राजकारण

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजकारण
मुंबई| “नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची अपार शक्ती असून, त्याच्या सामूहिक जपातून विश्वशांती प्रस्थापित होण्यास निश्चितच मदत होईल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ कार्यक्रम वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास आचार्य परम सागर महाराज, निरंजन सागर महाराज, सौम्य सागर महाराज, मानव कोठारी, भगवत कोठारी, आशिष शहा यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय संस्कृती ही विश्वबंधुत्व आणि शांतीचा संदेश देणारी आहे. “जिओ आणि जीने दो” हा जैन तत्त्वज्ञानाचा मूलमंत्र असून, सर्व सजीवांना जगण्याचा अधिकार आहे, हा विचार जगासाठी मार्गदर्शक आहे. नवकार महामंत्र हा या मूल्यांना बळ देणारा असून त्याच्या जपातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नवकार मंत्राद्वारे आपण पं...
हिमायतनगर : नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; अभियंता देशपांडे यांच्याकडून पाहणी

हिमायतनगर : नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; अभियंता देशपांडे यांच्याकडून पाहणी

राजकारण
हिमायतनगर (अनिल  मादसवार) शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत दोन्ही बाजूने सुरू असलेल्या नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या तक्रारीची अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी या कामात अंदाजपत्रकाला बगल देत दर्जाहीन काम होत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार आज (दि. ९ एप्रिल) सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता श्री देशपांडे यांनी हिमायतनगर येथे प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तक्रारदार वामनराव पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून नालीचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार आणि दर्जेदार पद्धतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, वामनराव पाटील यांनी यापूर्वी झालेल्या निकृष्ट कामावर तीव्र नाराजी व्यक्त करत ते पूर्णपणे फ...
इनाम जमिनी, अतिक्रमित निवासी शासकीय जमिनी व सिडको घरांचा विषय मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन करा!

इनाम जमिनी, अतिक्रमित निवासी शासकीय जमिनी व सिडको घरांचा विषय मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन करा!

राजकारण
नांदेड| नांदेड शहर आणि जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या थेट घरांशी आणि जमिनींशी निगडित असलेल्या तीन महत्त्वाच्या विषयांसंदर्भात माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना पत्र लिहिले असून, ही कामे निश्चित कालमर्यादेत वेगाने पूर्ण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याची सूचना केली आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, इनाम जमिनी नियमित करून घेण्याबद्दल राज्य शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने नांदेड शहरातील विषय तातडीने मार्गी लावण्यात यावेत, अतिक्रमित निवासी शासकीय जमिनी नियमाकूल करण्यासंदर्भात शासनाने काढलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पुढील कार्यवाही सुरु करावी, तसेच दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या नांदेड शहर...
70 तासांत 5 खून; नांदेडमध्ये भीतीचे वातावरण, काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

70 तासांत 5 खून; नांदेडमध्ये भीतीचे वातावरण, काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राजकारण
नांदेड |  नांदेड शहरात अवघ्या 70 तासांत सलग पाच हत्यांच्या घटनांनी शहर अक्षरशः हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नांदेड काँग्रेस कमिटी आक्रमक झाली असून जिल्हाधिकारी Rahul Kardile यांना निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर शहरात अल्पावधीत घडलेल्या या हत्याकांडांमुळे नागरिकांमध्ये भीती व असुरक्षितता वाढली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारांच वाढत बळ असा गंभीर चित्र समोर आले आहे. याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ठोस मागण्या निवेदनाद्वारे केल्या असून, यात  अवैध धंद्यांवर तात्काळ बंदी, गुन्हेगार टोळ्यांवर कठोर कारवाई, नशाखोरीच्या अड्ड्यांचा बंदोबस्त, शहरात विशेष मोहीम राबवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवावे अश्या मागण्या करण्यात आल्या. या निवेदनावेळी का...
वाढत्या गुन्हेगारीवर जबाबदारी निश्चित करा; 72 तासांत 5 हत्यांवर खा. अशोकराव चव्हाण यांची तीव्र प्रतिक्रिया

वाढत्या गुन्हेगारीवर जबाबदारी निश्चित करा; 72 तासांत 5 हत्यांवर खा. अशोकराव चव्हाण यांची तीव्र प्रतिक्रिया

राजकारण
नांदेड | नांदेड शहरात गेल्या 72 तासांत सलग पाच हत्यांच्या घटनांनी खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत वाढत्या गुन्हेगारीसाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, शहरात अल्पावधीत इतक्या गंभीर घटना घडणे अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी, अगदी शासकीय रुग्णालय परिसरातही हत्यांसारख्या घटना घडत असतील, तर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सदर प्रकरणातील सर्व हत्याकांडांची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्य...
भाजपा स्थापना दिनाचा नांदेडमध्ये जल्लोष; खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन

भाजपा स्थापना दिनाचा नांदेडमध्ये जल्लोष; खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन

