महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हिंगोलीसह नांदेड-परभणीत मध्यरात्री भूकंपाचे तीन सौम्य धक्के

हिंगोलीसह नांदेड-परभणीत मध्यरात्री भूकंपाचे तीन सौम्य धक्के

महाराष्ट्र
जीवितहानी नाही, नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड | हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात गुरुवार, 9 जुलै 2026 रोजी मध्यरात्री भूकंपाचे सलग तीन सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राने दिली आहे. या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. अधिकृत माहितीनुसार, रात्री 1.37, 2.15 आणि 2.17 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप नोंदीनुसार या धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे 4.6, 3.6 आणि 3.9 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली गाव परिसरात असल्याचे अधिकृत वृत्तात नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ...
नांदेड–मुंबई प्रवाशांसाठी खुशखबर! हुजूर साहिब–लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान दोन नवीन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू

नांदेड–मुंबई प्रवाशांसाठी खुशखबर! हुजूर साहिब–लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान दोन नवीन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड | मराठवाड्यातील प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हुजूर साहिब नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान दोन नवीन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू करण्यात येणार असून, या सेवेमुळे नांदेडसह पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला आदी भागातील प्रवाशांना मुंबईकडे अधिक सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 17667 ही रेल्वे प्रत्येक बुधवारी रात्री 9.15 वाजता नांदेड येथून सुटून पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला आणि मनमाड मार्गे गुरुवारी दुपारी 1 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा 8 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. तर गाडी क्रमांक 17668 ही रेल्वे प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 4.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून मनमाड, अकोला, वाशिम, हिंगोली,...
नांदेडमध्ये दक्षिण मध्य रेल्वेची खासदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; महाराष्ट्रासाठी ₹23,926 कोटींची तरतूद, रेल्वे विकासाला नवी गती

नांदेडमध्ये दक्षिण मध्य रेल्वेची खासदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; महाराष्ट्रासाठी ₹23,926 कोटींची तरतूद, रेल्वे विकासाला नवी गती

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे विकासकामांना वेग देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधांबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना जाणून घेण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नांदेड येथे खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून ₹23,926 कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील (रेल विकास सदन) परिषद सभागृहात झालेल्या या बैठकीला महाराष्ट्रातील १२ खासदार, नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, सिकंदराबाद विभागाचे डीआरएम डॉ. आर. गोपालकृष्णन, हैदराबाद विभागाचे डीआरएम संतोष कुमार वर्मा तसेच दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाव्यवस्थापक संजय कुमार...
नांदेड–मुंबई प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; एलटीटीदरम्यान दोन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू

नांदेड–मुंबई प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; एलटीटीदरम्यान दोन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड | नांदेड आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हजूर साहिब नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) दरम्यान दोन साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्र. 17667 हजूर साहिब नांदेड–एलटीटी ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री 9.15 वाजता नांदेड येथून सुटून बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मनमाड मार्गे गुरुवारी दुपारी 1 वाजता एलटीटी येथे पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा 8 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. 17668 प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 4.55 वाजता एलटीटी येथून सुटून मनमाड, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत मार्गे शुक्रवारी सकाळी 9.10 वाजता नांदेडला पोहोचेल. ही सेवा 9 जुलै 2026 पासून सुरू होईल. याशिवाय गाडी क्र. 17665 प्रत्येक सोमवारी रात्री 9.15 वाजता नांदेड...
हिमायतनगरात ‘पैसे दिल्याशिवाय काम होत नाही?’ सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

हिमायतनगरात ‘पैसे दिल्याशिवाय काम होत नाही?’ सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्र
ग्रामपंचायतींतील विकासकामांच्या चौकशीची मागणी; निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असून, या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींतील प्रलंबित प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी पंचायत समिती, हिमायतनगर येथे निवेदन सादर करत गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या निवेदनामध्ये टाकराळाटाकराळा (बु.) व वडगाव (खु.) गट ग्रामपंचायतीसह तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींतील प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजना, विहीर व सिंचन प्रकरणे, १४ वा व १५ वा वित्त आयोग निधी, ग्रामपंचायत विकासकामे, शेड, रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, विविध शासकीय योजना मध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करून प्...
नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड नवीन एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ

नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड नवीन एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ

महाराष्ट्र, तेलंगणा
नांदेड| केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड या दोन नवीन एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याचवेळी टनकपूर–पिलीभीत रेल्वे सेवेचा विस्तार शाहजहानपूर पर्यंत करण्यात आला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि पुष्कर सिंह धामी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सहभाग घेतला. नांदेड, टनकपूर आणि पिलीभीत रेल्वे स्थानकांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, टनकपूर–नांदेड एक्सप्रेसमुळे तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे येणाऱ्या भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे. तसेच नांदेड–मुंबई एक्सप्रेसमुळे मराठवाड्यातील वाशीम, हिंगोली, बसमत आदी भागातील प्रवाशांना मुंबईशी थेट आणि सुलभ रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. त्यांनी भारतीय रेल्वेच्या प्रगतीचा आढावा...
नांदेडहून मुंबई व उत्तराखंडला थेट रेल्वे! दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांचा ६ जुलैला शुभारंभ

नांदेडहून मुंबई व उत्तराखंडला थेट रेल्वे! दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांचा ६ जुलैला शुभारंभ

महाराष्ट्र, तेलंगणा
नांदेड | नांदेडच्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी असून, ६ जुलै २०२६ रोजी नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड या दोन नवीन एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ होणार आहे. या गाड्यांमुळे नांदेडचा राज्याची राजधानी मुंबई तसेच देवभूमी उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित होणार असून प्रवासी, भाविक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या दोन्ही गाड्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह, जितिन प्रसाद आणि अजय टम्टा हेही ऑनलाइन सहभागी होणार आहेत. हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर होणाऱ्या स्थानिक कार्यक्रमाला मंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोप...
नांदेडमध्ये १ लाख बांबू लागवड मोहिमेला प्रारंभ; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते शुभारंभ

नांदेडमध्ये १ लाख बांबू लागवड मोहिमेला प्रारंभ; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते शुभारंभ

शेती
३७.५० लाख वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम नांदेड | पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि हरित नांदेडच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत मृद व जलसंधारण विभागाच्या १ लाख बांबू लागवड मोहिमेचा शुभारंभ आज मौजे सालेगाव (ता. धर्माबाद) येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आला. यंदाच्या पावसाळी हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी ३७ लाख ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्याअंतर्गत मृद व जलसंधारण विभागाला १ लाख बांबू लागवडीचे विशेष उद्दिष्ट देण्यात आले आहे. पूर्ण झालेल्या नाला खोलीकरण व इतर जलसंधारण कामांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी राऊत, तहसीलदार श्रीमती स्वामी, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. कांबळे, उपवि...
कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर; राजेंद्र दर्डा यांना प्रथम जीवनगौरव पुरस्कार

कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर; राजेंद्र दर्डा यांना प्रथम जीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्र
विजया रहाटकर, डॉ. बालाजी आसेगावकर, मंदार भारदे आणि दिव्या देशमुख यांचाही गौरव नांदेड | मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा दैनिक सत्यप्रभाचा कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार यंदासाठी जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी प्रथमच 'डॉ. शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार' सुरू करण्यात आला असून, त्याचे पहिले मानकरी म्हणून लोकमत समूहाचे एडिटर-इन-चिफ तथा माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, स्नेहसावलीचे संस्थापक डॉ. बालाजी आसेगावकर, मॅब एव्हिएशनचे संस्थापक मंदार भारदे आणि महिला बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुख यांना यंदाचा कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कारासाठी निवड समि...
4 ते 6 जुलैदरम्यान मुंबई, कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

4 ते 6 जुलैदरम्यान मुंबई, कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

महाराष्ट्र
मुंबई | राज्यात 4 ते 6 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, मुंबई महानगर क्षेत्र (MMR), कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या कालावधीत सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे, घाटरस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका तसेच काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन ...
error: Content is protected !!