सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नायगाव येथे ‘महाराजस्व अभियान’ उत्साहात; हजारो नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ
नांदेड | शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत नायगाव तहसील परिसरात दि. ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यावर भर देण्यात आला. तालुक्यातील सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी या अभियानात सहभाग घेत विविध योजनांचा लाभ मिळविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, त...





