महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

केळी उत्पादकांच्या संतापाचा उद्रेक; भावघसरणीमुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव, बाजार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

केळी उत्पादकांच्या संतापाचा उद्रेक; भावघसरणीमुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव, बाजार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

शेती
नांदेड, प्रतिनिधी| केळीच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, न्याय्य भाव मिळावा आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीला आळा बसावा यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना बाजारात केळीला मिळणारा भाव मात्र कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चही निघत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा वाढला असून, केळी बागा टिकवणेही कठीण झाले आहे. यावेळी शेतकरी शिष्टमंडळाने केळी दर नियंत्रणासाठी स्वतंत्र जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी, व्यापारी आणि दलालांच्या व्यवहारात पारदर्शकता आणावी, तसेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी केली. शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले की, दर ठरविताना शे...
अमृत भारत योजनेतील कोट्यवधींच्या खर्चानंतरही हिमायतनगर रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सुविधांपासून वंचित?

अमृत भारत योजनेतील कोट्यवधींच्या खर्चानंतरही हिमायतनगर रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सुविधांपासून वंचित?

तेलंगणा, महाराष्ट्र
हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार| अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले असले, तरी आजही अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केवळ रंगरंगोटी करून विकासाचा देखावा उभा करण्यात आला असून, प्रत्यक्षात प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी मात्र कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. स्थानकावरील वेटिंग हॉल बहुतेक वेळा बंद राहत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळापासून बंद असलेली पार्सल सेवा अद्याप सुरू न झाल्याने व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. स्थानक परिसरात रेल्वे पोलीस चौकी नसल्याने चोऱ्यांच्या घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्लॅटफॉर्म परिसरात दारुड्यांचा वावर वाढल्याने महि...
सोनारी फाट्यावर भरधाव चारचाकीचा कहर; दोन दुचाकींना उडवले!

सोनारी फाट्यावर भरधाव चारचाकीचा कहर; दोन दुचाकींना उडवले!

महाराष्ट्र
एकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी; स्पीड ब्रेकरच्या मागणीकडे महामार्ग विभागाचे दुर्लक्ष  हिमायतनगर : अनिल मादसवार| हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाटा येथे भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याची भीषण घटना शनिवार, दि. २५ जुलै रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगरकडून भोकरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच २६ सीपी ८८६० ने सोनारी फाटा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत टीएस १८ जी १८१७ आणि एमएच २६ बीएस ५२६९ क्रमांकाच्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले. या अपघातात सोनारी येथील शेख जिकरान शेख सिराज आणि शेख सोहेल शेख जहीर हे दोघे गंभीर जखमी झाले. ...
मुदखेड–आदिलाबाद रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या विकासकामांचा डीआरएमकडून आढावा

मुदखेड–आदिलाबाद रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या विकासकामांचा डीआरएमकडून आढावा

महाराष्ट्र, तेलंगणा
अमृत भारत स्थानक योजनेतील कामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश नांदेड, अनिल मादसवार| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) प्रदीप कामले यांनी नांदेड–आदिलाबाद रेल्वे मार्गावरील मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट आणि आदिलाबाद या स्थानकांची पाहणी करून विविध विकासकामे व प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. डीआरएम कामले यांनी रेल्वे मार्गाची रिअर विंडो निरीक्षणाद्वारे तपासणी केली. त्यानंतर अमृत भारत स्थानक (ABS) योजने अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीची पाहणी केली. स्थानकांवरील प्रवासी सुविधा, प्रतीक्षालये, सर्क्युलेटिंग एरिया, वाहनतळ, फलाट, स्वच्छता आणि एकूण देखभालीचीही त्यांनी पाहणी केली. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेली सर्व कामे निर्धारित वेळेत, उच्च दर्जाने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्या...
रिमझिम पावसात काळाचा घाला; टाकराळा फाट्यावर भीषण अपघातात दोन तरुण ठार

रिमझिम पावसात काळाचा घाला; टाकराळा फाट्यावर भीषण अपघातात दोन तरुण ठार

महाराष्ट्र
बोलेरोची दुचाकीला समोरून धडक; एक गंभीर जखमी, हिमायतनगर–भोकर महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, मंगळवारी रात्री टाकराळा बु. फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. रिमझिम पाऊस सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास बोलेरो जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथील बांधकाम मजूर व मिस्त्री दिवसभर राजवाडी परिसरात काम करून दुचाकीने गावाकडे परतत होते. त्याचवेळी हिमायतनगरकडून भोकरच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो जीपने टाकराळा फाट्याजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की दुचाकीवरील ताहेर बेग महेबूब बेग (३५) आणि शेख युनूस शेख खाजा (३४, दोघेही रा. सोनारी) यांचा जाग...
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी नांदेडमध्ये तीव्र निदर्शने

