महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

“संतुलित खत वापर ही काळाची गरज; अवाजवी वापराने वाढतो आरोग्याचा धोका”

“संतुलित खत वापर ही काळाची गरज; अवाजवी वापराने वाढतो आरोग्याचा धोका”

शेती
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर येथे १ जून रोजी ‘माती वाचवा, शेती जगवा’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| रासायनिक खतांच्या अवाजवी व असंतुलित वापरामुळे जमिनीची सुपीकता घटत असून उत्पादन खर्चात वाढ होत आहे. याचबरोबर अन्नधान्यातील रासायनिक अवशेषांमुळे कर्करोगासह (कॅन्सर) विविध गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याची चिंता कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर “संतुलित खत वापर ही काळाची गरज” हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठी पळसपूर येथे ‘माती वाचवा, शेती जगवा’ शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग, हिमायतनगर व कृषी विज्ञान केंद्र, पोखरणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दि. १ जून २०२६, सोमवार रोजी सकाळी ९ वाजता नागनाथ मंदिर, पळसपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी विज...
“धर्माबादलाही मिळणार नवे महत्त्व”; वंदे भारत बासरपर्यंत नेण्याची मागणी

“धर्माबादलाही मिळणार नवे महत्त्व”; वंदे भारत बासरपर्यंत नेण्याची मागणी

महाराष्ट्र, तेलंगणा
नांदेड, गोविंद मुंडकर| “ज्ञान, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीला जोडणारा विकासमार्ग आता रेल्वेच्या रुळांवरून धावला पाहिजे,” अशा ठाम आणि तिखट शब्दांत सीमाभागातील विकासप्रेमींनी मुंबई–नांदेड वंदे भारत एक्सप्रेस थेट बासरपर्यंत वाढविण्याची मागणी पुढे रेटली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे कंदकुर्ती गाव आणि हिंदुस्थानातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माता सरस्वतीच्या पवित्र मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या बासर या गावाला वंदे भारत रेल्वेने जोडण्याची मागणी तेलंगणातील धोडापुर येथील ग्रामस्थ आणि महाराष्ट्रातील बिलोली तालुक्यातील आरळी येथील ग्रामस्थ यांनी केली. दिनांक २८ मे २०२६ रोजी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सीमावर्ती भागात आयोजित विकासप्रेमींच्या बैठकीत या मागणीने अक्षरशः केंद्रस्थानी स्थान मिळवले. सीमाभागातील विकासाच्या प्रश्नांवर चिंतन करताना उपस्थि...
नांदेड जिल्ह्यातील दहा कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने निलंबित ; दोन परवाने कायमस्वरूपी रद्द

नांदेड जिल्ह्यातील दहा कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने निलंबित ; दोन परवाने कायमस्वरूपी रद्द

शेती
कृषी विभागाची धडक कारवाई नांदेड| नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारी, प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि चौकशीअंती कृषी विभाग यांनी कठोर कारवाई करत नायगाव तालुक्यातील सात कृषी सेवा केंद्रांचे खत परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये दशरथ कृषी सेवा केंद्र, केदार कृषी सेवा केंद्र, वसंत अग्रो सर्व्हिस सेंटर, गजानन कृषी सेवा केंद्र, हनुमान कृषी सेवा केंद्र, मातोश्री ॲग्रो एजन्सी आणि शिवकृपा कृषी सेवा केंद्र, नायगाव यांचा समावेश आहे. याशिवाय मे. वर्षा ॲग्रो ट्रेडर्स, खांबाळा ता. मुदखेड, मे. व्यंकटरमणा कृषि सेवा केंद्र, कुरुळा ता. कंधार आणि मे. तिरुमला कृषि सेवा केंद्र, कुरुळा ता. कंधार यांच्या परवान्यांवरही सुनावणीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच मे. शिवकृपा कृषि विकास केंद्र, माळकौठा ता. मुदखेड आणि व्यंकटेश कृषि भांडार, नवीन मों...
कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी

शेती, करियर
ऑनलाईन अर्ज भरण्यास 10 जूनपर्यंत मुदत नांदेड| वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि तंत्र विद्यालय, नांदेड येथे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत 10 जून 2026 आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असून विद्यार्थी अधिकृत प्रवेश संकेतस्थळ येथे अर्ज करू शकतात. राज्य शासनाने 18 मे 1972 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची स्थापना परभणी येथे केली. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांचा विद्यापीठ कार्यक्षेत्रात समावेश आहे. विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार या तीन प्रमुख शाखांपैकी निम्नस्तर कृषि शिक्षण शाखेअंतर्गत शासक...
राज्यात यंदा कमी पावसाचा अंदाज; एल निनोमुळे मान्सूनवर सावट

राज्यात यंदा कमी पावसाचा अंदाज; एल निनोमुळे मान्सूनवर सावट

शेती
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पर्जन्यमान घटण्याची शक्यता; जूनमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबई | यंदाच्या मान्सून हंगामात महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. हवामान खात्याने नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार देशात यंदा सरासरीच्या केवळ ९० टक्के पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये हा अंदाज ९२ टक्के होता. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.  राज्यातील पर्जन्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जून महिन्यात एल निनोचा प्रभाव तुलनेने कमी राहील, मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये त्याचा प्रभाव वा...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एआरटी केंद्राच्या उल्लेखनीय कामगिरीस राज्यस्तरीय गौरव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एआरटी केंद्राच्या उल्लेखनीय कामगिरीस राज्यस्तरीय गौरव

