महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

132 केव्ही उपकेंद्र असतानाही खानापूरमध्ये लोडशेडिंग; नागरिकांचा संताप

132 केव्ही उपकेंद्र असतानाही खानापूरमध्ये लोडशेडिंग; नागरिकांचा संताप

महाराष्ट्र
खानापूर/देगलूर/नांदेड, माणिक रायकोडे | राज्यात विजेची कमतरता नसल्याचा दावा शासनाकडून केला जात असताना खानापूर येथे अचानक साडेतीन तासांच्या लोडशेडिंगला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "वीज उशाला, कोरड कशाला?" असा सवाल उपस्थित करत खानापूरकरांनी वीज वितरण कंपनीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. खानापूर येथे १३२ केव्ही उपकेंद्र उभारण्यात आले असूनही स्थानिकांना अंधारात राहावे लागत आहे. दुसरीकडे शेजारील एमआयडीसी परिसराला अखंड वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांनी दुहेरी निकषांचा आरोप केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, १३२ केव्ही उपकेंद्रासाठी गावातील गायरान व शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्या वेळी खानापूरमध्ये भविष्यात वीजटंचाई भासणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात लोडशेडिंग सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावर...
खरीप पीक विम्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत; शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत

खरीप पीक विम्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत; शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत

शेती
नांदेड| खरीप हंगाम 2026 साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत असून, या मुदतीत कोणतीही वाढ होणार नसल्याने शेतकऱ्यांनी विलंब न करता तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा काढावा. योजनेविषयी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा विमा प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे....
फक्त 10 टक्के खर्चात बसवा सूक्ष्म सिंचन संच; विशेष मोहीम सुरू

फक्त 10 टक्के खर्चात बसवा सूक्ष्म सिंचन संच; विशेष मोहीम सुरू

शेती
नांदेड| अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना – “प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन)” अंतर्गत विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम 1 ते 31 जुलै 2026 या कालावधीत राबवली जात असून पात्र शेतकऱ्यांना 90 टक्केपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेत ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान उपलब्ध असून पात्र शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के खर्च करावा लागणार आहे. अर्जासाठी शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, शासकीय ओळखपत्र, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करावेत. अर्ज स्वीकारताना “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वानुसार प्रक्रिया केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी सीएससी केंद्र, सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृष...
हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे विविध मागण्या

हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे विविध मागण्या

महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मांडले विकासाचे मुद्दे नांदेड /हिंगोली, अनिल मादसवार| राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या समवेत हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मंगळवारी (दि. १४ जुलै) नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेत हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत. बैठकीत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज उच्च शिक्षण संस्था (विद्यापीठ) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत (PMGSY) प्रलंबित व नवीन रस्त्यांच्या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. मतदारसंघातील विविध रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे थांबे मंजूर करावेत, हिंगोली शहरात विद...
नाविन्यपूर्ण उपक्रमांतून जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी जनजागृती करा : विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

नाविन्यपूर्ण उपक्रमांतून जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी जनजागृती करा : विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर| अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागातील सर्व जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून व्यापक जनजागृती करावी. तसेच समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिल्या. जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गठित विभागीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, समाज कल्याण विभागासह संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीत विभागीय आयुक्तांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे, जनजागृती उपक्रम आणि उपलब्ध निधीच्या वापराचा विभागनिहाय आढावा घेतला. जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठका नियमित घेऊन त्यातील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी अनुसूचित जात...
मराठवाडा महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकतो : ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी

मराठवाडा महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकतो : ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी

महाराष्ट्र
जलसंपदा, शेती, उद्योग आणि पर्यटनाची सांगड घालण्याची गरज; एसआरटीएम विद्यापीठात विशेष व्याख्यान नांदेड | मराठवाड्याकडे सुपीक जमीन, जलसंपदा, कुशल मनुष्यबळ, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनाची मोठी क्षमता असून कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान आणि वारसा पर्यटन यांची प्रभावी सांगड घातल्यास हा प्रदेश महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा सिंचन प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) माधव भंडारी यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्ययन केंद्रातर्फे डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘मराठवाडा : काल, आज व उद्या’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. भंडारी यांनी आपल्या व्याख्यानात सा...
नांदेडची वकिली दिल्लीत करणार; अॅड. उज्ज्वल निकम यांची ग्वाही

