हिमायतनगरात खतांचा काळाबाजार? होत असल्याचा आरोप
कृत्रिम टंचाई, लिंकिंग आणि चढ्या दराने विक्रीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन
नांदेड/हिमायतनगर, प्रतिनिधी| खरीप हंगाम २०२६ तोंडावर असताना हिमायतनगर तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मिराशे यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला निवेदन देत संबंधित खत विक्रेते व कृषी सेवा केंद्रांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा कृषी अधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर, तहसीलदार हिमायतनगर, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात अनेक खत विक्रेते शासन नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनानुसार, कृषी विभागाकडून खतसाठा मुबलक असल्याचे सांगितले जात असताना हिमा...









