धर्म अध्यात्म

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा-ह.भ.प बाळू महाराज गिरगावकर

आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा-ह.भ.प बाळू महाराज गिरगावकर

धर्म अध्यात्म
कंधार( सचिन मोरे) मानवी जीवनामध्ये आई- वडील म्हणजेच ईश्वराचे दुसरे रूप होय. अनादी काळापासून अनेक महापुरुषांनी आपल्या आई-वडिलांची सेवा करत जिवंतपणी मोक्ष मिळवले. त्यांचाच आदर्श घेत या काळामध्ये देखील मानवांनी आईवडिलांची श्रद्धा पूर्वक सेवा करावी. त्यांची सेवा केली तर कुठल्याही देवांचे दर्शन घेण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय. असे परखड मत ह.भ.प बाळू महाराज गिरगावकर यांनी बारुळ येथील येथे केले. कंधार पासून जवळच असलेल्या बारूळ येथे संत श्री नामदेव महाराज मठ संस्थान बारूळ व गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, कलशारोहण व भागवत कथा महा यज्ञाचा समारोप ह.भ.प बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. याप्रसंगी पुढे बोलताना महाराज म्हणाले की,चांगले ते पहा. नालायकांचे प्रदर्शन हे अलीकडे फारच वाढले असून खरे संत चमत्कार दाखवत नसून साक्षात्कार दाख...
हिमायतनगरात अखंड नामजप यज्ञ व पारायण सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिमायतनगरात अखंड नामजप यज्ञ व पारायण सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद

धर्म अध्यात्म
स्वामी समर्थ केंद्रात धार्मिक वातावरण; १५ एप्रिल रोजी महाआरतीने होणार समारोप https://www.youtube.com/shorts/9MOGm3ssZhg हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात सुरू असलेल्या अखंड नामजप यज्ञ व पारायण सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक ९ एप्रिलपासून सुरू झालेल्या या धार्मिक सोहळ्यात विविध पूजाअर्चा, अखंड नामजप यज्ञ, पारायण आणि हवन विधी सुरू आहेत. या सप्ताहात गुरुचरित्र पारायण, वीणा पारायण, अखंड नामजप यज्ञ, देवी-देवतांची सेवा तसेच खंडोबाची सेवा यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन वेळा आरती केली जात असून, यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. भारत देशात शांतता नांदावी, देशाची सुरक्षा अबाधित राहावी तसेच युद्धजन्य परिस्थिती टळावी, या उद्देशाने हा धार्मिक उपक्रम राबवण्यात ये...
‘जय जगदंब’ कॉफीटेबल पुस्तकाचे तुळजापूरमध्ये भव्य प्रकाशन; अशोक चव्हाण यांचे गौरवोद्गार

‘जय जगदंब’ कॉफीटेबल पुस्तकाचे तुळजापूरमध्ये भव्य प्रकाशन; अशोक चव्हाण यांचे गौरवोद्गार

धर्म अध्यात्म
तुळजापूर | आई तुळजाभवानी देवीच्या महिम्याचे दर्शन घडवणारे ‘जय जगदंब’ हे आकर्षक कॉफीटेबल पुस्तक तुळजापूर येथे दिमाखात प्रकाशित करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पुस्तकाचे कौतुक करत ते भाविकांसह इतिहास संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले. लेखक श्रीकांत दीक्षित (Shrikrishna Dixit) यांनी या पुस्तकातून आदिमाता जगदंबेचा गौरवशाली इतिहास, परंपरा आणि वैभव सोप्या व प्रभावी भाषेत मांडले आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक देवीभक्ताने संग्रही ठेवण्यासारखे असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान राणा जगजीतसिंह पाटील यांनी भूषवले. यावेळी सतीश चव्हाण , अमिताताई चव्हाण , जितेश अंतापूरकर , श्रीजया चव्हाण , डी . पि . सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुस्तकात तुळजाभवानी देवीची सविस्तर आराधना, दुर्मिळ ...
दत्तशिखराचे अधिष्ठाता महंत मधुसूदन भारती महाराज अनंतात विलीन; माहूरगडावर भाविकांचा जनसागर

दत्तशिखराचे अधिष्ठाता महंत मधुसूदन भारती महाराज अनंतात विलीन; माहूरगडावर भाविकांचा जनसागर

धर्म अध्यात्म
माहूर (प्रतिनिधी) दत्तशिखराचे अधिष्ठाता आणि माहूरगड दत्त संस्थानाचे पूज्य महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी हजारो भाविकांनी उपस्थित राहून अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला. गेल्या चार दशकांपासून दत्तशिखराच्या गादीवर विराजमान असलेल्या महाराजांनी अध्यात्म, सेवा आणि परंपरेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवला. साधी जीवनशैली, निस्वार्थ भाव आणि भक्तांप्रती असलेली आपुलकी यामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले. महाराजांच्या निधनाची बातमी समजताच माहूरगड परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भक्तांनी अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. मंदिर परिसरात दिवसभर भजन, कीर्तन आणि धार्मिक विधींचा सुरेल माहोल निर्माण झाला होता. परंपरेनुसार धार्मिक विधी पार पाडत महाराज...
माहूरगडावर भाविकांचा जनसागर; आमदार बाबुराव कदम कोहळीकरांनी घेतले महंत मधुसूदन भारती महाराजांचे अंत्यदर्शन

माहूरगडावर भाविकांचा जनसागर; आमदार बाबुराव कदम कोहळीकरांनी घेतले महंत मधुसूदन भारती महाराजांचे अंत्यदर्शन

