महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

बहादरपुराच्या पेठकर कुटुंबाचे देशभर कौतुक; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींकडून विशेष उल्लेख

बहादरपुराच्या पेठकर कुटुंबाचे देशभर कौतुक; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींकडून विशेष उल्लेख

महाराष्ट्र
लग्नातील 'रिटर्न गिफ्ट' म्हणून ३,५०० गावकऱ्यांना एक लाखांचा अपघाती विमा; नांदेडच्या सामाजिक उपक्रमाची देशभर चर्चा नांदेड | कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील पेठकर कुटुंबाच्या समाजोपयोगी उपक्रमाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. विवाहसोहळ्यात पाहुण्यांना पारंपरिक भेटवस्तू देण्याऐवजी गावातील सुमारे साडेतीन हजार नागरिकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघाती विमा भेट देण्याचा अभिनव निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी रविवारी 'मन की बात' कार्यक्रमातून पेठकर कुटुंबाचे कौतुक केले. सिद्धेश्वर पेठकर यांच्या विवाहानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बहादरपुरा गावाची ओळख देशभर पोहोचली आहे. आपल्या मनोगतात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात लग्न किंवा कौटुंबिक समारंभ हे केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाचा उत्सव असतो. अशा आनंदाच्या क्षणी कठीण काळात उपयोगी पडणारी भेट देण्...
हिमायतनगरात दुर्मिळ घोरपडीचे दर्शन; वनविभागाच्या तत्परतेने जीव वाचला

हिमायतनगरात दुर्मिळ घोरपडीचे दर्शन; वनविभागाच्या तत्परतेने जीव वाचला

शेती
पत्रकार अनिल मादसवार यांच्या शेतातील कोठ्यात दबा धरून बसलेल्या घोरपडीची सुरक्षित सुटका हिमायतनगर | हिमायतनगर शहरालगतच्या पळसपूर रोडवरील शेतात दुर्मिळ घोरपड आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. पत्रकार अनिल मादसवार यांच्या शेतातील खत-बियाणे ठेवलेल्या कोठ्यात दबा धरून बसलेली घोरपड पाहताच त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे घोरपडीची सुखरूप सुटका करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतातील भडोळ्या बुजल्याने सरपटणारे प्राणी शेतीच्या आखाड्यात व कोठारांमध्ये आश्रय घेत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी गट क्रमांक ३ मधील शेतात पेरणीच्या तयारीत शेतकरी होते. बी बियाणे, खत काढल्यानंतर कोठ्यात दुर्मिळ घोरपड आढळून आली. याची माहिती मिळता...
दारूबंदीसाठी वझरा शेख फरीदमध्ये उठाव; नाहरकत प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी

दारूबंदीसाठी वझरा शेख फरीदमध्ये उठाव; नाहरकत प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी

महाराष्ट्र
माहूर/नांदेड | माहूर तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या वझरा शेख फरीद गावात दारूबंदीच्या मागणीने जोर धरला असून, गावातील महिलांसह नागरिकांनी दारू विक्री केंद्रे बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दारू दुकाने सुरू करण्यासाठी देण्यात आलेल्या नाहरकत प्रमाणपत्रासह विविध प्रक्रियांबाबत चौकशी करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात दोन बार अँड रेस्टॉरंट, एक बिअर शॉपी तसेच मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू विक्री होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता पालक व्यक्त करत आहेत. गावात प्रसिद्ध शेख फरीद दर्गा असल्याने विविध धर्मीय भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. त्यामुळे गावातील सामाजिक व धार्मिक वातावरणावर दारू विक्रीचा विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दारू विक्री केंद्रांना राज...
पत्रकार संरक्षण कायदा लागू न करण्यामागे सरकारची भीती काय? एस. एम. देशमुख यांचा सरकारला थेट सवाल

पत्रकार संरक्षण कायदा लागू न करण्यामागे सरकारची भीती काय? एस. एम. देशमुख यांचा सरकारला थेट सवाल

महाराष्ट्र
मुंबई | महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ले, जीवे मारण्याच्या धमक्या आणि अर्वाच्च शिवीगाळीच्या घटना सातत्याने वाढत असताना, सरकारने मंजूर झालेला पत्रकार संरक्षण कायदा अद्याप लागू का केला नाही, असा रोखठोक सवाल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी उपस्थित केला आहे. देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर २०१७ मध्ये पत्रकार संरक्षण विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाले. त्यानंतर २०१८ मध्ये राष्ट्रपतींची मंजुरी मिळून त्याचे कायद्यात रूपांतर झाले आणि भारत सरकारच्या राजपत्रातही तो प्रसिद्ध झाला. मात्र, राज्य सरकारने अद्याप अधिसूचना (Notification) जारी न केल्याने हा कायदा प्रत्यक्षात लागू झालेला नाही. त्यांच्या मते, कायदा लागू झाल्यास पत्रकारांवर हल्ला करणे, धमक्या देणे किंवा त्यांच्या ...
पत्रकारांना धमकी प्रकरणावर पत्रकार संघटनांचा संताप; संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी

