शेती

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

केळी उत्पादकांना हेक्टरी ७४ हजारांचा पीकविमा मंजूर

केळी उत्पादकांना हेक्टरी ७४ हजारांचा पीकविमा मंजूर

शेती
शेतकऱ्यांचा लढा व आ. श्रीजया चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश नांदेड|मुदखेड, बारड आणि अर्धापूर महसुली मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा अखेर मंजूर झाला असून, या मंडळांसाठी उच्च व निम्न तापमानाची भरपाई म्हणून एकूण हेक्टरी ७४ हजार ६७८ रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे. गतवर्षी जून महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे या तीनही मंडळातील सुमारे ४ हजार हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे सलग पाच दिवस प्रतिकूल तापमानामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र तापमानाची नोंद असूनही विमा कंपनीकडून तांत्रिक कारणास्तव शेतकऱ्यांचे दावे फेटाळले जात होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, या शेतकऱ्यांनी भोकर विधानसभा ...
अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश

अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश

शेती
नांदेड| अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान सहन करणाऱ्या अर्धापूरमधील १०२ शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत रोजगार हमी योजना विभागाला कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी अतिवृष्टीमुळे खचल्या किंवा बुजल्या होत्या. शासनाच्या विशेष मदत पॅकेजअंतर्गत मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज व पंचनामे पूर्ण केले होते. मात्र ‘मनरेगा’ योजना ग्रामीण भागापुरती मर्यादित असल्याने केवळ तांत्रिक कारणामुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. या अन्यायकारक परिस्थितीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण (Shrijaya Chavan) यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लक्ष वेधले. “नुकसान समान असताना केवळ प्र...
हदगाव तालुक्यातील सर्व पांदण रस्ते खुले करा – प्रल्हाद पाटील हडसनीकर

हदगाव तालुक्यातील सर्व पांदण रस्ते खुले करा – प्रल्हाद पाटील हडसनीकर

शेती
हदगाव, गौतम वाठोरे | तालुक्यातील ग्रामीण भागातील अतिक्रमणग्रस्त पांदण (शेत) रस्ते तात्काळ खुले करण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसनीकर यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही वर्षांत तालुक्यातील अनेक शासकीय पांदण रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी मार्गच उरलेला नाही. परिणामी शेतीकामासाठी आवश्यक अवजारे, यंत्रसामग्री ने-आण करणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी तर रस्ते बंद झाल्याने शेती पडीत राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याचबरोबर रस्त्यांच्या वादातून शेतकऱ्यांमध्ये तणाव आणि भांडणे वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, शासनाने पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून, रस्त्याचे नुकसान करणाऱ्या किंवा अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आह...
वादळी पावसाने हिमायतनगर तालुका हादरला; वीज खंडित, शेतीचे मोठे नुकसान

वादळी पावसाने हिमायतनगर तालुका हादरला; वीज खंडित, शेतीचे मोठे नुकसान

शेती
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहर व तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास निसर्गाने अचानक रौद्र रूप धारण करत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी लावली. रात्री सुमारे अकरा वाजल्यापासून सुरू झालेल्या या वादळामुळे संपूर्ण शहरासह ग्रामीण भाग हादरून गेला. तुफान वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी विजवाहिनीच्या तारा तुटून पडल्या, तर लहान-मोठी झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. परिणामी हिमायतनगर शहर व तालुक्यातील नागरिकांना रात्रभर अंधारात जागून काढावी लागली. अचानक आलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पावसाची सुरुवात झाल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या वादळाचा फटका शेती क्षेत्राला बसला आहे. अनेक ठिकाणी आंबा, चिकू यांसारख्या फळबागांचे मोठे ...
नांदेड जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नांदेड जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

शेती
नांदेड | प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या ताज्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात 30 व 31 मार्च तसेच 1 व 3 एप्रिल 2026 या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांसह सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काय करावे? वादळ व विजांचा अंदाज असल्यास बाहेर जाणे टाळा, सुरक्षित इमारत नसेल तर सखल जागेत बसून डोके गुडघ्यात घ्या, घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, विद्युत उपकरणे त्वरित बंद करा, लोखंडी वस्तू, विजेचे खांब व तारांपासून दूर राहा, पाण्यात असाल तर तात्काळ बाहेर पडा काय करू नये? विजा चमकत असताना लँडलाईन फोन वापरू नका, शॉवरखाली अंघोळ करू नका, पाण्याच्या नळा...
error: Content is protected !!