सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

एन.ई.एस. सायन्स कॉलेजमध्ये जलसाक्षरतेचा जागर

एन.ई.एस. सायन्स कॉलेजमध्ये जलसाक्षरतेचा जागर

सामाजिक
नांदेड| येथील एन.ई.एस. सायन्स कॉलेजच्या भूशास्त्र विभागाच्या वतीने ‘जागतिक जल दिन’ निमित्त विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “सामाजिक कार्यासाठी पाणी” (Water for Social Cause) या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात महाविद्यालयातील विविध शाखांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे तांत्रिक व रचनात्मक नियोजन भूशास्त्र विभागाचे अधिव्याख्याते प्रा. आकाश करंडे यांनी केले. विभाग प्रमुख डॉ. गायकवाड व प्रा. एकनाथ खिल्लारे यांनी उपक्रमाला मार्गदर्शन व नेतृत्व दिले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे अध्यक्षस्थानी होते, तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सदस्य कॉ. प्रदीप नागापूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. एकनाथ खिल्लारे...
श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाची मागणी

श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाची मागणी

मनोरंजन, सामाजिक
देगलूर | देगलूर शहरातील एकमेव सार्वजनिक उद्यान असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान च्या सुशोभीकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी पुढाकार घेत नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निलम कांबळे यांची भेट घेऊन त्यांनी उद्यानाचे नूतनीकरण करण्याची मागणी केली. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच कुटुंबीयांना फिरण्यासाठी शहरात पर्यायी जागा नसल्यामुळे या उद्यानाचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे नव्याने टेंडर काढून मुलांसाठी खेळण्यांची आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. याबाबत मुख्याधिकारी निलम कांबळे यांनी सकारात्मक भूमिका घेत हा विषय नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला घेण्याचे आश्वासन दिले असून संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शहरातील मुलांमध्येही या उ...
बिलोलीत पाणपोईसाठी जागेचा प्रश्न चिघळला

बिलोलीत पाणपोईसाठी जागेचा प्रश्न चिघळला

सामाजिक
बिलोली,गोविंद मुंडकर| शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत गरजेवरच प्रशासकीय हलगर्जीपणाचे सावट आले असून, पाणपोईसाठी जागा उपलब्ध करून देण्यात बिलोली नगर परिषद अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. एकीकडे अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना, दुसरीकडे पाणपोईसारख्या अत्यावश्यक उपक्रमासाठी जागा न मिळणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. गेल्या तब्बल ३५ वर्षांपासून बिलोली शहर विकास कृती समिती आणि माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार यांच्या पुढाकारातून सुरू असलेला पाणपोईचा उपक्रम हा केवळ परंपरा नसून, तो हजारो नागरिकांसाठी जीवनदायी ठरलेला आहे. उन्हाळ्याच्या कडक पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. मात्र, याच उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाची होत असलेली दिरंगाई नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे. विशेष म्हणजे, नगर परिषद परिक्षेत्रातील महसूल ...
मुलाच्या मृत्यूच्या विरहात चार तासातच बापही गतप्राण.!

मुलाच्या मृत्यूच्या विरहात चार तासातच बापही गतप्राण.!

सामाजिक
कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यातील फुलवळ येथील हुसेन काशीमसाब निछलकर वय ४३ वर्ष यांचे अल्पशा आजाराने ता. १ एप्रिल रोज बुधवारी दुपारी २ वाजता दुःखद निधन झाले. त्याचे दुःख अनावर झाल्याने थकलेला बाप काशीम लालासाब निछलकर वय ७० वर्ष हे मुलाच्या मृत्यूच्या विरहात अवघ्या चार तासांतच म्हणजेच ठीक ६ वाजता गतप्राण झाले असल्याने फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे. फुलवळ येथील हुसेन निछलकर यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालखीची असताना देखील मोठ्या धैर्याने ते संकटाशी सामना करत आपल्या कुटुंबाचे पालन पोषण हे रात्रंदिवस काबाड कष्ट करीत करत होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या आजारावर बरेच दिवस झाले उपचार चालूच होता. असे असताना देखील त्यांनी हिम्मत न हरता परिस्थितीला सामोरे गेले पण आज अचानक वडील व मुलाचा मृत्यू झाल्यामुळे निछलकर कुटुंबीयांवर फार मोठे संकट कोसळले. या कुटुंबियांना राज...
किनवट तालुक्यातील थारा येथे ‘महारेशीम अभियान’ नोंदणीचा शुभारंभ

किनवट तालुक्यातील थारा येथे ‘महारेशीम अभियान’ नोंदणीचा शुभारंभ

सामाजिक
नांदेड| किनवट तालुक्यातील थारा येथे ‘महारेशीम अभियान’ नोंदणीचा शुभारंभ सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने रेशीम शेतीसाठी नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता वस्त्रोद्योगाशी जोडले जाणे आवश्यक आहे. शेतीत उद्योगाचा समावेश करून शेतकऱ्यांना उद्योजक बनविणे हे शासनाचे धोरण असून, रेशीम उद्योग हा त्यासाठी फायदेशीर पर्याय ठरू शकतो. कार्यक्रमास जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, क्षेत्र सहायक रेशीम कांचन जाधव, सहायक संचालक प्रवीण भुरके, प्रगतशील शेतकरी कपील सोनटक्के तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला पुढे म्हणाले की, या अभि...
हदगाव आर्य वैश्य समाजाची एकजूट ठरली प्रेरणादायी

