लोहा शहरावरील पाणी संकट टळले; लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावात एक दलघमी पाणी सोडण्याचे आदेश
लोहा | लोहा शहरावर ओढवलेले भीषण पाणी संकट अखेर टळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावात एक दलघमी पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे.
नगराध्यक्ष शरद पवार व त्यांच्या टीमने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर नगर परिषदेने अधिकृत प्रस्ताव सादर केल्यानंतर बुधवारी (15 जुलै) पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले.
लोहा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर होता. एप्रिल महिन्यात लिंबोटी धरणातून दीड दलघमी पाणी सोडण्यात आले होते. मात्र अकरा गावांच्...