पत्रकारांना धमकी प्रकरणावर पत्रकार संघटनांचा संताप; संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी

महाराष्ट्र
मुंबई | पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषद यांनी तीव्र निषेध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे. पत्रकारांनी त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यासाठी घरी भेट दिली असता, संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत, "पुन्हा आलात तर मारून टाकीन" अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही भाषा एका खासदाराला शोभणारी नसून लोकशाही आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात करणारी असल्याचे पत्रकार संघटनांनी म्हटले आहे. याशिवाय, "माझ्याकडे बॉम्ब आहे" आणि "मी पाच खून के...
महात्मा फुले वाड्यातील वटपूजनावरील निर्बंध मागे; पारंपरिक पूजेस हिरवा कंदील

महात्मा फुले वाड्यातील वटपूजनावरील निर्बंध मागे; पारंपरिक पूजेस हिरवा कंदील

महाराष्ट्र
पुणे | पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा परिसरातील वटवृक्षाच्या पूजनावर घालण्यात आलेले निर्बंध राज्य शासनाने मागे घेतले असून, यापुढे पूर्वीप्रमाणे वटपौर्णिमेनिमित्त पारंपरिक वटपूजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे वटसावित्री व्रत करणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, सुराज्य अभियान आणि रणरागिणी शाखा यांच्या शिष्टमंडळाने पुरातत्त्व विभाग, पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदने सादर करून निर्बंध मागे घेण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांनी खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवून महात्मा फुले वाडा राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्यापूर्वीपासून सुरू असलेल्या परंपरा आणि चा...
शेतकऱ्यांची चिंता मिटली; यंदापासून सरकारी सहाय्यकच करणार पीक पेरा नोंदणी

शेतकऱ्यांची चिंता मिटली; यंदापासून सरकारी सहाय्यकच करणार पीक पेरा नोंदणी

शेती
१५ जुलैपासून राज्यभर मोहिमेला प्रारंभ; शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन नांदेड | सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना यापुढे स्वतः ई-पीक पाहणी करण्याची गरज भासणार नाही. गेल्या काही वर्षांत ई-पीक पाहणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणी आणि कमी प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने यंदापासून पीक पाहणीची जबाबदारी थेट शासन नियुक्त सहाय्यकांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर ही मोहीम १५ जुलैपासून सुरू होणार आहे. ई-पीक पाहणी ही शासकीय योजना, पीक कर्ज, पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पिकांची अचूक नोंद असल्यास शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे सुलभ होते. नवीन निर्णयानुसार तहसीलदारांमार्फत नियुक्त करण्यात आलेले विशेष सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी...
खरीप पेरणीची घाई टाळा; ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा : तालुका कृषी अधिकारी

खरीप पेरणीची घाई टाळा; ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा : तालुका कृषी अधिकारी

शेती
शेतकऱ्यांना शास्त्रोक्त नियोजनाचे आवाहन; बीज उगवण चाचणी व बीज प्रक्रिया करण्याचा सल्ला नांदेड | खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, अर्धापूर यांनी केले आहे. परिसरात किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, जेणेकरून जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होऊन बियाण्यांची उगवण चांगली होईल आणि पिकांच्या सुरुवातीच्या वाढीस पोषक वातावरण मिळेल, असे त्यांनी सांगितले. हवामानातील सातत्याने होत असलेले बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या हवामान आधारित सल्ल्याचे पालन करावे. योग्य वेळी पेरणी केल्यास पिकांवरील जोखीम कमी होण्यास मदत होते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बीज उगवण चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. बियाण्यांची उगवण क्षमत...
नांदेड जिल्ह्यास चार दिवसांचा येलो अलर्ट; २५ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा

नांदेड जिल्ह्यास चार दिवसांचा येलो अलर्ट; २५ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्र
नांदेड | प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दि. २४ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजता जारी केलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. २४ ते २७ जून २०२६ या कालावधीत येलो (Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दि. २४, २६ व २७ जून रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दि. २५ जून रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांच्या कडकडाटावेळी घ्यावयाची खबरदारी वादळी पाऊस व ...
एल निनोच्या सावटाखाली खरीप हंगाम; शेतकऱ्यांना सावध पेरणीचा कृषी विभागाचा सल्ला

एल निनोच्या सावटाखाली खरीप हंगाम; शेतकऱ्यांना सावध पेरणीचा कृषी विभागाचा सल्ला

शेती
कमी पावसाच्या शक्यतेमुळे पीक नियोजन, आंतरपीक आणि जलसंधारणावर भर देण्याचे आवाहन नांदेड | यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असल्याने पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजनबद्ध शेती करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. कृषी विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय मुख्य पिकांची पेरणी टाळावी. किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करणे सुरक्षित ठरेल. अन्यथा उगवण कमी होऊन दुबार पेरणीचा आर्थिक फटका बसू शकतो. सोयाबीन उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना वाढते उत्पादन खर्च आणि हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी. तसेच...
error: Content is protected !!