सामाजिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम; ९.८६ कोटी मतदारांची होणार प्रत्यक्ष पडताळणी

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम; ९.८६ कोटी मतदारांची होणार प्रत्यक्ष पडताळणी

सामाजिक
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून, त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेत राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. राज्यातील एकूण ९,८६,४४,४१३ मतदारांच्या तपशीलांची खातरजमा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून नियुक्त करण्यात येणारे ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) देखील सहकार्य करणार आहेत. दुबार नावे, मृत व्यक्तींची नोंद वगळणे तसेच नव्या पात्र मतदारांची नोंदणी करणे, याव...
नांदेडमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी पारदर्शक मुलाखती; ५६९ उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण

नांदेडमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी पारदर्शक मुलाखती; ५६९ उमेदवारांची प्रक्रिया पूर्ण

सामाजिक
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १३६२ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार, १५ मे रोजी प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा सेतू समितीच्या वतीने आयोजित या प्रक्रियेत अर्धापूर, उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड आणि माहूर या आठ तालुक्यांतील ५६९ उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर १५ मेपासून मुलाखत प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या प्रक्रियेसाठी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत एकूण १२ स्वतंत्र मुलाखत कक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी आठ तालुक्यांसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुलाखतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऊन व पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी मोठ...
नांदेड रेल्वे मंडळात ‘पर्यावरण संरक्षण शपथ’ व स्वाक्षरी अभियान उत्साहात

नांदेड रेल्वे मंडळात ‘पर्यावरण संरक्षण शपथ’ व स्वाक्षरी अभियान उत्साहात

सामाजिक
नांदेड| भारतीय रेल्वेतर्फे 15 मे ते 5 जून 2026 या कालावधीत “हवामान बदल व पर्यावरण संरक्षण” या विषयावर जागतिक पर्यावरण दिन अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत दक्षिण मध्य रेल्वेच्या हज़ूर साहिब नांदेड मंडळात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंडल रेल व्यवस्थापक कार्यालय, हज़ूर साहिब नांदेड येथे पर्यावरण संरक्षण शपथ व स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत पर्यावरण संरक्षण व शाश्वत जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली. दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक बदल करण्यासह कुटुंबीय, मित्र आणि समाजातील इतर नागरिकांनाही पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. याशिवाय हज़ूर साह...
दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षणादरम्यान हिमायतनगर शहरात भव्य शोभायात्रा; राष्ट्रभक्तीचा जागर

दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षणादरम्यान हिमायतनगर शहरात भव्य शोभायात्रा; राष्ट्रभक्तीचा जागर

सामाजिक
शौर्य, संस्कार आणि राष्ट्रसेवेचे प्रेरणादायी प्रात्यक्षिक हिमायतनगर, अनिल मादसवार | विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत आयोजित दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गांवरून गुरुवार दिनांक 14 च्या रात्री भव्य शोभायात्रा काढण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या शोभायात्रेत सहभागी युवतींनी विविध शौर्य प्रात्यक्षिके सादर करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरात भगवे ध्वज, घोषणाबाजी आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या दुर्गावाहिनीच्या युवतींमुळे परिसरात राष्ट्रभक्ती आणि संस्कारमय वातावरण निर्माण झाले होते. आत्मसंरक्षण, शिस्त, संघटन आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणाऱ्या या शोभायात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुर्गावाहिनीच्या माध्यमातून राष्ट्रभक्त, संस्कारित आणि स्वाभिमानी युवती घडविण्याचे महत्त्व या शोभायात्रेतून अधोरेखित करण्यात आले. प्रशिक्षण...
जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

सामाजिक
वयाच्या १०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील मोजे पळसपुर येथील जेष्ठ नागरिक संभाजीराव माधवराव शिंदे पळसपुरकर यांचे गुरुवार, दि. 14 रोजी सायंकाळी ठीक 8 वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 105 वर्षे होते. संभाजीराव शिंदे हे शांत, संयमी व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाने पळसपुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, तीन मुली, सुना, नातू, नाती तसेच पणती असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार नागोराव शिंदे पळसपुरकर यांचे वडील होत. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार, दि. 15 रोजी सकाळी ठीक 10 वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे....
हिमायतनगर नगरपंचायतीकडून निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी नागरिकांना आवाहन

