राजकारण

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

देगलूर रुग्णालयासाठी २२.९७ कोटींचा निधी मंजूर; ‘श्रेय’च्या राजकारणाने वातावरण तापले

देगलूर रुग्णालयासाठी २२.९७ कोटींचा निधी मंजूर; ‘श्रेय’च्या राजकारणाने वातावरण तापले

राजकारण
नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उन्नतीसाठी २२.९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र या निर्णयानंतर ‘श्रेय’ कोणाचे, यावरून राजकीय वर्तुळात चांगलाच वाद रंगला असून वातावरण तापले आहे. या निधीतून देगलूर उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येणार असून, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे देगलूरसह परिसरातील ग्रामीण व सीमावर्ती भागातील रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा काही माध्यमांतून करण्यात आला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या दाव्याला देगलूरचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी ठाम विरोध ...
भोकर–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याविरोधात नागरिकांचा संताप

भोकर–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याविरोधात नागरिकांचा संताप

राजकारण
सुविधा नसताना वसुलीचा आरोप भोकर/हिमायतनगर| राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 अ वरील भोकर–हिमायतनगर मार्गाची दुरुस्ती न करता तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड न करताच सोनारी फाटा येथे टोल नाका सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूकदारांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची अवस्था दयनीय असूनही टोल आकारला जात आहे. काही ठिकाणी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून फोनपेच्या माध्यमातून पैसे मागितले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. तसेच या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना ‘चेकिंग’च्या नावाखाली त्रास दिला जात असल्याची तक्रारही पुढे आली आहे. स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. रस्ता दुरुस्त होईपर्यंत आणि प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध होईपर्यंत टोल वसुली ...
कंधार शहराच्या वैभवामध्ये भर पाडण्यासाठी सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करणार- आमदार प्रताप पाटील चिखलीकर

कंधार शहराच्या वैभवामध्ये भर पाडण्यासाठी सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करणार- आमदार प्रताप पाटील चिखलीकर

राजकारण
कंधार, सचिन मोरे| कंधार शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभीकरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला असून आगामी काळामध्ये शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे, वीर शिरोमणी महाराणा प्रताप या सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचे भव्य दिव्य स्वरूपात सुशोभीकरण करून कंधार शहराच्या वैभवात भर पडण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ४१.५१ लक्ष रुपये कामाचे सुशोभीकरण करणे या कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी दुपारी संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रामराव पवार,तहसीलदार रामेश्वर गोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय भो...
आ. चिखलीकरांच्या हस्ते ५०फूट उंचीच्या पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण

आ. चिखलीकरांच्या हस्ते ५०फूट उंचीच्या पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण

राजकारण
जिल्ह‌यातील सर्वात मोठे बुध्द विहार लोहयात साकारले जातेय लोहा | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लोहा शहरात उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते ५० फूट उंचीच्या पंचशील ध्वजाचे भव्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार चिखलीकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आज देश चालत असल्याचे सांगितले. त्यांच्या जयंतीनिमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. लोहा येथे उभारण्यात येत असलेले बुद्ध विहार जिल्ह्यातील सर्वात मोठे ठरेल, असा विश्वास व्यक्त करत या परिसराला धम्मविचारांचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. जुना शहर परिसरात बुद्ध विहारासमोर पंचशील ध्वजाचे ध्वजा...
शहीद जवान कामेश कदम यांचे स्मारक भावी पिढीसाठी प्रेरणादायी- आमदार चिखलीकर

शहीद जवान कामेश कदम यांचे स्मारक भावी पिढीसाठी प्रेरणादायी- आमदार चिखलीकर

राजकारण
कंधार (सचिन मोरे) कंधार येथे शहीद वीर जवान कामेश विठ्ठल कदम यांचा हुतात्मा स्मारक कंधार येथे त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या हिमतीने उभे केले असून हे स्मारक भावी पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असून, येणाऱ्या पिढीने कामेश कदम यांच्या विचाराचे अनुकरण करत देश सेवा करावी असे आवाहन लोहा कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी केले. कंधार शहराजवळील मुखेड- कंधार मुख्य रस्त्यावर शहीद कामेश विठ्ठलराव कदम यांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,आंबेडकरवादी मिशनचे संस्थापक डॉ.दीपक कदम, माजी नगरसेविका डॉ. करुणाताई जमदाडे, शहीद कामेश कदम चे वडील विठ्ठलराव कदम, मातोश्री सुनंदाताई कदम, नगर परिषदेचे उपाध्यक्ष मन्ना...
अनियमितता, भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे: खा. अशोकराव चव्हाण

अनियमितता, भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे: खा. अशोकराव चव्हाण

