉक संपला” असे सांगितले जाते. मात्र, शहर व ग्रामीण परिसरातील काही खासगी गोडाऊनमध्ये DAP, युरिया, 10:26:26 आणि पोटॅश खतांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्...
खत काळाबाजार उघड करणाऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या?; हिमायतनगरात संताप

खत काळाबाजार उघड करणाऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या?; हिमायतनगरात संताप

शेती
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार; “धमक्यांना भीक घालणार नाही” वामनराव पाटील वडगांवकर  हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील खत टंचाई, काळाबाजार आणि शेतकऱ्यांच्या लुटीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच हिमायतनगरातील काही कृषी दुकानदार व दलालांकडून धमकीचे राजकारण सुरू झाल्याचा गंभीर आरोप समोर करण्यात आला आहे. खताचे पार्सल बाहेर जात असल्याचे फोटो काढल्याच्या कारणावरून काही दलालांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा करण्यात आला असून, अशी पोस्ट सोशल मीडियावर वामनराव पाटील वडगांवकर यांनी व्हायरल केली आहे. याप्रकरणी शेतकरी हितासाठी आवाज उठवणाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेत, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू केलेला लढा कोणत्याही धमकीला घाबरणारा नाही,” असा इशारा दिला आहे. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून किंवा काळाबाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्यांनी “आपल्या औकातीत राहा...
error: Content is protected !!