हिमायतनगर नगरपंचायतीकडून निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी नागरिकांना आवाहन

सामाजिक
हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार | शहरातील वार्ड क्रमांक 01 व 10 मधील नाका गल्ली, शहीद अशोक कामटे चौक, बजरंग चौक आदी परिसरातील नागरिकांना निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे. नगरपंचायतीच्या नमुना ४३ अभिलेखात नोंद नसलेल्या जागामालक नागरिकांनी, ते सध्या राहत असलेल्या शासकीय जमिनीवरील दिनांक १ जानेवारी २०११ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणाचे नियमितीकरण करण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे सूचनेत नमूद करण्यात आले आहे. यासाठी अर्जाचा नमुना शहरातील झेरॉक्स सेंटरवर उपलब्ध असून नागरिकांनी अर्जासोबत आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, कुटुंबाचा तपशील, मतदान ओळखपत्र, सन २०११ पूर्वी मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा, जागाभाडे क्रमांक, जागाभाडे भरल्याची पावती, वीज बिल तसेच ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. याशिवाय मालमत्तेसंदर्भा...
सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

सामाजिक
नायगाव येथे ‘महाराजस्व अभियान’ उत्साहात; हजारो नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ नांदेड | शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत नायगाव तहसील परिसरात दि. ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यावर भर देण्यात आला. तालुक्यातील सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी या अभियानात सहभाग घेत विविध योजनांचा लाभ मिळविला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, त...
विद्यार्थ्यांचे कागदपत्रे तात्काळ द्या नगरसेविका अनुपमा गायकवाड यांची तहसीलदारांकडे मागणी

विद्यार्थ्यांचे कागदपत्रे तात्काळ द्या नगरसेविका अनुपमा गायकवाड यांची तहसीलदारांकडे मागणी

सामाजिक
बिलोली | दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र तसेच इतर शासकीय कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी अनुपमा महेंद्र गायकवाड यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा तसेच विविध शैक्षणिक प्रक्रियांसाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची तातडीची आवश्यकता भासत आहे. मात्र तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून विद्यार्थी व पालकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. ऑनलाइन प्रक्रियेमधील तांत्रिक अडचणी, विलंब तसेच अपुरी कर्मचारी व्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षण...
हिमायतनगरात खतांचा काळाबाजार? होत असल्याचा आरोप 

हिमायतनगरात खतांचा काळाबाजार? होत असल्याचा आरोप 

शेती, सामाजिक
कृत्रिम टंचाई, लिंकिंग आणि चढ्या दराने विक्रीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन नांदेड/हिमायतनगर, प्रतिनिधी| खरीप हंगाम २०२६ तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मिराशे यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला निवेदन देत संबंधित खत विक्रेते व कृषी सेवा केंद्रांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा कृषी अधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर, तहसीलदार हिमायतनगर, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात अनेक खत विक्रेते शासन नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनानुसार, कृषी विभागाकडून खतसाठा मुबलक असल्याचे सांगितले जात असताना हिमा...
गोलचाळ परिसरातील पाणीप्रश्नावर माकप आक्रमक आयुक्तांना निवेदन; मागण्या न मानल्यास आंदोलनाचा इशारा

गोलचाळ परिसरातील पाणीप्रश्नावर माकप आक्रमक आयुक्तांना निवेदन; मागण्या न मानल्यास आंदोलनाचा इशारा

सामाजिक
नांदेड| शहरातील खडकपुरा भागातील गोलचाळ परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, माकपच्या गोलचाळ शाखेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांना सोमवारी (दि. ११ मे) निवेदन देण्यात आले. गोलचाळ परिसरात मोठ्या प्रमाणात मील मजदूर, बीडी कामगार तसेच रोजंदारीवर उदरनिर्वाह करणारे नागरिक वास्तव्यास आहेत. पूर्वी पहाटे ३ वाजता नळाला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वेळेत बदल करून सकाळी उशिरा पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने कामगार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गोलचाळ शाखेचे सचिव मंगेश वट्टेवाड यांनी आयुक्तांकडे सादर केलेल्या निवेदनात पूर्वीप्रमाणे पहाटे ३ वाजता पाणीपुरवठा सुरू करावा, उच्च दाबाने पाणी द्यावे तसेच अने...
error: Content is protected !!