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी नांदेडमध्ये तीव्र निदर्शने

महाराष्ट्र
डावी लोकशाही आघाडी व समविचारी पक्ष-संघटनांचा केंद्र सरकारविरोधात एल्गार नांदेड| केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी, तसेच लाखो विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जप्रकरणी केंद्र सरकारने विद्यार्थी आणि देशवासीयांची माफी मागावी, या मागणीसाठी डावी लोकशाही आघाडी व समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने नांदेड येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात तसेच राष्ट्रीय स्तरावरील पेपरफुटी, NEET गैरव्यवहार आणि शैक्षणिक संस्थांमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये जबाबदारी स्वीकारली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या सर्व प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अथवा केंद्र सरकारने त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. “विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ क...
सोयाबीन बियाणे प्रकरणात सहा कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल

सोयाबीन बियाणे प्रकरणात सहा कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल

शेती
नांदेड| खरीप हंगाम 2026 मध्ये जिल्ह्यातील सोयाबीन बियाणे उगवण तक्रारी आणि प्रयोगशाळेत अप्रमाणित ठरलेल्या नमुन्यांच्या प्रकरणी सहा बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात यंदा 4 लाख 56 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी बियाणे निरीक्षकांनी तपासणी मोहीम राबवली होती. या मोहिमेत 751 सोयाबीन बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालात काही नमुने अप्रमाणित आढळून आले. तसेच बियाण्यांची उगवण न झाल्याबाबत प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पाहणी करण्यात आली. या पाहणीत बियाण्यांमध्ये दोष आढळल्याने संबंधित कंपन्यांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955, बियाणे अधिनियम, 1966, बियाणे नियम, 196...
मतदारांनी गणना पत्र विहित मुदतीत बीएलओंकडे जमा करावे – डॉ. सचिन खल्लाळ

मतदारांनी गणना पत्र विहित मुदतीत बीएलओंकडे जमा करावे – डॉ. सचिन खल्लाळ

महाराष्ट्र
नांदेड| भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी 22 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत बीएलओंमार्फत वितरित करण्यात आलेली गणना पत्रे (Enumeration Form), प्राप्त झालेले अर्ज आणि डिजिटायझेशनच्या प्रगतीची माहिती देण्यात आली. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले की, मतदारसंघात आजअखेर गणना पत्र वाटपाचे 86 टक्के, डिजिटायझेशनचे 67 टक्के काम पूर्ण झाले असून, एकूण 72 टक्के प्रगती झाली आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, ज्या मतदारांना बीएलओंकडून गणना पत्र प्राप्त झाले आहे त्यांनी ते भरून, स्वाक्षरी करून विहित मुदतीत संबंधित बीएलओंकडे जमा करावे. वेळेत गणना पत्र जमा करणाऱ्या...
पीक विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका – तालुका कृषी अधिकारी बिऱ्हाडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

पीक विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका – तालुका कृषी अधिकारी बिऱ्हाडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

शेती
नांदेड| प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६ अंतर्गत पीक विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या हप्त्याव्यतिरिक्त ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) चालकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये, असे आवाहन अर्धापूरचे तालुका कृषी अधिकारी श्री. बिऱ्हाडे यांनी केले आहे. पीक विमा अर्ज भरण्याची सुविधा ग्राहक सेवा केंद्रामार्फत विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील काही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालकांकडून प्रत्येक अर्जामागे सुमारे १०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. शासनाने विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेसाठी अतिरिक्त रक्कम आकारणे नियमबाह्य असून, शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही मागणीस बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. ३१ जुलै अंतिम मुदत - प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६ अंतर्...
लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १३ ऑगस्टपासून सुरुवात

लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १३ ऑगस्टपासून सुरुवात

शेती
फेरी-९ अंतर्गत राज्यभर लसीकरण; १ कोटी लसमात्रांचे वितरण सुरू नांदेड| राज्यातील पशुधनाचे लाळखुरकूत (एफएमडी) या घातक विषाणूजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे ‘लाळखुरकूत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-९’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला १३ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभर सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आयव्हीबीपी संस्थेकडून प्राप्त झालेल्या १ कोटी लसमात्रांचे शीत साखळीच्या माध्यमातून सुरक्षितपणे वितरण सुरू करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेच्या कोल्ड रूममध्ये लस साठवून ठेवण्यात आली असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत लस वेळेत पोहोचविण्याची कार्यवाही सुरू आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक लससाठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यानुसार उपलब्ध १ कोटी लस...
error: Content is protected !!