सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजांचे प्रेरणास्थान : डॉ. राम वाघमारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजांचे प्रेरणास्थान : डॉ. राम वाघमारे

सामाजिक
अर्धापूर| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून सर्व समाजांचे प्रेरणास्थान आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी केले. येथील डॉ. आंबेडकर नगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राम वाघमारे बोलत होते. कार्यक्रमास विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. वाघमारे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या समता, शिक्षण आणि मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली. भीमजयंती साजरी करताना केवळ एक दिवसापुरता उत्साह न ठेवता तो वर्षभर टिकवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच वाचन संस्कृती वाढवून समाजप्रबोधनासाठी पुढाकार घेण्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात प्रज्ञा बुद्ध विहार येथे पंचशील ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर गाथा पठनाचा कार्यक्रम पार पडल...
उष्णतेच्या तीव्र लाटेत गुरुद्वारा सचखंड श्री हजुर साहिबला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कडक व्यवस्था – डॉ. विजय सतबीर सिंघ  

उष्णतेच्या तीव्र लाटेत गुरुद्वारा सचखंड श्री हजुर साहिबला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कडक व्यवस्था – डॉ. विजय सतबीर सिंघ  

धर्म अध्यात्म, सामाजिक
नांदेड | मराठवाड्यात सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे येणाऱ्या भाविकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देश-विदेशातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना उष्णतेपासून संरक्षण मिळावे, यासाठी गुरुद्वारा प्रशासनाने कडक उपाययोजना राबवल्या आहेत. गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ यांच्या निर्देशानुसार, सर्व प्रवेशद्वारांवर व स्थानिक गुरुद्वारांमध्ये थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी निवासस्थाने, कार्यालये व गुरुद्वारांमध्ये प्रथमोपचार (First-Aid) किट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय, लंगरसोबत भाविकांना थंड लस्सी दिली जात असून वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिका सतत सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २ व ३ मे २०२६ रोजी होणाऱ्या सामूहिक विवाह ...
“माँ गंगा गोदावरी शुद्धीकरण अभियान”चा 128 वा आठवडा यशस्वी

“माँ गंगा गोदावरी शुद्धीकरण अभियान”चा 128 वा आठवडा यशस्वी

सामाजिक
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहरात सुरू असलेल्या “माँ गंगा गोदावरी शुद्धीकरण संकल्प अभियान” अंतर्गत वचनपूर्तीचा 128 वा आठवडा रविवारी (दि. 26 एप्रिल 2026) यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या उपक्रमात श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र, सोमेश कॉलनी येथील स्वयंसेवकांसह नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी अचानक गोदावरी तटावर भेट देऊन स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत स्वच्छता अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. अभियानाच्या उद्दिष्टांबाबत व भविष्यातील नियोजनावरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या उपक्रमामुळे गोदावरी नदी परिसर स्वच्छ व सुंदर राखण्यास मोठा हातभार लागत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशी माहिती ज्येष्ठ स्वयंसेवक तथा नेहरू इंग्लिश स्कूलचे प्रधाना...
उद्घाटनानंतरच कुलूप! हिमायतनगरात आयुष्मान आरोग्य मंदिर वर्षभरापासून बंद

उद्घाटनानंतरच कुलूप! हिमायतनगरात आयुष्मान आरोग्य मंदिर वर्षभरापासून बंद

आरोग्य, सामाजिक
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड हिमायतनगर, अनिल मादसवार | सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मागील वर्षी हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये येणाऱ्या संभाजीनगर येथे मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेले “आयुष्मान आरोग्य मंदिर” उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवसापासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल वर्षभर उलटूनही हे केंद्र बंदच असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिकांच्या मते, उद्घाटनाच्या दिवशी मोठ्या घोषणाबाजी आणि गाजावाजा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात सेवा सुरू होण्याऐवजी दुसऱ्याच दिवशी दाराला कुलूप लागले. त्यानंतर आजपर्यंत येथे कोणतीही आरोग्य सेवा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे “हे आरोग्य मंदिर आहे की बंद मंदिर?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आधीच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मर्यादित असताना अशा प्रकारे उभारलेले केंद्र निष्क्रिय ठेवणे ही ग...
भोकर तालुक्यातील जाकापुरमध्ये तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांची प्रशासनाकडे धाव

भोकर तालुक्यातील जाकापुरमध्ये तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांची प्रशासनाकडे धाव

सामाजिक
नांदेड/भोकर | भोकर तालुक्यातील जाकापुर येथे भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. विहिरी कोरड्या पडल्या असून पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. ग्रामस्थांना रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी जागरण करावे लागत असून, अनेकांना लांब अंतर पायपीट करून केवळ एक घागर पाणी मिळवावे लागत आहे. महिलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर याचा सर्वाधिक परिणाम होत असून, दैनंदिन गरजाही भागवणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती 2026 मध्येही कायम असल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना एवढा संघर्ष करावा लागणे ही गंभीर बाब असल्याची बाब सोशल मीडियाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न श्रीधर जाधव यांनी केला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ टँकरद्वारे प...
मुन्ना भाऊ शिंदे यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; प्रकृती खालावल्याने उपचार सुरू

मुन्ना भाऊ शिंदे यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; प्रकृती खालावल्याने उपचार सुरू

