शेती

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

मुखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या

मुखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या

शेती
शेतकरी पुत्रांचे तहसीलदारांना निवेदन; भारनियमन कमी करण्याचीही मागणी मुखेड/नांदेड, प्रतिनिधी| मुखेड तालुक्यात पावसाने घेतलेल्या दीर्घ खंडामुळे पिके करपली असून, अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने शेती काळी पडली आहे. त्यामुळे मुखेड तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी पुत्रांनी तहसीलदार शंकर लाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक ठिकाणी पिके करपली असून, काही भागात बियाणे उगवलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पिकांची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर शेतकऱ्...
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : आधुनिक शेतीसाठी अनुदानाची सुवर्णसंधी; महाडीबीटीवर अर्ज सुरू

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : आधुनिक शेतीसाठी अनुदानाची सुवर्णसंधी; महाडीबीटीवर अर्ज सुरू

शेती
नांदेड| एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी नांदेड जिल्ह्यास रु. २६८.३६ लाखांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. फळबाग लागवड, रोपवाटिका, हरीतगृह, शेडनेट, शेततळे, कांदाचाळ, अळिंबी उत्पादन, मधुमक्षिकापालन, कृषी यांत्रिकीकरण, शीतगृह, पॅक हाऊस आदी विविध घटकांसाठी आकर्षक अनुदान उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार राधाकृष्ण कळसाईत यांनी केले आहे. या अभियानाचा उद्देश आधुनिक, शाश्वत आणि कमी खर्चातील शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे. यामध्ये खाजगी क्षेत्रातील लहान व मोठ्या रोपवाटिका, विविध फळपिकांची लागवड, अळिंबी व बीज उत्पादन केंद्र, कंपोस्ट युनिट, सुगंधी व औषधी वनस्पती, फुलशेती, मसाला पिके, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक व वैयक्तिक शेततळे, हरीतगृह, शेडनेट, प्लास्टिक मल्च...
खरीप पीक विम्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत; शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत

खरीप पीक विम्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत; शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत

शेती
नांदेड| खरीप हंगाम 2026 साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत असून, या मुदतीत कोणतीही वाढ होणार नसल्याने शेतकऱ्यांनी विलंब न करता तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा काढावा. योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा विमा प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे....
फक्त 10 टक्के खर्चात बसवा सूक्ष्म सिंचन संच; विशेष मोहीम सुरू

फक्त 10 टक्के खर्चात बसवा सूक्ष्म सिंचन संच; विशेष मोहीम सुरू

शेती
नांदेड| अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना – “प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन)” अंतर्गत विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम 1 ते 31 जुलै 2026 या कालावधीत राबवली जात असून पात्र शेतकऱ्यांना 90 टक्केपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेत ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान उपलब्ध असून पात्र शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के खर्च करावा लागणार आहे. अर्जासाठी शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, शासकीय ओळखपत्र, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करावेत. अर्ज स्वीकारताना “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वानुसार प्रक्रिया केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी सीएससी केंद्र, सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृष...
पावसासाठी वाघी गावातील महिलांचे साकडे; पैनगंगा नदीचे पाणी आणून मारुतीराय व गणरायाचा जलाभिषेक

पावसासाठी वाघी गावातील महिलांचे साकडे; पैनगंगा नदीचे पाणी आणून मारुतीराय व गणरायाचा जलाभिषेक

शेती
दहा-बारा दिवसांपासून पाऊस गायब; सुकणाऱ्या पिकांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावातील महिलांनी पावसासाठी अनोखी प्रार्थना सुरु केली आहे. महिलांनी पैंनगंगा नदीतून पायी चालत जाऊन पाणी आणून गावातील मारुतीराय आणि श्री गणपती बाप्पाचा जलाभिषेक करत वरुणराजाने कृपा करावी आणि यंदाचा खरीप हंगाम सुगीचा व्हावा, असे साकडे घातले आहे. यंदा हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी हळद लागवडीवर मोठा भर दिला असून, त्याचबरोबर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे पेरण्या पूर्ण झाल्या; मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सलग दहा-बारा दिवस पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिके सुकू लागली असून, ...
पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत; शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी

पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत; शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी

शेती
नांदेड | खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, वादळ तसेच इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत असून, पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केले आहे. या योजनेत अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना स्वेच्छेने सहभागी होता येणार आहे. मात्र, AGRISTACK Farmer ID आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) अंतर्गत पिकांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकराराची माहिती पीक विमा पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक राहील. योजन...
पावसाने फिरवली पाठ; हिमायतनगरात खरीप धोक्यात, कृषी विभागाच्या भूमिकेवरही शेतकऱ्यांचा संताप

पावसाने फिरवली पाठ; हिमायतनगरात खरीप धोक्यात, कृषी विभागाच्या भूमिकेवरही शेतकऱ्यांचा संताप

शेती
उगवलेली पिके करपू लागली; बोगस बियाण्यांच्या संशयाने शेतकरी हवालदिल हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात पावसाने अचानक दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून, उगवलेली पिके करपू लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून समाधानकारक पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आणि हळद पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. वेळेत पाऊस झाला नाही तर हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. मान्सूनच्या सुरुवातीला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र दोन-तीन दिवसांच्या हलक्या सरींनंतर पावसाने पाठ फिरवली. परिणामी जमिनीतील ओलावा संपत चालला असून, अनेक शेतांमध्ये उगवलेली रोपे करपू लागली आहेत. हलक्या जमिनीवरील पिकांची अवस्था सर्वाधिक गंभीर आहे. ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण असून, अनेक ठिकाणी शेतकरी पावसासा...
उत्कृष्ट कार्याबद्दल पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचा सत्कार

उत्कृष्ट कार्याबद्दल पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचा सत्कार

शेती
नांदेड | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत प्रभावी प्रशिक्षणाचे आयोजन करून पशुपालकांना मार्गदर्शन करणाऱ्या तसेच दुग्धविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. नायगाव येथील डॉ. गौतम खिल्लारे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत पाच दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भोकर येथील डॉ. संजय रोळे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आणि डॉ. अविनाश बुन्नावार, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी एक दिवसीय प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. सतीश खिल्लारे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. ...
नांदेडमध्ये १ लाख बांबू लागवड मोहिमेला प्रारंभ; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते शुभारंभ

नांदेडमध्ये १ लाख बांबू लागवड मोहिमेला प्रारंभ; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते शुभारंभ

शेती
३७.५० लाख वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम नांदेड | पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि हरित नांदेडच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत मृद व जलसंधारण विभागाच्या १ लाख बांबू लागवड मोहिमेचा शुभारंभ आज मौजे सालेगाव (ता. धर्माबाद) येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आला. यंदाच्या पावसाळी हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी ३७ लाख ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्याअंतर्गत मृद व जलसंधारण विभागाला १ लाख बांबू लागवडीचे विशेष उद्दिष्ट देण्यात आले आहे. पूर्ण झालेल्या नाला खोलीकरण व इतर जलसंधारण कामांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी राऊत, तहसीलदार श्रीमती स्वामी, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. कांबळे, उपवि...
नवतंत्रज्ञान व जोड व्यवसायातून शेतीची प्रगती साधा : संदीप माळोदे

नवतंत्रज्ञान व जोड व्यवसायातून शेतीची प्रगती साधा : संदीप माळोदे

शेती
जिल्हा परिषदेत कृषी दिन उत्साहात साजरा; पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव नांदेड| शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती अधिक उत्पादनक्षम करावी. तसेच पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्यव्यवसाय यांसारख्या जोड व्यवसायांची सांगड घालून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि पंचायत समिती, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कै. वसंतराव नाईक जयंती आणि कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संदीप माळोदे बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पूनम पवार, कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. अर...
error: Content is protected !!