हदगाव आर्य वैश्य समाजाची एकजूट ठरली प्रेरणादायी

सामाजिक
हदगाव | हदगाव येथील आर्य वैश्य समाजाने मंगल कार्यालय उभारण्यासाठी केलेली निधी उभारणी ही इतर समाजांसाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव गोविंद बिडवई यांनी केले. ते हदगाव येथे आयोजित आर्य वैश्य मंगल कार्यालय भूमिपूजन, देणगीदारांचा सहपरिवार सत्कार व महासभेच्या पदग्रहण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा, नांदेड जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आणि मंगल कार्यालयाचे भूमिपूजन मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमात बोलताना गोविंद बिडवई यांनी सांगितले की, छोट्याशा गावात सुमारे ९० कुटुंबे असतानाही तब्बल ८० घरांनी स्वखर्चाने देणगी देत मंगल कार्यालय उभारण्याचा घेतलेला संकल्प हा समाजाच्या एकजुटीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. “आपणच आपल्या समाजासाठी उभे राहून व...
जीव गेला तरी बेहतर जागा मिळेपर्यंत माघार नाही – माधव शिंदे

जीव गेला तरी बेहतर जागा मिळेपर्यंत माघार नाही – माधव शिंदे

सामाजिक
हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. या मागणीसाठी माधव किशन शिंदे यांनी दिनांक ३१ मार्च बुधवारपासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी यापूर्वी दोन वेळा उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी नगरपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन देत उपोषण स्थगित करण्यास सांगितले होते. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस निर्णय घेतला नसल्याचा आरोप उपोषण कर्ते यांनी केला आहे. “जोपर्यंत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही,” काही बरे वाईट झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची राहिलं अशी ठाम भूमिका माधव शिंदे यांनी व्यक्त केली. एकूणच या आंदोलनामुळे शहरातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झा...
गंगाई सेवाभावी संस्थेला राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान

गंगाई सेवाभावी संस्थेला राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान

सामाजिक
मुंबई/नांदेड/नायगांव/हिमायतनगर| समाजातील व्यसनमुक्तीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या गंगाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हिमायतनगर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा गौरव २६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, विधानसभा अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर, प्रधान सचिव डॉ. सिद्धोधन कांबळे तसेच समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने हा पुरस्कार सचिव प्रा. गोपाळराव विठ्ठलराव हरडपकर व सौ. अश्विनी गोपाळराव हरडपकर यांनी स्वीकारला. गेल्या दहा वर्षांपासून हि संस्था व्यसनमुक्ती अभियान, जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन शिबिरे तस...
‘केरला स्टोरी पार्ट-2’ मोफत शोला नांदेडमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद

‘केरला स्टोरी पार्ट-2’ मोफत शोला नांदेडमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद

सामाजिक
नांदेड| हिंदू मुलींमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून आयोजित ‘केरला स्टोरी पार्ट-2’ या चित्रपटाच्या मोफत पाच शो उपक्रमाला नांदेडमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहाटेपासूनच मुलींची मोठी गर्दी उसळली असून, सर्व शो हाऊसफुल्ल झाल्याने या उपक्रमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सोमवार, दि. ३० मार्च रोजी पीव्हीआर सिनेमा येथे भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७ ते दुपारी २ दरम्यान विविध स्क्रीनवर पाच शो आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या शोचे उद्घाटन संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. चैतन्यबापू देशमुख यांनी या उपक्रमाची दखल घेत ॲड. दिलीप ठाकूर यांना पद्म पुरस्कारासाठी राज्यपालांमार्फत शिफारस करण्याचा प्रयत्न केला जाईल, ...
गरिबीशी झुंज देणाऱ्या वैष्णवीच्या लग्नासाठी मदतीचे आवाहन

गरिबीशी झुंज देणाऱ्या वैष्णवीच्या लग्नासाठी मदतीचे आवाहन

सामाजिक
हिमायतनगर/हदगांव| तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रयत सेवाभावी प्रतिष्ठान, जवळगाव तर्फे मौजे महाताळा (निवघा बाजारजवळ, ता. हदगाव, जि. नांदेड) येथील एका गरजू कुटुंबासाठी मदतीचे भावनिक आवाहन करण्यात आले आहे. चि. सौ. का. वैष्णवी गजानन रुमाले हिच्या विवाहासाठी तिच्या आईने प्रतिष्ठानकडे कळकळीची विनंती केली आहे. दिनांक 24 मार्च 2026 रोजी संस्थापक अध्यक्ष सटवाजी गणपतराव पवार (जवळगावकर), अरुण पाटील चक्रीकर व संतोष पाटील सूर्यवंशी यांनी महाताळा येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. पाहणीदरम्यान समोर आलेली परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक आहे. वधूच्या वडिलांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून तब्बल 12 वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्या वेळी वैष्णवी अवघी 6 वर्षांची, तिची बहीण 4 वर्षांची आणि भाऊ केवळ 2 महिन्यांचा होता. या घटनेनंतर तीन लहान लेकरांची संपूर्ण जबाबदारी आईवर येऊन पडली. घरची परिस्थिती ...
error: Content is protected !!