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा अध्यक्ष मुन्ना भाऊ शिंदे यांनी दिनांक 21 एप्रिलपासून सुरू केलेले आमरण उपोषण प्रकृती खालावल्यामुळे 23 एप्रिलच्या रात्री तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे काही दिवसांपासून तणावपूर्ण असलेले शहरातील वातावरण आता काहीसे निवळले असून जाहीर करण्यात आलेला हिमायतनगर बंदही मागे घेण्यात आला आहे. परिणामी बाजारपेठ पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. उपोषणादरम्यान वाढत्या उन्हाचा तडाखा आणि अन्न-पाण्याचा पूर्ण अभाव यामुळे मुन्ना भाऊ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तत्काळ हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर...
हिमायतनगरमध्ये जुन्या ग्रामपंचायत इमारतीला ‘डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह’ नाव देण्याची मागणी

हिमायतनगरमध्ये जुन्या ग्रामपंचायत इमारतीला ‘डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह’ नाव देण्याची मागणी

सामाजिक
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील जुन्या ग्रामपंचायत इमारतीचे नामकरण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करून तेथे सांस्कृतिक सभागृह, वाचनालय व अभ्यासिका सुरू करावी, अशी मागणी डॉ. अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी समाज विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. नगरपंचायत कार्यालयातील मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गंगाधर मामीडवार सावकार यांनी दान दिलेल्या जागेत १९९० ते १९९५ या कालावधीत समाजमंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. या ठिकाणी सर्व समाजासाठी सार्वजनिक वाचनालयही सुरू करण्यात आले होते. नंतर हिमायतनगर येथे न्यायालयास मंजुरी मिळाल्यानंतर जागेअभावी हे समाजमंदिर ग्रामपंचायत कार्यालयासाठी वापरण्यात आले. त्यामुळे वाचनालय बंद पडले. आता नगरपंचायत कार्यालय अन्यत्र स्थलांतरित झाल्याने ही इमारत पुन्हा समाजाच्या उपयोगासाठी उपलब...
‘कूल रूफिंग’चा प्रभावी परिणाम; नांदेडमध्ये तापमानात ७-८ अंशांची घट, १०० कुटुंबांना दिलासा

‘कूल रूफिंग’चा प्रभावी परिणाम; नांदेडमध्ये तापमानात ७-८ अंशांची घट, १०० कुटुंबांना दिलासा

सामाजिक
नांदेड| शहरातील गरजू वस्त्यांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘कूल रूफिंग’ उपक्रमामुळे घरांच्या आतील तापमानात तब्बल ७ ते ८ अंश सेल्सिअसने घट झाल्याचे दिसून आले आहे. या उपक्रमामुळे सुमारे १०० कुटुंबे व लघु व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा अभिनव प्रकल्प संस्कृती संवर्धन मंडळ, Practical Action (PAC) आणि AIDMI यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निसर्ग आधारित उपाय’ (Nature-Based Solutions) अंतर्गत राबविण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत लहान व कमी उंचीच्या घरांच्या छतांवर ‘कूल रूफिंग’ तंत्रज्ञान वापरून उष्णता परावर्तित केली जाते, ज्यामुळे घरातील तापमान लक्षणीयरीत्या कमी होते. कडक उन्हाळ्यात घरांसह छोट्या व्यावसायिक जागांमधील उकाडा कमी झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य झाले आहे. या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विष्णुनगर परिसरातील लाभार्थ्यांच्या घरी भे...
भरधाव हायवांमुळे वाढता धोका; अपघातांच्या मालिकेनंतर संताप व्यक्त

भरधाव हायवांमुळे वाढता धोका; अपघातांच्या मालिकेनंतर संताप व्यक्त

सामाजिक
नांदेड| शहरात भरधाव धावणाऱ्या हायवा वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून निष्पाप नागरिकांचे जीव जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. काल लातूर फाटा येथे पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर परवा एका शाळकरी मुलाला अल्पवयीन चालकाने चिरडल्याची घटना घडली. यापूर्वी ढवळे कॉर्नर येथे एका कीर्तनकार महाराजांचा अपघातात मृत्यू झाला होता. तसेच आज भरधाव हायवाने वीजेचा पोल, तारा आणि साईबाबा कमान पाडल्याची घटना घडली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक डॉ. अभिषेक सौदे यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला कठोर कारवाईची मागणी केली आहे. वारंवार सूचना देऊनही हायवा चालक व मालक नियम पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील कौठा, वसरणी, असर्जन, सिडको, हडको आणि असदवन या भागात सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत हायवा वाहतूक पूर्णतः बंद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा जनतेला रस...
हिमायतनगरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेच्या मागणीवरून उपोषणाचा इशारा

हिमायतनगरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेच्या मागणीवरून उपोषणाचा इशारा

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या मागणीसाठी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी नगरपंचायत प्रशासनास निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, यापूर्वी दि. १७ फेब्रुवारी व ३१ मार्च २०२६ रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी उपनगराध्यक्ष व प्रशासनाने १५ एप्रिलपर्यंत मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र अद्यापही पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने वारंवार आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप करत, दि. २१ एप्रिल २०२६ पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा...
error: Content is protected !!