राजकारण

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

लोहा हरित शहरासाठी १ लाख ५१ हजार वृक्षारोपणाची लोकचळवळ उभी राहणार : आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

लोहा हरित शहरासाठी १ लाख ५१ हजार वृक्षारोपणाची लोकचळवळ उभी राहणार : आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

राजकारण
मतभेद विसरून प्रत्येक नागरिकाने ‘एक घर-एक झाड’ संकल्प स्वीकारावा; शहर हरित करण्याचे आवाहन लोहा | लोहा शहराला हरित, स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी तब्बल १ लाख ५१ हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला असून, ही केवळ सरकारी मोहीम न राहता लोकचळवळ बनावी, असे आवाहन विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून नागरिकांनी पुढाकार घेतल्यास येत्या काही वर्षांत लोहा शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोहा येथील बाळाजी पाटील पवार मंगल कार्यालयात युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार, नगरसेवक श्याम पाटील व कुटुंबीयांच्या वतीने आयोजित ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मोहनअण्णा हंबर्डे, सुभाष साबणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण प...
नांदेड विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली!

नांदेड विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली!

राजकारण
पक्षीय बलाबल स्पष्ट; महायुती मजबूत, पण महाविकास आघाडीचीही जोरदार फिल्डिंग नांदेड, अनिल मादसवार| नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीचा राजकीय पट दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून, पक्षीय बलाबलाच्या आकडेवारीमुळे निवडणुकीचे समीकरण चांगलेच चर्चेत आले आहे. एकूण 446 मतदार असलेल्या या निवडणुकीत महायुतीचे संख्याबळ मजबूत दिसत असले तरी, महाविकास आघाडी, एमआयएम आणि अपक्षांची भूमिका अंतिम निकालात गेमचेंजर ठरू शकते. विशेष म्हणजे, 18 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून, 22 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची चिन्हे आहेत. महायुतीचे पारडे जड? उपलब्ध आकडेवारीनुसार महायुतीकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजप – 138 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 82 शिवसेना (शिंदे गट)...
नांदेड आकाशवाणी केंद्राच्या बळकटीकरणासाठी अशोकराव चव्हाण सरसावले

नांदेड आकाशवाणी केंद्राच्या बळकटीकरणासाठी अशोकराव चव्हाण सरसावले

राजकारण
“तरंग लांबी वाढविणे, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी दिल्लीस्तरावर पाठपुरावा करणार” नांदेड| माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांनी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या विकासासाठी सकारात्मक आणि ठोस भूमिका घेत केंद्राच्या विविध प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देण्याची ग्वाही दिली आहे. नांदेड आकाशवाणी केंद्राची तरंग लांबी वाढविणे, ग्रामीण भागात स्पष्ट आणि दर्जेदार प्रसारण उपलब्ध करून देणे, तसेच स्थानिक कलाकार, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पुन्हा व्यापक व्यासपीठ मिळावे यासाठी आपण स्वतः केंद्रीय मंत्र्यांसह प्रसार भारतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुणवंतराव पाटील, गोविंदराव मुंडकर, भाऊराव मोरे, बसवराज वडिले आणि प्रकाश कराळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी 3 जून 2026 रोजी बुधवारी सविस्तर चर्चा करताना चव्...
“अतिक्रमण हटविण्याची घाई नको; गरीबांच्या रोजगारावर घाला नको” – माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद

“अतिक्रमण हटविण्याची घाई नको; गरीबांच्या रोजगारावर घाला नको” – माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद

राजकारण
हिमायतनगरमधील छोट्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर; पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय कारवाई टाळण्याचे प्रशासनाला आवाहन हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर शहरातील संभाव्य अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी प्रशासनाने घाईघाईने कठोर कारवाई न करता मानवी दृष्टिकोन स्वीकारावा, अशी भूमिका मांडली आहे. शहरातील अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह छोट्या व्यवसायांवर अवलंबून असल्याने अतिक्रमण हटविताना त्यांच्या रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने विचारात घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. ALM Bharat शी बोलतांना मोहम्मद जावेद यांनी सांगितले की, हिमायतनगरमधील अनेक नागरिक टपऱ्या, पानटपऱ्या, भाजीपाला विक्री, चिकन-मटन विक्री तसेच विविध लहान-मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वाढती महागाई, बेरोजगारी आणि मर्यादित रोजगार संधी यामुळे हे छोटे व...
“विधानपरिषदेच्या १७ ही जागा महायुतीच जिंकणार”; नांदेडमधून ताकद दाखवण्याचे अशोकराव चव्हाण यांचे आवाहन

“विधानपरिषदेच्या १७ ही जागा महायुतीच जिंकणार”; नांदेडमधून ताकद दाखवण्याचे अशोकराव चव्हाण यांचे आवाहन

राजकारण
महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन नांदेड, प्रतिनिधी | महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषदेच्या सर्व १७ जागांवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचा विजय निश्चित असून, नांदेडमधून महायुतीची ताकद आणि एकजूट राज्याला दाखवून द्यावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले. महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोमवारी (दि. १ जून) आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने अनुभवी नेतृत्व म्हणून अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले. “ही निवडणूक केवळ विजयासाठी नाही, तर महायुतीची आन-बाण-शान सिद्ध करण्यासाठी आ...
कृत्रिम खत टंचाईबाबत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याशी वामनराव पाटलांनी केली महत्त्वपूर्ण चर्चा; सखोल चौकशीचे आश्वासन

कृत्रिम खत टंचाईबाबत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याशी वामनराव पाटलांनी केली महत्त्वपूर्ण चर्चा; सखोल चौकशीचे आश्वासन

राजकारण
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात निर्माण झालेल्या कृत्रिम खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी महायुतीचे लोकप्रिय लोकनेते तथा आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांची सदिच्छा भेट घेऊन शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी वामनराव पाटील वडगावकर यांनी अनेक खत विक्रेते “खत उपलब्ध नाही” असे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा मुद्दा आमदारांच्या निदर्शनास आणून दिला. दुसरीकडे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खताचा साठा गोडाऊनमध्ये असल्याची माहिती समोर येत असल्याने अशा गोडाऊनची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, शासनाकडून तालुक्याच्या क्षेत्रफळानुसार येणारा खतसाठा इतरत्र वळवला जाऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली....
आष्टीकरांनंतर चिखलीकर–वानखेडेंची एन्ट्री, स्थानिक प्राधीकार निवडणुकीत राजकीय समीकरणे ढवळणार?