राजकारण
नांदेड|महाराष्ट्र विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या नांदेड जिल्हा पाहणी दौऱ्यात जिथे अनियमितता किंवा भ्रष्टाचार आढळला असेल तिथे संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. अंदाज समितीच्या दौऱ्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते. यावर खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, समितीने त्यांचा अहवाल नियमानुसार विधीमंडळाला सादर करून अनियमितता व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित करावी, कोणत्याही दोषी अधिकाऱ्याला किंवा गैरव्यवहाराला पाठीशी घालता कामा नये, हीच माझी भूमिका आहे. उलटपक्षी अंदाज समितीला आढळलेल्या गैरव्यवहारांची माहिती सार्वजनिक करणे शक्य असेल तर आम्ही सुद्धा आमच्या स्तरावर चौकशीसाठी पाठपुरावा करू. अंदाज समितीला आढळलेल्या प्रत्येक गैरव्यवहाराची सत्यता समोर आली पाह...
भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत; ४४ जिल्हा प्रभारींची नियुक्ती

भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत; ४४ जिल्हा प्रभारींची नियुक्ती

राजकारण
नांदेडची जबाबदारी सुनील राणेंकडे, संभाजीनगरसाठी संजय कौडगे नांदेड| आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यभर मोठा निर्णय घेत ४४ जिल्हा प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयानुसार नांदेड आणि बीड जिल्ह्यांची जबाबदारी सुनील दत्ताजी राणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी संजय कौडगे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने लवकरच पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान, जिल्हा प्रशिक्षण वर्ग, एसआयआर अभियान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय २६ एप्रिल रोजी मन की बात कार्यक्रमाचेही नियोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील इतर नियुक्त्यांमध्ये चैतन्य...
विमलबाई पाळजकर यांना मतदानाचा अधिकार: जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ठराव सर्वानुमते मंजूर

विमलबाई पाळजकर यांना मतदानाचा अधिकार: जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ठराव सर्वानुमते मंजूर

राजकारण
खडकी-घारापूर सेवा सहकारी सोसायटीचा महत्त्वाचा निर्णय हिमायतनगर (प्रतिनिधी ) खडकी-घारापूर सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार सौ.विमलबाई प्रकाशराव पाळजकर यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. हा ठराव सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. खडकी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत 13 संचालकांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत सर्व संचालकांनी एकमताने ठराव पारित करत विमलबाई पाळजकर यांच्यावर विश्वास व्यक्त केला. या बैठकीस चेअरमनसह संचालक मंडळातील शंकर सूर्यवंशी, श्रीनिवास शेट्टी, गजानन यलकदरे, मारोतराव शिंदे, शिवनंदा ताटीकुंडलवार, खंडू टेकाळे, शंकर जाधव, रामा हनवते, सतीश नारखेडे, देवराव पवार, विठ्ठल सूर्यवंशी, कैलास कंदनवार आदी उपस्थित होते. तसेच या निर्णयासाठी सरपंच संजय स...
महाराजस्व शिबिरातून जनतेच्या अडीअडचणींचा निपटारा – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

महाराजस्व शिबिरातून जनतेच्या अडीअडचणींचा निपटारा – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

राजकारण
लोहा| महाराष्ट्र शासनाच्या लोककल्याणकारी धोरणांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिरांमुळे नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा जागीच निपटारा होत असून अशा शिबिरांचा नागरिकांना मोठा फायदा होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. तालुक्यातील कापशी (बु.) येथे शुक्रवारी (दि. १० एप्रिल) हे शिबिर पार पडले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रेरणेने तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कंधार-दोनूर अनन्या रेड्डी आणि तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर होते. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासन अधिक गतिमान होण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता अधोरेखित केली. नागरिकांच्या अडीअडचणींचे तात्काळ निराकरण होत असल्याने वेळ व श्रम वाचतात...
नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजकारण
मुंबई| “नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची अपार शक्ती असून, त्याच्या सामूहिक जपातून विश्वशांती प्रस्थापित होण्यास निश्चितच मदत होईल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ कार्यक्रम वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास आचार्य परम सागर महाराज, निरंजन सागर महाराज, सौम्य सागर महाराज, मानव कोठारी, भगवत कोठारी, आशिष शहा यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय संस्कृती ही विश्वबंधुत्व आणि शांतीचा संदेश देणारी आहे. “जिओ आणि जीने दो” हा जैन तत्त्वज्ञानाचा मूलमंत्र असून, सर्व सजीवांना जगण्याचा अधिकार आहे, हा विचार जगासाठी मार्गदर्शक आहे. नवकार महामंत्र हा या मूल्यांना बळ देणारा असून त्याच्या जपातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नवकार मंत्राद्वारे आपण पं...
error: Content is protected !!