करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

डॉ. सान्वी जेठवाणी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

डॉ. सान्वी जेठवाणी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

करियर
तृतीयपंथी समाजाच्या न्याय, सन्मान व सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार नांदेड | महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी तृतीयपंथी आघाडीच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक तसेच सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेडच्या अध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांची विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि तृतीयपंथी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वावलंबन, सामाजिक न्याय आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. जेठवाणी यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे. भारतीय शास्त्रीय नृत्य, ला...
विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

करियर
प्राचार्यांसमवेत आढावा बैठक; शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी सोडविण्यास प्राधान्य नांदेड | विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित हेच विद्यापीठाचे सर्वोच्च प्राधान्य असून, विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात सोमवारी (१३ जुलै) आयोजित महाविद्यालयांच्या प्रशासकीय व शैक्षणिक अडचणींच्या आढावा बैठकीत प्राचार्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, परी...
मुंबईत पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांचा ‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्काराने गौरव

मुंबईत पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांचा ‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्काराने गौरव

करियर
निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताच्या पत्रकारितेची दखल; 'टाईम्स न्यूज २४'च्या संपादकाचा मानाचा सन्मान मुंबई/नांदेड, प्रतिनिधी| जनहिताच्या प्रश्नांवर निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि सातत्यपूर्ण पत्रकारिता करणारे 'टाईम्स न्यूज २४' या वृत्तपोर्टलचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार किशोरकुमार शिवाजीराव वागदरीकर यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल 'स्वाभिमान लेखणी' पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आर्यारवी एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित 'पहिला पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य, समाजसेवक पुरस्कार सोहळा–२०२६' अंतर्गत रविवारी (१२ जुलै) मुंबई येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉल येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयोजक, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या हस्ते वागदरीकर यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यास श्रीधर कीर, विसुभाऊ ...
‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्कारासाठी पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांची निवड

‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्कारासाठी पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांची निवड

करियर
१२ जुलै रोजी मुंबईत होणार सन्मान; नांदेडच्या पत्रकारितेला आणखी एक मानाचा बहुमान नांदेड, अनिल मादसवार| पत्रकारितेतील निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत टाईम्स न्यूज २४ या वृत्तपोर्टलचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार किशोरकुमार शिवाजीराव वागदरीकर यांची प्रतिष्ठेच्या 'स्वाभिमान लेखणी' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ही घोषणा आयोजक, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी केली. आर्यारवी एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित 'पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य, समाजसेवक पुरस्कार सोहळा-२०२६' या कार्यक्रमात १२ जुलै रोजी मुंबई येथे वागदरीकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, प्रशासकीय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत त्यांनी पत्रकारितेत स्वतंत्र, विश्वासार्ह आणि ...
पोटा येथील अंगणवाडीची दयनीय अवस्था; चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पोटा येथील अंगणवाडीची दयनीय अवस्था; चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

करियर
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथील आबादी परिसरातील अंगणवाडी इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, चिमुकल्या बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतीच्या जमिनीवर ठिकठिकाणी मोठी छिद्रे पडली असून, त्यातून घुशी माती बाहेर काढत असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. बालके बसतात त्या ठिकाणीही जमिनीला भगदाडे पडली असून, पावसाळ्यात या छिद्रांमध्ये विंचू, साप तसेच इतर विषारी व सरपटणारे प्राणी लपण्याची शक्यता असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बालकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पालकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने अंगणवाडी इमारतीची पाहणी करून जमिनीवर फरशी बसविणे तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे. चिमुकल्या बालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने त्वरित उपाय...
कुबेर, राही,जोशी, अरबुने यांना राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहिर

कुबेर, राही,जोशी, अरबुने यांना राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहिर

करियर
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार यांचा होणार गौरव; ग्रंथप्रकाशनाचाही सोहळा नांदेड| प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान, नांदेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन, नांदेड येथे उत्साहात संपन्न होणार आहे. साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात विविध मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असून, याच कार्यक्रमात दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशनही होणार आहे. यंदाच्या सोहळ्यात 'मातृश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दैनिक लोकसत्ता, मुंबईचे संपादक मा. श्री. गिरीश कुबेर यांना प्रदान करण्यात येणार आहे. 'प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार' यंदा कवी अजीम नवाज राही (बुलडाणा) यांच्या 'वळीवाच्या वेळा' या साहित्यकृती...
बालकांच्या परिपूर्ण विकासासाठी बालसाहित्य महत्त्वाचे : डॉ. सुरेश सावंत

बालकांच्या परिपूर्ण विकासासाठी बालसाहित्य महत्त्वाचे : डॉ. सुरेश सावंत

करियर
नांदेड | बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बालसाहित्य हे प्रभावी माध्यम असून, उत्तम बालसाहित्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते, विचारप्रक्रिया विकसित होते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ तथा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. सुरेश सावंत यांनी केले. उदगीर येथील अहिल्यादेवी गार्डन सभागृहात माजी गटशिक्षणाधिकारी बालाजी बिरादार लिखित 'बोलका ढोल' आणि 'मॅडम मॅडम शाळा सोडा' या दोन बालसाहित्य पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका तथा माजी प्राचार्या सौ. मैनाताई साबणे होत्या. डॉ. सावंत म्हणाले की, बालसाहित्य वाचनामुळे मुलांमध्ये अनुभव आणि कल्पनाशक्तीचा विकास होतो. त्यांची विनोदबुद्धी, मानसिक क्षमता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. घटना-घडामोडींना स...
पहिल्याच प्रयत्नात गुणवंत पावडे यांची सीए परीक्षेत घवघवीत भरारी

पहिल्याच प्रयत्नात गुणवंत पावडे यांची सीए परीक्षेत घवघवीत भरारी

करियर
नांदेडच्या गुणवंताने मिळवले सनदी लेखापाल (CA) पद; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव नांदेड | नांदेड शहरातील प्रतिष्ठित उद्योजक तथा वामनराव पावडे मंगल कार्यालय आणि गंगोत्री स्वीट हॉलचे संचालक बालासाहेब किशनराव पावडे (दीपनगर) यांचे सुपुत्र गुणवंत बालासाहेब पावडे यांनी पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल (Chartered Accountant - CA) ही अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेत गुणवंत यांनी हे यश मिळवून आपल्या कुटुंबासह नांदेड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला आहे. या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, गुरुजन आणि बहीण डॉ. गायत्री पावडे यांना दिले. गुणवंत यांनी आपले शालेय शिक्षण गुजराती हायस्कूल, नांदेड येथे पूर्ण केले असून, त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर...
टीईटी व नीट पेपरफुटीविरोधात नांदेडमध्ये डिवायएफआयचे तीव्र आंदोलन

टीईटी व नीट पेपरफुटीविरोधात नांदेडमध्ये डिवायएफआयचे तीव्र आंदोलन

करियर
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी नांदेड | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या वतीने बुधवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका एक दिवस आधीच फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा पेपरफुटी झाल्याने लाखो विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. डिवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा निषेध क...
हु.ज.पा. महाविद्यालयात कृषीदिन निमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

हु.ज.पा. महाविद्यालयात कृषीदिन निमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

करियर
हिमायतनगर | हुतात्मा जयवंतराव पाटील (हु.ज.पा.) महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांची जयंती 'कृषीदिन' म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम. पी. गुंडाळे होते. त्यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी इतिहास विभागाचे प्रा. डॉ. व्ही. व्ही. कदम यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, त्यांनी कृषी विकास, जलव्यवस्थापन, ऊर्जानिर्मिती, महिलांचे सक्षमीकरण, कामगार कल्याण आणि राज्याच्या आर्थिक विकासासाठी मोलाचे योगदान दिले. शेती क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या दूरदृष्टीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात कृषी विकासाला नवी दिशा म...
error: Content is protected !!