आष्टीकरांनंतर चिखलीकर–वानखेडेंची एन्ट्री, स्थानिक प्राधीकार निवडणुकीत राजकीय समीकरणे ढवळणार?

राजकारण
नांदेड विधान परिषद रणधुमाळीला वेग नांदेड | नांदेड स्थानिक प्राधीकार मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने आता स्पष्टपणे राजकीय तापमान वाढवण्यास सुरुवात केली असून, उमेदवारी अर्ज प्रक्रियेतून नव्या राजकीय समीकरणांचे संकेत मिळू लागले आहेत. दि. 27 मेपर्यंत तब्बल 25 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले, तर एक अर्ज अधिकृतपणे दाखल झाल्याने निवडणूक रंगतदार टप्प्यात प्रवेश करताना दिसत आहे. यात सर्वात मोठी चर्चा ठरत आहे ती खासदार पुत्र कृष्णा पाटिल यांच्या उमेदवारी अर्जामुळे आष्टीकरांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. असे असतानाच आता प्रवीण पाटील चिखलीकर आणि भास्कर वानखेडे यांनी अर्ज घेत निवडणुकीत रस दाखवल्याने समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनण्याची चिन्हे आहेत. कृष्णा पाटिल आष्टीकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता प्रवीण पाटिल चिखलीकर आणि भास्कर...
चिंचगव्हाण येथे आमदार बाबुराव कदम-कोहळीकर यांची जनगणना कामाची पाहणी

चिंचगव्हाण येथे आमदार बाबुराव कदम-कोहळीकर यांची जनगणना कामाची पाहणी

राजकारण
अचूक व पारदर्शक जनगणना ही विकासाच्या नियोजनाचा पाया; नागरिकांना सहकार्याचे आवाहन हदगाव/हिमायतनगर, अनिल मादसवार| भारत सरकारच्या वतीने सुरू असलेल्या घरयादी व घरगणना कार्याची पाहणी करण्यासाठी आमदार बाबुराव कदम-कोहळीकर यांनी चिंचगव्हाण गावाला भेट देत जनगणना प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी गावात सुरू असलेल्या जनगणना कामाची माहिती त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी आमदार कदम-कोहळीकर यांनी जनगणना प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह जनगणना ही शासनाच्या विकास आराखड्याचा पाया असते. गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या विकासासाठी लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे.” तसेच, शासनाच्या विविध योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, र...
हिमायतनगरात खत टंचाई की काळाबाजार?; शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप

हिमायतनगरात खत टंचाई की काळाबाजार?; शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप

शेती, राजकारण
स्टॉक असूनही “खत संपले”चा फलक; कृषी विभागाच्या भूमिकेवर वडगांवकर यांनी उपस्थित केला प्रश्नचिन्ह हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगाम तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतासाठी वणवण भटकावे लागत असून, काही कृषी सेवा केंद्रांकडून खत साठा लपवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप वामनराव पाटील वडगांवकर यांनी केला आहे. काही दुकानदारांनी दुकानाच्या नावावरील खताचा स्टॉक मित्र, नातेवाईक व इतर व्यक्तींच्या आधार कार्डवर OTP घेऊन ‘स्कॅन’ करून उडवण्याचा प्रकार सुरू केला असल्याची चर्चा शेतकरी बांधवांत रंगू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिमायतनगर शहरातील अनेक कृषी दुकानांमध्ये शेतकरी खत मागण्यासाठी गेल्यास “स्टॉक संपला” असे सांगितले जाते. मात्र, शहर व ग्रामीण परिसरातील काही खासगी गोडाऊनमध्ये DAP, युरिया, 10:26:26 आणि पोटॅश खतांचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्...
डिझेल टंचाईवर आमदार कोहळीकरांचा इशारा; शेतकऱ्यांसाठी ६०% डिझेल राखीव ठेवण्याची मागणी

डिझेल टंचाईवर आमदार कोहळीकरांचा इशारा; शेतकऱ्यांसाठी ६०% डिझेल राखीव ठेवण्याची मागणी

राजकारण
खरीप हंगाम तोंडावर, पंपांवरील गैरव्यवस्थेविरोधात प्रशासनाला सज्ज राहण्याचे आवाहन नांदेड/हदगाव/हिमायतनगर, अनिल मादसवार| खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर डिझेल उपलब्ध होत नसल्याने निर्माण झालेल्या अडचणींवर आता राजकीय पातळीवरही आवाज उठू लागला आहे. हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम-कोहळीकर यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरील एकूण डिझेल साठ्यापैकी ६० टक्के साठा शेतकरी व कृषी उपयोगासाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. सध्या शेतीची मशागत, पेरणीपूर्व कामे आणि सिंचनासाठी ट्रॅक्टर, पंप व इतर कृषी यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. मात्र, ऐन हंगामात अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना डिझेलसाठी ताटकळत उभे राहावे लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे शेतीची कामे रखडत असून शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक फटका बसत अस...
error: Content is protected !!