नांदेडची वकिली दिल्लीत करणार; अॅड. उज्ज्वल निकम यांची ग्वाही

महाराष्ट्र
डॉ. शंकरराव चव्हाण जीवनगौरव व कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांचे वितरण उत्साहात नांदेड| "मी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार असून, नांदेडचा आवाज दिल्लीच्या दरबारात बुलंद करण्यासाठी वकिली करणार," अशी ग्वाही राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित डॉ. शंकरराव चव्हाण जीवनगौरव आणि कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार-२०२६ वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अॅड. निकम म्हणाले की, "कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी मला वकिली करण्याची संधी दिली. त्यामुळे नांदेडशी माझे ऋणानुबंध कायम आहेत. समाजात वकिलांविषयी विविध भावना असल्या तरी वकिली ही न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आता खासदार म्हणून नांदेडच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी दिल्लीत प्रभावीपणे आवाज उठवेन." यावेळी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सद...
पावसासाठी वाघी गावातील महिलांचे साकडे; पैनगंगा नदीचे पाणी आणून मारुतीराय व गणरायाचा जलाभिषेक

पावसासाठी वाघी गावातील महिलांचे साकडे; पैनगंगा नदीचे पाणी आणून मारुतीराय व गणरायाचा जलाभिषेक

शेती
दहा-बारा दिवसांपासून पाऊस गायब; सुकणाऱ्या पिकांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावातील महिलांनी पावसासाठी अनोखी प्रार्थना सुरु केली आहे. महिलांनी पैंनगंगा नदीतून पायी चालत जाऊन पाणी आणून गावातील मारुतीराय आणि श्री गणपती बाप्पाचा जलाभिषेक करत वरुणराजाने कृपा करावी आणि यंदाचा खरीप हंगाम सुगीचा व्हावा, असे साकडे घातले आहे. यंदा हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी हळद लागवडीवर मोठा भर दिला असून, त्याचबरोबर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी केली आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे पेरण्या पूर्ण झाल्या; मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सलग दहा-बारा दिवस पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिके सुकू लागली असून, ...
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची नांदेड जिल्हा कारागृहाला भेट

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची नांदेड जिल्हा कारागृहाला भेट

महाराष्ट्र
महिला बंदींच्या अडचणी जाणून घेतल्या नांदेड| राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रविवारी नांदेड जिल्हा कारागृहाला भेट देऊन महिला बंदींची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महिला बंदींच्या पुनर्वसनासाठी कौशल्य विकास, मानसिक आरोग्य सेवा, कायदेशीर मदत आणि मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक संपत आडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ, सहाय्यक अधीक्षक व्ही. एस. मेश्राम, दयावंत काळबांडे, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा नरवडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महिला बंदींशी संवाद साधताना विजया रहाटकर यांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणी, कारागृहातील उपलब्ध सुविधा तसेच मोफत विधी सहाय्...
एकघरी बंधारा दुरुस्तीतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करा; अन्यथा १५ जुलैपासून उपोषणाचा इशारा

एकघरी बंधारा दुरुस्तीतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करा; अन्यथा १५ जुलैपासून उपोषणाचा इशारा

महाराष्ट्र
जलसंधारण अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; प्राजक्ता गुंडेकर यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे एकघरी येथील बंधारा दुरुस्तीच्या कामात कथित आर्थिक गैरव्यवहार व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत संबंधित जलसंधारण अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी युवती सेना जिल्हा समन्वयक तथा ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता रामराव गुंडेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, एकघरी येथील बंधारा दुरुस्तीसाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात बंधाऱ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी केवळ मतिमिश्रित पद्धतीने नियमांना बगल देऊन वरवरची कामे करून बंध...
error: Content is protected !!