आरोग्य, महाराष्ट्र
नांदेड| शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील एआरटी (ART) केंद्राने एचआयव्ही/एड्स सेवा वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आंध्रप्रदेश येथे आयोजित केंद्रीय आढावा बैठकीमध्ये “Good Performance in ART Service Delivery” या मानांकनांतर्गत महाराष्ट्र राज्यास प्रथम श्रेणीचा सन्मान प्राप्त झाला असून, या यशामध्ये नांदेड जिल्ह्यातील एआरटी विभागाच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS), मुंबई यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथील एआरटी केंद्राला अधिकृत प्रशस्तीपत्र (Letter of Appreciation) प्रदान करून गौरविण्यात आले. या प्रशस्तीपत्रात केंद्राच्या उल्लेखनीय कार्याबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. ही य...
‘मृत्यूचा सापळा’ ठरलेला खडकी रस्ता; दुरुस्त न झाल्यास २५ जूनला रस्ता रोको करण्याचा इशारा

‘मृत्यूचा सापळा’ ठरलेला खडकी रस्ता; दुरुस्त न झाल्यास २५ जूनला रस्ता रोको करण्याचा इशारा

महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) फाटा ते खडकी (बा.) गाव तसेच खडकी (बा.) ते घारापूर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तब्बल ८ ते १० वर्षांपासून रस्ता खड्डेमय व धोकादायक बनला असून, तात्काळ दुरुस्ती व डांबरीकरण न झाल्यास २५ जून रोजी नांदेड–किनवट महामार्गावर खडकी फाट्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. समस्त खडकी (बा.) येथील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावासाठी हा रस्ता जीवनवाहिनी असला तरी आज तो ‘मृत्यूचा मुख्य दरवाजा’ बनला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांना दररोज हिमायतनगरला शिक्षणासाठी जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर गंभीर बाब म...
खत विक्रेत्यांना कृषी विभागाची सक्त ताकीद; हिमायतनगरचा खत साठा बाहेर पाठवल्यास कारवाई

खत विक्रेत्यांना कृषी विभागाची सक्त ताकीद; हिमायतनगरचा खत साठा बाहेर पाठवल्यास कारवाई

शेती
शेतकऱ्यांच्या लुटीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारीनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची खतासाठी होणारी अडवणूक, जादा दराने विक्री आणि स्थानिक साठा परस्पर बाहेर पाठविल्या जात असल्याच्या गंभीर तक्रारीनंतर कृषी विभाग अखेर अॅक्शन मोडमध्ये आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेला खत साठा बाहेरील तालुका, जिल्हा किंवा राज्यात वळवला गेला तर संबंधित कृषी सेवा केंद्रांवर थेट कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटिल वडगांवकर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची खतासाठी कृषी दुकानदारांकडून अडवणूक व आर्थिक लूट होत असल्याची गंभीर तक्रार कृषी विभागाकडे केली होती. तसेच हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेला खत साठा परस्पर विदर्भ, तेलंगणा व बा...
बोगस बियाणे व खत विक्रीवर कारवाईचा इशारा

बोगस बियाणे व खत विक्रीवर कारवाईचा इशारा

शेती
कृषी व्यापाऱ्यांना किसान सेलचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या कडक सूचना हदगाव/हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील सर्व कृषी व्यापाऱ्यांना बोगस बियाणे, खताचा साठा करून जास्त दराने विक्री तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आमदार बाबुराव कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रमुख विवेक देशमुख यांच्या सूचनेनुसार किसान सेनेचे तालुका प्रमुख प्रकाश जाधव (प्रकाश भिया जाधव) यांनी ही सूचना जारी केली आहे. किसान सेना व शिंदे सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, तालुक्यात बोगस बियाणे किंवा खताचा साठा करून जास्त दराने विक्री करणारे व्यापारी आढळल्यास संबंधितांवर शासनामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून देण्यात आल्या असून, अशा गैरप्...
वारंगटाकळी शिवारात वासराचा फडशा; हिमायतनगर तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत, शेतकरी भयभीत

वारंगटाकळी शिवारात वासराचा फडशा; हिमायतनगर तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत, शेतकरी भयभीत

शेती
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत डोके वर काढताना दिसत असून, वारंगटाकळी शिवारातील ताज्या घटनेने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. सोमवारी मध्यरात्री वारंगटाकळी येथील शेतकरी आशिष ज्ञानेश्वर मोहिते यांच्या वासराचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली असून, या हल्ल्यामागे बिबट्याचा सहभाग असल्याची जोरदार शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी परिसरात भीतीचे सावट पसरले असून शेतकरी अक्षरशः दहशतीखाली वावरत आहेत. काही महिन्यांपूर्वीही याच परिसरात बिबट्याने जनावरांवर हल्ले करत मोठी दहशत निर्माण केली होती. आता पुन्हा त्याच पद्धतीने पाळीव जनावरांवर हल्ले सुरू झाल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शेतकरी रात्रभर शेतात जाण्यास धजावत नाहीत, तर मजूरही कामावर जाण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्...
error: Content is protected !!