धर्म अध्यात्म
नांदेड/माहूर (प्रतिनिधी) दत्त शिखराच्या पवित्र गादीवर विराजमान असलेले महंत श्री मधुसूदन जी भारती (मालक) महाराज यांच्या निधनाने माहूरगडावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपस्थित राहून महाराजांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत “महाराजांचे जाणे अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. त्यांनी आयुष्यभर धर्मसंवर्धन, समाजसेवा आणि अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी अखंड कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य भक्तांना जीवनाला दिशा मिळाली,” असे सांगितले. भक्तपरिवाराला मोठा धक्का - महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या निधनाने केवळ दत्त शिखर संस्थानचेच नव्हे तर संपूर्ण भक्तपरिवाराचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत आमदारांनी व उपस्थित भक्तांनी ईश्वरचरणी प्...
परंपरेला नवा अर्थ; मधुकर महाराज बारुळकर यांना ‘परिवर्तनवादी’ श्रद्धांजली

परंपरेला नवा अर्थ; मधुकर महाराज बारुळकर यांना ‘परिवर्तनवादी’ श्रद्धांजली

धर्म अध्यात्म
नांदेड (प्रतिनिधी) समाजप्रबोधनाची अखंड ज्योत चेतवणारे, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक आणि नामदेव-तुकाराम वारकरी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शि.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांचे नुकत्याच झालेल्या अपघातात निधन झाले. त्यांच्या जाण्याने समाज जागृतीच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांच्या विचारांचा दीप आजही अनुयायांच्या मनामनात प्रज्वलित आहे. संत परंपरेचा वारसा जपत, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या भक्तीभावातून तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आयुष्य समाजपरिवर्तनासाठी अर्पण केले. ‘शिवधर्म’ पद्धतीने अंत्यसंस्कार १ एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील बारूळ (मानार धरण परिसर) येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ‘शिवधर्म’ पद्धतीन...
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकासकामे; भव्य आयोजनाची ग्वाही

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकासकामे; भव्य आयोजनाची ग्वाही

धर्म अध्यात्म
नाशिक| पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला भव्य आणि अविस्मरणीय स्वरूप देण्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीच्या समारोपप्रसंगी तपोवन येथील श्री स्वामी नारायण मंदिरात ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांच्यासह विविध संत-महंत उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, कुंभ मेळा (Kumbh Mela) हा भारतीय अध्यात्मिक संस्कृतीचा सर्वात मोठा सोहळा असून, भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. नाशिक (Nashik) आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे होणाऱ्या या सोहळ्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत ...
कमलाई नगर येथे संकटमोचन हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

कमलाई नगर येथे संकटमोचन हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

धर्म अध्यात्म
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील कमलाई नगर परिसरात ३ एप्रिल रोजी संकटमोचन हनुमान मंदिरातील कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात पार पडला. या मंगलमय प्रसंगी परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे लोकार्पणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मंदिरात पार पडलेल्या धार्मिक विधी, पूजन आणि कलशारोहण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवत संकटमोचन हनुमानाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमाला परमपूज्य महंत गोपाळगीर गुरुरायगिर महाराज (दत्तबर्डी संस्थान), शिवचैतन्य शिवाचार्य महाराज (महादेव संस्थान), योगिराज बापू गुरु दत्ताबापू (श्रीकृष्ण मंदिर), आमदार बाबुराव कदम कोहळीकर, नगराध्यक्ष रोहिणीताई वानखेडे, जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, गटनेते गोपाल भाऊ सारडा, शहरप्रमुख बबन...
हनुमान जयंती आणि १०१ वर्षाची कुस्ती परंपरा

हनुमान जयंती आणि १०१ वर्षाची कुस्ती परंपरा

धर्म अध्यात्म
हनुमान जयंती हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो आपल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वैभवाचे दर्शन घडवणारा एक महत्त्वपूर्ण सोहळा आहे. या पवित्र निमित्ताने बिलोली शहरात दरवर्षी आयोजित केली जाणारी कुस्त्यांची स्पर्धा ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून, ती शौर्य, परंपरा आणि एकात्मतेचे प्रतीक बनली आहे. बिलोलीतील कुस्त्यांची परंपरा शंभर वर्षांहून अधिक जुनी असून, या परंपरेने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. मातीच्या आखाड्यात घडणारी ही कुस्ती केवळ शरीराची ताकद दाखवणारी नसून, ती मानसिक स्थैर्य, शिस्त आणि संस्कारांची जोपासना करणारी आहे. गावोगावी आणि जिल्ह्याजिल्ह्यातून येणारे कुस्तीपटू आपल्या कलेचा कस लावण्यासाठी येथे एकत्र येतात आणि त्यामुळे हा सोहळा एक भव्य क्रीडामहोत्सव ठरतो. या परंपरेचा वारसा जपण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, नगरपरिषद पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांनी पुढाकार घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येते....
तीर्थक्षेत्र बोरगडीला ‘गट ब’ दर्जासाठी प्रयत्न करणार – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

तीर्थक्षेत्र बोरगडीला ‘गट ब’ दर्जासाठी प्रयत्न करणार – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

धर्म अध्यात्म
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| विदर्भ-मराठवाडा -तेलंगणा राज्यात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यतील हिमायतनगर तालुक्याच्या बोरगडी येथे श्री हनुमान जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या पावन पर्वानिमित्त आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी बोरगडी येथील हनुमान मंदिरात उपस्थित होऊन मारोतीरायाचे दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाचे परमभक्त आणि शक्ती-युक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीरायांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मतदार संघातील सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.   यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्यामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. मंदिर कमेटीच्या वतीने आमदारांचा स्वागत व सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महत्त्वप...
error: Content is protected !!