लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

आत्महत्येनंतर नव्हे, आत्महत्या होण्यापूर्वी समाज जागा झाला पाहिजे!

आत्महत्येनंतर नव्हे, आत्महत्या होण्यापूर्वी समाज जागा झाला पाहिजे!

लेख
नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. प्रत्येक आत्महत्येनंतर अश्रू ढाळले जातात, संवेदना व्यक्त केल्या जातात, आर्थिक मदतीच्या घोषणा होतात, अधिकारी धाव घेतात, राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होतात आणि माध्यमांमध्ये अनेक दिवस चर्चा रंगते. परंतु एक मूलभूत प्रश्न मात्र प्रत्येक वेळी अनुत्तरित राहतो—हे सर्व त्या व्यक्तीने जगण्याचा निर्णय घेतला असता, त्याआधी का घडत नाही? आज आत्महत्येनंतर मदतीची व्यवस्था निर्माण झाली आहे; पण आत्महत्या होऊच नये यासाठीची यंत्रणा अजूनही तितकी प्रभावी दिसत नाही. हीच आपल्या समाजाची आणि व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आत्महत्या ही केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसतो. तो एका कुटुंबाचा आधार हरवण्याचा क्षण असतो. एका घरातील मुलांचे भविष्य अंधारात लोटणारी घटना असते. वृद्ध आई-वडिलांच्या उरात कायमची वेदना निर्माण करणार...
🔱 अमरनाथ गुहेतून – भाग १ 🔱  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

🔱 अमरनाथ गुहेतून – भाग १ 🔱 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
वाचक मित्रांनो! अमरनाथ यात्रा म्हटली की डोळ्यासमोर उभे राहतात हिमालयातील बर्फाच्छादित पर्वत, खडतर चढाई, अनिश्चित हवामान, लष्कराच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि बाबा बर्फानींच्या दर्शनाची आस लागलेले लाखो भाविक!याच अद्भुत यात्रेसाठी नांदेडचे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यंदा सलग २७ व्या वर्षी १०० यात्रेकरूंसह रवाना होत आहेत. काश्मीरच्या बदलत्या परिस्थितीपासून रेल्वेच्या वेटिंग लिस्टपर्यंत, रजिस्ट्रेशनच्या “सर्व्हर बिझी” पासून हिमालयातील बर्फवृष्टीपर्यंत, यात्रेकरूंच्या गमती-जमतींपासून अध्यात्मिक अनुभूतींपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास यंदा एका वेगळ्याच अंदाजात आपल्या भेटीला येत आहे.दरवर्षीप्रमाणे केवळ प्रवासवर्णन नव्हे, तर विनोद, मार्मिक निरीक्षणे, थरार, मानवी स्वभावाचे रंग, सेवा, श्रद्धा आणि हिमालयाच्या कुशीत घडणाऱ्या असंख्य अविस्मरणीय घटनांची ही जिवंत सफर असेल. “अमरनाथ गुहेतून” ही लेखमाला वाच...
“३५% चा विजय” एका मुलीच्या आयुष्याला मिळालेलं नवं वळण

“३५% चा विजय” एका मुलीच्या आयुष्याला मिळालेलं नवं वळण

लेख
कधी कधी काही बातम्या आकड्यांमध्ये मोजता येत नाहीत… त्या मनात घर करून जातात... अशीच एक प्रेरणादायी घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली आहे. “साहेब… माझी मुलगी पास झाली हो… तिला ३५% पडले…” फोनवरील त्या वडिलांचा थरथरता पण आनंदाने भरलेला आवाज आजही मनाला स्पर्श करून जातो. कारण हे फक्त ३५ टक्के नव्हते… तर एका मुलीच्या नव्या आयुष्याची सुरुवात होती. शिवसांब घोडके हे नांदेड वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असताना कंधार तालुक्यातील एका गावात बिबट्याच्या अफवेच्या शोधमोहीमेवर गेले होते. तेव्हा त्यांच्या नजरेस एक दहावीतील मुलगी उन्हात शेतात काम करताना दिसली. अभ्यासात मागे पडल्याने आणि मुलांच्या चेष्टेमुळे तिने शाळा सोडली होती. त्या दिवशी भोकराच्या झाडाखाली झालेला संवाद एका मुलीच्या आयुष्याला नवं वळण देणारा ठरला. “तू शाळेत जा… शिक्षणच तुझं आयुष्य बदलू शकतं…” या शब्दांनी त्या मुलीच्या मनात नवी आशा नि...
उष्माघात : जीवघेण्या उष्णतेपासून बचावासाठी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

