Tag: नांदेड जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचा धडाका; गुटखा, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थांसह लाखोंचा साठा जप्त

नांदेड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचा धडाका; गुटखा, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थांसह लाखोंचा साठा जप्त

क्राइम
तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभर विशेष मोहीम; प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावर कारवाई, अनेक दुकाने सील नांदेड | सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात धडक कारवाई मोहीम राबवत गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ आणि अन्य अन्नसाठ्यांवर मोठी कारवाई केली आहे. मागील आठवडाभर चाललेल्या या विशेष मोहिमेत लाखो रुपयांचा संशयित व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला असून अनेक प्रकरणांत गुन्हे दाखल करून दुकाने सील करण्यात आली आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. गोपनीय माहिती आणि नियमित तपासणीच्या आधारे जिल्ह्यात विविध भागांत अचानक छापे टाकण्यात आले. दि. २९ मे रोजी नांदेडच्या जुना मोंढा परिसरातील एम. ए. शरीफ या आस्थापनाची तप...
खरीपासाठी नांदेड जिल्ह्यात मुबलक खतसाठा उपलब्ध

खरीपासाठी नांदेड जिल्ह्यात मुबलक खतसाठा उपलब्ध

शेती
अफवांवर विश्वास ठेवू नका; गरजेनुसारच खत खरेदी करा – कृषी विभागाचे आवाहन नांदेड| खरीप हंगाम 2026 साठी नांदेड जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी खत टंचाईच्या भीतीपोटी अनावश्यक खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार, जमीन आरोग्य पत्रिकेच्या अहवालानुसार तसेच पिकांच्या वाढीच्या टप्प्यानुसार खतांचा वापर करावा, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. खत उपलब्धतेबाबत अफवा पसरवल्या जात असल्यास, जादा दराने विक्री, खतासोबत अन्य वस्तूंची सक्ती (लिंकिंग) किंवा बोगस खतांची विक्री आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खरीप हंगामात खत ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची कृषी निविष्ठा मानली जाते. राज्यस्तरावर कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून खत नियोजन केले जाते. नांदेड जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2026 मध्ये सुमारे 2 ...
ऑपरेशन क्रॅकडाऊनचा जबरदस्त दणका! नांदेड जिल्ह्यात मटका-जुगार अड्ड्यांवर एलसीबीची तुफान कारवाई

ऑपरेशन क्रॅकडाऊनचा जबरदस्त दणका! नांदेड जिल्ह्यात मटका-जुगार अड्ड्यांवर एलसीबीची तुफान कारवाई

क्राइम
१५ आरोपी जाळ्यात, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड, विशेष प्रतिनिधी| नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मटका-जुगार अड्ड्यांवर मोठा घाव घातला आहे. नांदेडच्या शिवाजीनगर भागात दोन आणि हिमायतनगर परिसरात एक अश्या तीन ठिकाणी एकाचवेळी धाड टाकत तब्बल १५ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, १ लाख ३० हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू असून, मटका-जुगार, अंमली पदार्थ, धारदार शस्त्रे आणि बेकायदेशीर व्यवहारांवर पोलिसांनी कडक नजर ठेवली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधार...
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात विशेष चारा सुरक्षा आराखडा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात विशेष चारा सुरक्षा आराखडा

शेती
नांदेड| यंदाच्या मान्सूनवर ‘एल-निनो’चा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग सतर्क झाले आहेत. जिल्ह्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्यात येत आहे. पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या निर्देशानुसार हा आराखडा राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. धरणांच्या गाळपेरा क्षेत्रात तसेच नदीकाठच्या जमिनींवर विशेष चारा लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. टंचाईच्या काळात चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी यासाठी मुरघास प्रकल्पांना गती देण्यात येणार असून, चारा साठवणुकीवरही भर दिला जाणार आहे. पशुपालकांसाठी चारा साक्षरता अभियान राबवून कडबा...
नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी ५१.५८ कोटींचा कृती आराखडा

नांदेड जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी ५१.५८ कोटींचा कृती आराखडा

महाराष्ट्र
पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासन सज्ज नांदेड| जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन सन २०२५-२६ या कालावधीसाठी व्यापक कृती आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला असून जानेवारी ते मार्च २०२६ आणि एप्रिल ते जून २०२६ या कालावधीसाठी एकूण सुमारे ५१.५८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हास्तरावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामीण व शहरी भागासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार ग्रामीण भागासाठी २४.१७ दलघमी, नांदेड महानगरपालिका क्षेत्रासाठी ४९.०४ दलघमी, तर नगर परिषद क्षेत्रासाठी २६.७६१ दलघमी असे एकूण ९९.९७१ दलघमी पाणी विविध धरणे व जलाशयांमध्ये आरक्षित करण्यात आले आहे. पाणी टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात...
error: Content is protected !!