घराघरात श्रावणबाळ घडले तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही
घराघरात श्रावणबाळ घडले तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही; मात्र वृद्धाश्रमही सक्षमपणे टिकले पाहिजेत – डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर
नांदेड| "घराघरात श्रावणबाळ झाले तर वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही. वृद्धाश्रम ही आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा नाही, हे विधान निश्चितच खरे आहे. मात्र ज्यांना केवळ मुली आहेत, ज्यांना अपत्य नाही किंवा विविध कारणांमुळे वृद्धावस्थेत आधार मिळत नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम हा एक महत्त्वाचा आणि सन्मानजनक पर्याय आहे. त्यामुळे वृद्धाश्रम केवळ अस्तित्वातच नव्हे तर अधिक सक्षम, संवेदनशील आणि सुसज्ज स्वरूपात टिकले पाहिजेत," असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, साहित्यिक तथा प्रसिद्ध चिकित्सक डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांनी केले.
स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचार मंच, नांदेड यांच्या वतीने "बाबा तुमच्यासाठी..." या उपक्रमांतर्गत संध्याछाया वृद्धाश्रम, नांदेड येथे आयोज...