उष्माघात : जीवघेण्या उष्णतेपासून बचावासाठी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

लेख
राज्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट सुरू असून नांदेडसह अनेक भागांमध्ये तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात (Heat Stroke) होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही एक गंभीर वैद्यकीय अवस्था असून वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. उष्माघात म्हणजे काय? उष्माघात ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते आणि शरीराला स्वतःचे तापमान नियंत्रित करता येत नाही. सामान्यतः शरीर घामाद्वारे थंड होते, मात्र उष्माघातात ही प्रक्रिया अयशस्वी ठरते. उष्माघाताची लक्षणे उष्माघात झालेल्या व्यक्तीत खालील लक्षणे दिसून येतात: त्वचा लाल, गरम व कोरडी होणे श्वास घेण्यास त्रास चक्कर येणे, थकवा मळमळ, उलट्या तीव्र डोकेदुखी हृदयाचे ठोके वेगाने वाढणे गोंधळ, चिडचिडेपणा प्रमुख कारणे ...
नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांसाठीचा सन्मान सोहळा आता राज्य पातळीवर साजरा होणार

नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांसाठीचा सन्मान सोहळा आता राज्य पातळीवर साजरा होणार

लेख
पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाते; परंतु या स्तंभाला बळकट ठेवण्यासाठी जे व्यक्तिमत्त्व स्वतःचे आयुष्य झोकून देतात, त्यापैकी एक ठळक नाव म्हणजे बापुराव गजभारे. गेली तब्बल २४ वर्षे पत्रकारांसाठी सकारात्मक, सन्माननीय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी अविरतपणे केलेले कार्य हे केवळ उल्लेखनीय नाही, तर अनुकरणीय आहे. बापुराव गजभारे यांची कार्यशैली ही केवळ पत्रकारितेपुरती मर्यादित नाही. त्यांनी पत्रकार आणि प्रामाणिक समाजसेवक यांना समान दर्जा देत, दोघांनाही समाजघडणीचे महत्त्वपूर्ण घटक मानले. ही व्यापक दृष्टीच त्यांच्या कार्याला वेगळी उंची देणारी ठरली. ग्रामीण भागातील पत्रकार असो किंवा महानगरातील प्रतिनिधी — सर्वांना एकाच धाग्यात बांधण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे पत्रकारितेतील भेदाभेद कमी होऊन एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली. विशेष म्हणजे,...
समाजसेवेचा अखंड दीप : नवनिहालसिंग जहागीरदार यांची प्रेरणादायी वाटचाल

समाजसेवेचा अखंड दीप : नवनिहालसिंग जहागीरदार यांची प्रेरणादायी वाटचाल

लेख
नांदेड जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांनी आपल्या कार्याने वेगळी छाप उमटवली, अशा व्यक्तिमत्त्वांमध्ये नवनिहालसिंग जहागीरदार यांचे नाव आदराने घेतले जाते. स्वातंत्र्यसैनिक गुलाबसिंग जहागीरदार यांचा वारसा लाभलेल्या या कर्तृत्ववान व्यक्तीने गेली दोन दशके समाजसेवेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवत जनतेच्या जीवनात प्रकाश निर्माण केला आहे. ‘नवज्योत फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशप्रेम, शिक्षण, संस्कार आणि संस्कृती जपण्याचे महान कार्य हाती घेतले आहे. या संस्थेने केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली नाही, तर त्यांच्यात मूल्याधिष्ठित विचारांची पेरणी केली. समाजाच्या जडणघडणीत शिक्षणाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे जाणून त्यांनी आपल्या कार्यातून त्या विचाराला मूर्त रूप दिले आहे. नांदेडमधील नामांकित अशा नांदेड एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्थेचे...
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा

लेख
इतिहास जागरासाठी लोकप्रतिनिधी व अध्यात्मिक गुरुंच्या पुढाकाराची गरज नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहीर केलेला उपक्रम हा नक्कीच दूरदृष्टीचा आणि प्रेरणादायी आहे. मात्र, अशा उपक्रमांचा प्रभाव केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता तो समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, हीच खरी गरज आहे. आजची तरुण पिढी माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असली तरी आपल्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांविषयी तिची जाणीव अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येते. विशेषतः मराठवाडा मुक्ती संग्रामासारखा स्वातंत्र्यलढा जो अन्याय, दडपशाही आणि रजाकारांच्या अत्याचाराविरुद्ध उभ्या राहिलेल्या जनतेच्या एकजुटीचा सर्वोच्च नमुना होता तो नव्या पिढीपर्यंत सखोलपणे पोहोचणे अत्यावश्यक आहे. या संग्रामात असंख्य ज्ञात-अज्...
 १९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा सेवा औषधोपचार

 १९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा सेवा औषधोपचार

लेख, शेती
वर्षभरात ४,०१,९९२ कॉल्स, ३.७८ लाख तक्रारींचे निवारण दुर्गम भागातील ३४९७९ पशुपालकांना लाभ  'गोल्डन अवर' मधून ६४७५९ पशुधनाला जीवदान  पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. जनावरांचे आरोग्य धोक्यात आले की, शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडते. मात्र, आता अद्ययावत तंत्रज्ञान आणि १९६२ मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना मोठा आधार मिळाला आहे. या सुविधेमुळे केवळ उपचारांमधील वेळच वाचला नाही, तर दुर्गम भागातील हजारो पशुधनास वेळेत 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. '1962 कॉल सेंटर' आणि मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्यातील तांत्रिक समन्वयामुळे पशुपालकांना आपल्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत, जे ग्रामीण समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. वर्षभरात या कॉल सेंटरकडे एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणज...
आधुनिक शेळीपालनातून समृद्धीची नवी पहाट ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ची लाभदायी साथ

आधुनिक शेळीपालनातून समृद्धीची नवी पहाट ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ची लाभदायी साथ

माहिती, लेख
पुणे| शेळी व मेंढीपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असून कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा हा व्यवसाय ‘एटीएम’सारखा ओळखला जातो. बाजारपेठेत शेळीच्या मांसाला वाढती मागणी आणि चांगला दर मिळत असल्याने ग्रामीण तरुणांचा या व्यवसायाकडे कल वाढत आहे. आता ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे हा व्यवसाय अधिक सक्षम होत असून स्वयंरोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली. स्वयंरोजगाराचा प्रभावी पर्याय ग्रामीण भागातील तरुणांसाठी शेळी-मेंढीपालन हा एक उत्तम स्वयंरोजगाराचा पर्याय ठरत आहे. ‘सेमी-स्टॉल फीडिंग’ (अर्ध-बंदिस्त) पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा व्यवसाय अधिक फायदेशीर केला जात आहे. विशेष म्हणजे, घरातील महिला देखील हा व्यवसाय सांभाळून स्वतःचे स्वतंत्र उत्पन्न मिळवू शकतात. शेळी व मेंढी को...
निरोगी मातृत्वाची हमी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिलांसाठी मजबूत आधार

निरोगी मातृत्वाची हमी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिलांसाठी मजबूत आधार

लेख
गर्भवती आणि स्तनदा महिलांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रोत्साहन देते. मातृ व बाल आरोग्य ही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची बाब आहे. गर्भधारणेपासून ते बाळंतपणापर्यंत अनेक महिलांना कुपोषण,रक्तक्षय, आरोग्य तपासणीचा अभाव आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर गर्भवती आणि स्तनदा महिलांना पोषण, आरोग्य आणि आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) सुरू केली. ही योजना केवळ आर्थिक मदत देणारी नसून मातृत्वाला सन्मान आणि सुरक्षितता देणारी महत्त्वाची पायरी ठरली आहे. योजनेची गरज आणि पार्श्वभूमी - भारतीय राज्यघटनेतील कलम ४२ नुसार प्रसूतीसंदर्भात महिलांना आवश्यक संरक्षण आणि दिलासा दे...
error: Content is protected !!