महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हेल्मेट घालणाऱ्यांना ‘सरप्राईज गिफ्ट’; नांदेडमध्ये रस्ते सुरक्षेचा अनोखा उपक्रम

हेल्मेट घालणाऱ्यांना ‘सरप्राईज गिफ्ट’; नांदेडमध्ये रस्ते सुरक्षेचा अनोखा उपक्रम

महाराष्ट्र
नांदेड| वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करत नांदेडमध्ये रस्ते सुरक्षा जनजागृतीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि ‘सेफर इंडियन रोड्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसर, आयटीआय चौक येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ‘सरप्राईज गिफ्ट्स’ देऊन गौरविण्यात आले. तसेच रस्ते चिन्हांचा माहिती तक्ताही नागरिकांना वितरित करण्यात आला. या उपक्रमामुळे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज, वाहतूक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हा...
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात विशेष चारा सुरक्षा आराखडा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात विशेष चारा सुरक्षा आराखडा

शेती
नांदेड| यंदाच्या मान्सूनवर ‘एल-निनो’चा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग सतर्क झाले आहेत. जिल्ह्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्यात येत आहे. पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या निर्देशानुसार हा आराखडा राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. धरणांच्या गाळपेरा क्षेत्रात तसेच नदीकाठच्या जमिनींवर विशेष चारा लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. टंचाईच्या काळात चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी यासाठी मुरघास प्रकल्पांना गती देण्यात येणार असून, चारा साठवणुकीवरही भर दिला जाणार आहे. पशुपालकांसाठी चारा साक्षरता अभियान राबवून कडबा...
नांदेड जिल्ह्यासाठी ७ मे रोजी ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

नांदेड जिल्ह्यासाठी ७ मे रोजी ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

महाराष्ट्र
नांदेड (प्रतिनिधी) प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ७ मे २०२६ रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संभाव्य नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणा व नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घ्यावयाची काळजी विजेच्या गडगडाटाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळा मोकळ्या जागेत अडकल्यास सखल भागात बसून डोके गुडघ्यात घ्या शक्य असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या बाल्कनी, छत किंवा घराबाहेर उभे राहू नका घरातील विद्युत उपकरणे त्वरित बंद करा विजेचे खांब, तारांचे कुंपण व लोखंडी वस्तूंपासून दूर राहा पाण्यात उभे असल्यास ता...

खड्ड्यांतून प्रवास, टोल मात्र कायम! महामार्गावर झाडे नसल्याने नागरिक संतप्त

महाराष्ट्र
हिमायतनगर/भोकर (प्रतिनिधी) एकीकडे खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि दुसरीकडे सुरूच असलेली टोल वसुली… यामुळे वाहनधारकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. सरसम म्हसोबा नाण्यापासून पुढे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी खोल खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक बनला आहे. अपघातांचा धोका वाढला असतानाही संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. वाहनधारकांच्या मते, रस्त्याची दुरुस्ती न करता टोल वसुली सुरू ठेवणे हा सरळसरळ अन्याय आहे. “सुविधा शून्य, शुल्क पूर्ण” अशी परिस्थिती निर्माण झाली असून, रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. दरम्यान, भोकर–हिमायतनगर (१६१ ए) राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. रुंदीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली; मात्र त्यानंतरची वृक्षलागवड आणि संगोपन पूर्णपणे फसल्याचे दिसून येत आहे. परिणामी...
खताने भरलेला भरधाव ट्रक गतिरोधकास धडकला.!मोठा अनर्थ टळला

खताने भरलेला भरधाव ट्रक गतिरोधकास धडकला.!मोठा अनर्थ टळला

महाराष्ट्र
कंधार (सचिन मोरे) खताने भरलेला भरधाव वेगात लोह्या कडून कंधार कडे येणाऱ्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने वेगवान ट्रक महाराणा प्रताप चौकातील गतिरोधकावर धडकला. त्यामुळे शेकडो नागरिकांचे प्राण वाचले. मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीती वातावरण निर्माण झाले. याबाबत प्रत्यक्ष दर्शनी नागरिकाकडून मिळालेली माहिती अशी की, ५ मे रोजी दुपारी तीन ते चार च्या दरम्यान लोह्याकडून भरधाव वेगात खतांनी भरलेला ट्रक क्रमांक एमएच १२ एनएक्स १९६९ या क्रमांकाचा खतांनी भरलेला ट्रक कंधार कडे येत असताना अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात आले. त्याने प्रसंग अवधान राखत ट्रकवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असताना दगडसांगवी हून कंधारकडे परत येणारी बस क्रमांक एमएच २० बीएल २०४८ या बस ची महाराणा प्रताप चौकामध्ये समोरासमोर टक्कर होताहोता टळली. ट्रक चालकाने प्रसंग अवध...
नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी ५१.५८ कोटींचा कृती आराखडा

नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी ५१.५८ कोटींचा कृती आराखडा

महाराष्ट्र
पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज नांदेड| जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन सन २०२५-२६ या कालावधीसाठी व्यापक कृती आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला असून जानेवारी ते मार्च २०२६ आणि एप्रिल ते जून २०२६ या कालावधीसाठी एकूण सुमारे ५१.५८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हास्तरावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामीण व शहरी भागासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार ग्रामीण भागासाठी २४.१७ दलघमी, नांदेड महानगरपालिका क्षेत्रासाठी ४९.०४ दलघमी, तर नगर परिषद क्षेत्रासाठी २६.७६१ दलघमी असे एकूण ९९.९७१ दलघमी पाणी विविध धरणे व जलाशयांमध्ये आरक्षित करण्यात आले आहे. पाणी टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात...
हिमायतनगरात डिझेल तुटवड्यात गैरप्रकार? कॅनमधून विक्रीवर नागरिकांचा आक्षेप

हिमायतनगरात डिझेल तुटवड्यात गैरप्रकार? कॅनमधून विक्रीवर नागरिकांचा आक्षेप

महाराष्ट्र
हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरातील पेट्रोल पंपांवर सध्या पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवत असताना, काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून कॅनमध्ये डिझेल भरून दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतानाही काही ग्राहकांना जादा दर घेऊन दोन-दोन कॅनमध्ये डिझेल दिले जात असल्याचा आरोप आहे. पंपावरील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता “पंप स्लो चालू आहे” असे कारण दिले जात असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. दरम्यान, सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टर चालक व शेतकऱ्यांना डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र, शेतीच्या नावाखाली डिझेलचा साठा करून त्याची अवैध विक्री होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. वाहनधारका...
विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

क्रीडा
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध खेळांचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि. १५ ते २९ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ६.०० ते ८.०० आणि सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी पार पडणार आहे. या शिबिरासाठी जिल्ह्यातील एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, क्लब, अकादमी तसेच क्रीडा प्रशिक्षक व मार्गदर्शक यांनी आपण घेऊ इच्छित असलेल्या खेळांचे नाव, प्रशिक्षणाचे स्थळ व वेळ (सकाळ/सायंकाळ) नमूद करून लेखी प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोफत प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र द...
केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष दिलासा

केंद्र सरकारचा महाराष्ट्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष दिलासा

शेती
नवी दिल्ली| महाराष्ट्रातील हरभरा (चना) उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये चना खरेदीची कमाल मर्यादा वाढवून ८.१९ लाख मेट्रिक टन करण्यात आली आहे या निर्णयामुळे सुमारे ४,८१६.८० कोटी रुपयांची किमान आधारभूत किंमत सुरक्षा आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य व हमीभाव मिळावा यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. याबरोबरच खरेदीची अंतिम मुदत वाढवून २९ मे २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे जे शेतकरी वेळेत आपला माल विकू शकले नाहीत, त्यांनाही आता या आधारभूत किंमतीचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील हरभरा उत्पादकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे....
माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांना पद्मश्री देण्याची मागणी; नांएसोच्या कृतज्ञता सोहळ्यात मान्यवरांचा सूर

माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांना पद्मश्री देण्याची मागणी; नांएसोच्या कृतज्ञता सोहळ्यात मान्यवरांचा सूर

महाराष्ट्र
नांदेड| सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांना त्यांच्या सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन पद्मश्री पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कृतज्ञता सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केली. डॉ. काब्दे यांच्या निवृत्ती निमित्त नांदेड एज्युकेशन सोसायटीतर्फे पुरणमल लाहोटी सभागृहात कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे नूतन अध्यक्ष सीए (डॉ.) प्रवीण पाटील होते. यावेळी उपाध्यक्ष ॲड. प्रफुल अग्रवाल, सचिव प्रा. श्यामल पत्की, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, कार्यकारिणी सदस्य ॲड. चिरंजीलाल दागडिया, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. काब्दे यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर द...
error: Content is protected !!