राजकारण
नांदेड| भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिनानिमित्त सोमवार, ६ एप्रिल रोजी नांदेड दक्षिण जिल्हा कार्यालयात उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. गांधी पुतळ्याजवळील भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रदेश उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख तसेच महापौर कविताताई मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक “वंदे मातरम्” गीताने झाली. या प्रसंगी डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या संकल्पनेतून पक्षाच्या ४६ वर्षांच्या प्रवासाचे दर्शन घडविणारी विशेष प्रदर्शनी भरविण्यात आली होती. या प्रदर्शनीचे उद्घाटनही अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. स्थापना दिनानिमित्त कार्यालयाची आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती. फटाक्यांची आतिषबाजी करून उपस्थित कार्यकर्त...
आ. प्रतापराव पाटील यांचे विकास व्हिजन; लोहा शहरात बदलाची नवी दिशा

आ. प्रतापराव पाटील यांचे विकास व्हिजन; लोहा शहरात बदलाची नवी दिशा

राजकारण
लोहा| लोहा नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शहराच्या विकासाला वेग आला असून विविध महत्त्वाचे प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या कामांमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज मुख्य चौकाचे सुशोभीकरण विशेष लक्षवेधी ठरत आहे. सुमारे ४० लाख रुपये खर्चून या चौकाचा कायापालट करण्यात येत असून, काम पूर्ण झाल्यानंतर हा चौक शहराच्या वैभवात भर टाकणारा ठरणार आहे. जुन्या लोहा शहरातील मस्जिद ते पूल हा प्रशस्त सिमेंट रस्ता पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेले भव्य बुद्ध विहार अंतिम टप्प्यात असून, स्वामी समर्थ मंदिर परिसरात एक कोटी रुपयांचे ‘नमो उद्यान’ साकारले जात आहे. शहरात प्रवेश करताना आकर्षक दिसणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवा ध्वज उभारण्यात येणार असून, अत्याधुनिक प्रकाशयोजनेमुळे संपूर्ण पर...
जवळगावकरांच्या कार्यनिष्ठेमुळे हिमायतनगरात काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य – राजेश पावडे

जवळगावकरांच्या कार्यनिष्ठेमुळे हिमायतनगरात काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य – राजेश पावडे

राजकारण
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कार्यनिष्ठा, जनसंपर्क आणि सातत्यपूर्ण कामामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला आजही अभेद्य राहिला आहे, असा ठाम विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी व्यक्त केला. तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आयोजित ‘सृजन संघटन अभियान’ बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पक्ष निरीक्षक मोहमद अरीफखान, जिल्हा उपाध्यक्ष नागराज सुलगेकर, उपाध्यक्ष तातेराव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी माहूरगड दत्त संस्थानचे महंत मधूसुदनजी भारती यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष पावडे यांचा सत्कार करण्यात आला. पावडे पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या ‘सृजन संघटन अभियान’ अंतर्गत संघटनात्मक बळकटीसाठी विशेष प्रयत्न सुरू असून पक्षश...
माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांचा पक्षप्रवेश शिवसेनेला ‘बळ’

माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांचा पक्षप्रवेश शिवसेनेला ‘बळ’

राजकारण
लोहा|शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस ते शिवसेना असा विविध टप्प्यांतून गेलेला माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचा शिवसेनेतील प्रवेश हा पक्षासाठी बळकटी देणारा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तब्बल बारा वर्षांनंतर त्यांच्या पुढाकाराने झालेल्या राजकीय मेळाव्यात धोंडगे बंधूंनी जमवलेली मोठी गर्दी त्यांच्या जनाधाराची साक्ष देणारी ठरली. सत्तेत किंवा कोणत्याही पदावर नसतानाही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांमुळे गावपातळीवर धोंडगे यांना मानणारा ठोस वर्ग असल्याचे स्पष्ट झाले. आगामी २०२९ मधील परिसीमन, महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे लोहा-कंधार मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर शिवराज धोंडगे यांच्या राजकीय पदार्पणानेही चर्चेला उधाण आले आहे. शंकरअण्णा धोंडगे हे शेतकरी संघटनेचे नेते शरद जो...
BSNL नेटवर्कसाठी दिल्लीत पाठपुरावा; ग्रामीण भागाला दिलासा मिळणार?

BSNL नेटवर्कसाठी दिल्लीत पाठपुरावा; ग्रामीण भागाला दिलासा मिळणार?

राजकारण
नांदेड/हिंगोली, अनिल मादसवार| हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या दूरसंचार सेवांमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया (Jyotiraditya Scindia) यांची भेट घेतली. या चर्चेत ग्रामीण भागातील BSNL नेटवर्कची अत्यंत दयनीय अवस्था मांडत, तात्काळ सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः नवीन मोबाईल टॉवर्स उभारणी, सिग्नलची गुणवत्ता वाढवणे आणि ग्राहकसंख्या वाढीसाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. सध्या अनेक गावांमध्ये कॉल ड्रॉप, इंटरनेट बंद पडणे आणि सिग्नल नसणे अशा समस्या कायम आहेत. यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीनंतर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची ...
error: Content is protected !!