सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांविरोधातील उपोषणाचा दुसरा दिवस; प्रशासनाची उदासीनता चर्चेत

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांविरोधातील उपोषणाचा दुसरा दिवस; प्रशासनाची उदासीनता चर्चेत

सामाजिक
नांदेड| जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी व मुलांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाकडे प्रशासनाने दुसऱ्या दिवसाअखेरही दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पत्नी दैवशाला जगदीश बारदेवाड यांनी आपल्या चिमुकल्यांसह 6 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पतीकडून मानसिक छळ, पालनपोषणाचा अभाव आणि गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहण्याचा आरोप त्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत: मुलांच्या पालनपोषण व शिक्षणाचा खर्च करावा, जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे द्यावीत, सेवापुस्तिकेत पत्नी व मुलांची नोंद करावी, कुटुंबासोबत राहून जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, घराचे थकीत हप्ते भरावेत आदी मागण्याचा समवेश आहे. दरम्यान, उपोषणाचा दुसरा दिवस उलटूनही प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याचा आरोप करण्यात य...
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे ८ एप्रिलपासून सर्वेक्षण

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे ८ एप्रिलपासून सर्वेक्षण

सामाजिक
नांदेड| खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत राज्यभर व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात हे सर्वेक्षण ८ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या या स्वायत्त संस्थेमार्फत अशा खुल्या प्रवर्गातील जाती-घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात, ज्यांना इतर शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही. युवक-युवतींसह सर्व वयोगटातील लाभार्थ्यांच्या उन्नतीसाठी अमृत संस्था कार्यरत आहे. या सर्वेक्षणात सध्या ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य अशा २५ जातींचा समावेश करण्यात आला आह...
होमगार्डच्या सतर्कतेमुळे पाच महिन्यांनी वडील-मुलाची भावनिक भेट

होमगार्डच्या सतर्कतेमुळे पाच महिन्यांनी वडील-मुलाची भावनिक भेट

सामाजिक
लोहा| घरातून निघून गेलेल्या वृद्ध पित्याची तब्बल पाच महिन्यांनंतर मुलासोबत पुनर्भेट घडवून आणण्याची हृदयस्पर्शी घटना लोहा बसस्थानकात घडली. होमगार्ड जवान पांडुरंग सोनकांबळे यांच्या सतर्कतेमुळे हे शक्य झाले. हिंगोली जिल्ह्यातील खानापूर येथील मारुती तुकाराम पवार पाटील हे वृद्ध व्यक्ती काही महिन्यांपूर्वी घर सोडून गेले होते. मुलांनी शेती विकल्याची खंत मनात ठेवून त्यांनी घर सोडले होते. पंढरपूरला जात असल्याचे सांगून ते निघाले आणि त्यानंतर तुळजापूर, कोल्हापूर अशा ठिकाणी फिरत राहिले. गेल्या पाच महिन्यांपासून ते भटकंती करत होते. दरम्यान, ते लोहा बसस्थानकात अत्यंत अशक्त अवस्थेत, मळक्या कपड्यांमध्ये एका कोपऱ्यात झोपलेले आढळले. त्या वेळी ड्युटीवर असलेल्या होमगार्ड जवान पांडुरंग सोनकांबळे यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले. तीन दिवसांपासून उपाशी असलेल्या या वृद्धाला त्यांनी प्रथम अन्न व पाणी देऊन आधार दिला....
अबुबकर देवस्थान परिसरात कचरा टाकण्यावर नागरिकांचा आक्रोश; तात्काळ कारवाईची मागणी

अबुबकर देवस्थान परिसरात कचरा टाकण्यावर नागरिकांचा आक्रोश; तात्काळ कारवाईची मागणी

सामाजिक
हिमायतनगर,अनिल मादसवार | शहरातील टेंभी रोड परिसरातील अबुबकर देवस्थानाच्या जागेत नगरपंचायतीकडून कचरा टाकला जात असल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत नागरिकांनी मुख्याधिकारी, नगर पंचायत हिमायतनगर यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरातील कचरा ट्रॅक्टरद्वारे टेंभी रोडवरील माळरान भागात, अबुबकर देवस्थानाच्या जागेत टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचून दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना नाकाला रुमाल बांधावा लागत असून, जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे धूर व धूळ निर्माण होत आहे. या धुरामुळे डोळ्यांची जळजळ होत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, येत्या १० एप्रिल रोजी अबुबकर य...
नांदेडमध्ये “कायापालट” उपक्रमाचा मानवतेचा स्पर्श

नांदेडमध्ये “कायापालट” उपक्रमाचा मानवतेचा स्पर्श

सामाजिक
नांदेड| शहरात उपेक्षित, निराधार आणि मानसिक आजारग्रस्त व्यक्तींना सन्मानाने जगण्याची नवी दिशा देणारा “कायापालट” उपक्रम एप्रिल महिन्याच्या पहिल्या सोमवारी ७४ व्या महिन्यातही अत्यंत तळमळीने पार पडला. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून यावेळी ४७ भ्रमिष्ट व्यक्तींना स्वच्छतेसह सन्मानाचे जीवन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या ७४ महिन्यांत ३७०० हून अधिक बेघर, भिकारी आणि मानसिक आजारग्रस्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा हा उपक्रम आता नांदेडच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरत आहे. या उपक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, ॲड. चैतन्य देशमुख, भाजपा अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख तसेच लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांचे मार्गदर्शन लाभत आहे. भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्र...
दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन उदासीन ; ८ एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा

दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन उदासीन ; ८ एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा

सामाजिक
नांदेड| जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सर्वसमावेशक दिव्यांग सशक्तीकरण असोसिएशन (नोंदणी प्रक्रिया सुरू), दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र, तसेच बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीसह विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी सांगितले की, दिव्यांगांच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजनेतील थकीत मानधन तात्काळ जमा करावे, आमदार व खासदार निधीतून दिव्यांगांसाठी राखीव निधी खर्च करावा, DPDC अंतर्गत १% निधीचा वापर करावा, जिल्हाधिकारी बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करावी, दिव्यांग सक्षमीकरण विभागातील अधिकाऱ...
रेल मददमुळे प्रवासी तक्रारींमध्ये मोठी घट; नांदेड विभागाची उल्लेखनीय कामगिरी

रेल मददमुळे प्रवासी तक्रारींमध्ये मोठी घट; नांदेड विभागाची उल्लेखनीय कामगिरी

सामाजिक
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवासी सेवांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळत असून, आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये रेल मदद (Rail Madad) या तक्रार निवारण मंचाद्वारे नोंदविल्या जाणाऱ्या प्रवासी तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. विभागातील विविध शाखांनी समन्वय साधत तक्रारींवर जलद प्रतिसाद देणे, त्यांचे प्रभावी निवारण करणे आणि सतत देखरेख ठेवणे या उपाययोजनांमुळे गाड्या व स्थानकांवरील प्रवासी अनुभवात सकारात्मक बदल दिसून आला आहे. परिणामी, प्रवाशांचा रेल्वे सेवांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. विशेष म्हणजे, नांदेड विभागातील महत्त्वाची गाडी असलेल्या सचखंड एक्सप्रेसबाबतच्या प्रवासी तक्रारींमध्ये तब्बल ४६ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. याशिवाय, विभागाअंतर्गत धावणाऱ्या सर्व गाड्यांबाबत एकूण २६ टक्के तक्रारी कमी झाल्या आहेत, ही बाब विभागाच्या कार्यक्षमतेचे द्योतक मानली जात आ...
दुष्काळी फाट्यावर रस्ता खचला; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात, प्रशासनाला तात्काळ दुरुस्तीची मागणी

दुष्काळी फाट्यावर रस्ता खचला; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात, प्रशासनाला तात्काळ दुरुस्तीची मागणी

सामाजिक
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) सिरंजनी–हिमायतनगर या महत्त्वाच्या मार्गावरील दुष्काळी फाटा येथे सीडी वर्कमधील सिमेंट पाईपला मोठे छिद्र पडल्याने रस्ता खचून पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, एसटी बस सेवा देखील बंद करण्यात आली आहे. यामुळे विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या परीक्षा सुरू असताना वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचणे कठीण झाले असून काहींना परीक्षा चुकवावी लागत आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी अशा परिस्थितीत ग्रामस्थांनी श्रमदानातून दोन वेळा रस्ता सुरू केला होता. मात्र सध्या शेतीच्या हंगामामुळे शेतकरी कामात व्यस्त असल्याने यावेळी स्थानिक पातळीवर दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, ग्रामपंच...
हिमायतनगरात वाढते अपघात; स्पीड ब्रेकरसाठी काँग्रेसचा इशारा – “नाही तर रास्ता रोको”

हिमायतनगरात वाढते अपघात; स्पीड ब्रेकरसाठी काँग्रेसचा इशारा – “नाही तर रास्ता रोको”

सामाजिक
हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून काही जण कायमचे अपंग झाले आहेत. त्यामुळे शहरातील धोकादायक ठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवून संभाव्य अपघात टाळावेत, अशी ठाम मागणी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण यांनी ALMbharat च्या माध्यमातून केली आहे. हिमायतनगर शहरातीळ विशेषतः रेल्वे स्थानकाकडे जाणारा कॉर्नर, श्री परमेश्वर मंदिर कमान रस्ता, शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस) परिसर, उमर चौक कमान तसेच बोरगडी रस्ता या शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि अपघातप्रवण ठिकाणी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. यासंदर्भात संबंधित विभागाला अनेक वेळा सूचना देऊनही प्रशासनाने दुर्ल...
असरजन नाका–वाघाळा रस्ता खड्डेमय; वर्षभरापासून नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी

असरजन नाका–वाघाळा रस्ता खड्डेमय; वर्षभरापासून नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी

सामाजिक
नांदेड (प्रतिनिधी)मनपा हद्दीतील असरजन नाका ते वाघाळा दरम्यानचा रस्ता ड्रेनेज लाईनच्या कामामुळे पूर्णतः नादुरुस्त झाला असून गेल्या वर्षभरापासून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. खड्डेमय रस्ता, चिखल आणि अडकणारी वाहने यामुळे परिसरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रभाग क्रमांक २० मधील त्रिमूर्ती नगर, विठ्ठल नगर, साईबाबा नगर आणि श्रीराम नगर या भागात जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. या परिसरात पोलीस कर्मचारी, डॉक्टर तसेच सैन्यदलातील जवानांचे कुटुंबीय वास्तव्यास असूनही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ड्रेनेज काम अपूर्ण; रस्ता अधांतरी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ता मधोमध खोदण्यात आला; मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे, तर अनेक ठिकाणी कनेक्शनही देण्यात आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे ...
error: Content is protected !!