Tag: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

शेती
'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा' तयार करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो' (El-Nino) या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी व संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व तातडीचे निर्देश दिले आहेत. राज्यात सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याची ४३.९८% तर सुक्या चाऱ्याची २५.१२% तूट असते. 'एल-निनो'मुळे पाऊस कमी झाल्यास ही तूट वाढण्याची भीती आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने 'जिल्हा नियोजन व विकास समिती' अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीसाठी निधीला प्राधान्य द्यावे. बियाणांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या चारा बियाणांचे का...
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरोग्य, महाराष्ट्र
मुंबई| जपानी मेंदूज्वरासारख्या धोकादायक संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करत या आजारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. २०१५-१६ दरम्यान देशातील इतर राज्यांत लसीकरण मोहीम सुरू असताना विदर्भातील काही जिल्ह्यांत जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर राज्यातही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. या उपाययोजनांमुळे सध्या रुग्णसंख्या जवळपास शून्यावर आली आहे. आजाराचे स्वरूप आणि धोका जपानी मेंदूज्वर हा डासांद्वारे पसरणारा गंभीर आजार असून तो मेंदूवर परिणाम करतो. यात झटके येणे, न्यू...
नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजकारण
मुंबई| “नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची अपार शक्ती असून, त्याच्या सामूहिक जपातून विश्वशांती प्रस्थापित होण्यास निश्चितच मदत होईल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ कार्यक्रम वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास आचार्य परम सागर महाराज, निरंजन सागर महाराज, सौम्य सागर महाराज, मानव कोठारी, भगवत कोठारी, आशिष शहा यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय संस्कृती ही विश्वबंधुत्व आणि शांतीचा संदेश देणारी आहे. “जिओ आणि जीने दो” हा जैन तत्त्वज्ञानाचा मूलमंत्र असून, सर्व सजीवांना जगण्याचा अधिकार आहे, हा विचार जगासाठी मार्गदर्शक आहे. नवकार महामंत्र हा या मूल्यांना बळ देणारा असून त्याच्या जपातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नवकार मंत्राद्वारे आपण पं...
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकासकामे; भव्य आयोजनाची ग्वाही

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकासकामे; भव्य आयोजनाची ग्वाही

धर्म अध्यात्म
नाशिक| पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला भव्य आणि अविस्मरणीय स्वरूप देण्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीच्या समारोपप्रसंगी तपोवन येथील श्री स्वामी नारायण मंदिरात ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांच्यासह विविध संत-महंत उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, कुंभ मेळा (Kumbh Mela) हा भारतीय अध्यात्मिक संस्कृतीचा सर्वात मोठा सोहळा असून, भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. नाशिक (Nashik) आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे होणाऱ्या या सोहळ्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत ...
अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश

अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश

शेती
नांदेड| अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान सहन करणाऱ्या अर्धापूरमधील १०२ शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत रोजगार हमी योजना विभागाला कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी अतिवृष्टीमुळे खचल्या किंवा बुजल्या होत्या. शासनाच्या विशेष मदत पॅकेजअंतर्गत मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज व पंचनामे पूर्ण केले होते. मात्र ‘मनरेगा’ योजना ग्रामीण भागापुरती मर्यादित असल्याने केवळ तांत्रिक कारणामुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. या अन्यायकारक परिस्थितीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण (Shrijaya Chavan) यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लक्ष वेधले. “नुकसान समान असताना केवळ प्र...
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत नांदेड परिक्षेत्र अव्वल

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत नांदेड परिक्षेत्र अव्वल

महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| राज्यात राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड पोलिस परिक्षेत्राने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या भरीव कामगिरीबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमाप यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. यावेळी नांदेड परिक्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही सादर करण्यात आली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व जनतेसाठी सुलभ करण्यावर भर देण्यात आला होता. नांदेड परिक्षेत्राने यामध्ये पुढाकार घेत ‘सरकार पोर्टल’, ई-ऑफिस प्रणाली, डेटा डॅशबोर्ड, सोशल मीडिया एकत्रीकरण, तसेच नागरिकांच्या तक्रारींच...
error: Content is protected !!