लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

सामाजिक क्रांतीचे अग्रदूत – महात्मा बसवेश्वर

सामाजिक क्रांतीचे अग्रदूत – महात्मा बसवेश्वर

लेख
​भारतात जे अनेक समाजसुधारक व धर्मसंस्थापक होऊन गेले त्यामध्ये महात्मा बसवेश्वर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. देशातील जाती व्यवस्था, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता इत्यादी वाईट प्रथा परंपरांवर अत्यंत मार्मिक भाषेत प्रहार करून श्रम प्रतिष्ठा व जाती धर्मातील भिंती पाडून सर्वांना एकत्रित आणून लिंगायत धर्माची स्थापना करणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा लेख.  महात्मा बसवेश्वर यांचा जन्म २६ एप्रिल ११०५ रोजी तत्कालीन मंगळवेढा राज्य व सध्याच्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यामधील बागेवाडी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मादराज व आईचे नाव मादलांबिका होते. बसवेश्वर हे त्यांच्या आई-वडिलांचे तिसरे अपत्य होते. बसवेश्वर यांना बसव, बसवण्णा असे ही संबोधले जाते. महात्मा बसवेश्वर हे त्यांच्या आठव्या वर्षी ज्ञान मिळवण्याकरिता कृष्णा...
नारी शक्ती वंदन :लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात

नारी शक्ती वंदन :लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात

लेख
भारताच्या लोकशाही प्रवासातील काही क्षण केवळ कायदेशीर बदल नसतात, तर ते एका नव्या युगाची नांदी ठरतात. नवीन संसद भवनात पहिले विधेयक म्हणून सादर झालेला 'नारी शक्ती वंदन अधिनियम' हा असाच एक आश्वासक टप्पा आहे. २८ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीने या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. आजपासून (१६ एप्रिल २०२६) सुरू होणारे संसदेचे तीन दिवसीय विशेष सत्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. हे केवळ धोरणात्मक पाऊल नसून, निम्म्या लोकसंख्येला 'धोरणकर्ते' म्हणून मुख्य प्रवाहात आणणारे 'संविधानिक अधिष्ठान' आहे. महिला आरक्षणाचा प्रवास जवळपास तीन दशकांचा आहे. १९९६ मध्ये सुरू झालेला हा संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महिलांच्या हाती 'कायदेशीर सत्ता' देण्याचे महत्त्वपूर्ण काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्ण करत आहे. हा कायदा केवळ ३३%...
रेणापूरकरर्स नेक्सस स्पोर्ट्स अकॅडमी; क्रीडा क्षेत्रात आदर्शवत वाटचाल”

रेणापूरकरर्स नेक्सस स्पोर्ट्स अकॅडमी; क्रीडा क्षेत्रात आदर्शवत वाटचाल”

लेख
जिद्द, धाडस आणि यश.. अमृताताईंची क्रीडा क्षेत्रात प्रेरणादायी झेप केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबनाची संधी मिळत असून अनेक महिला उद्योग-व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. नांदेड येथील श्रीमती अमृता रेणापूरकर या अशाच यशस्वी महिला उद्योजिकांपैकी एक आहेत. पारंपरिक व्यवसायाच्या चौकटीत न अडकता त्यांनी वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. धाडस, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी आपल्या व्यवसायात उल्लेखनीय यश मिळवले आहे. अनेक महिलांनी पारंपरिक व्यवसायाची निवड केली असताना अमृता रेणापूरकर यांनी वेगळा मार्ग स्वीकारत नवीन संधी शोधल्या आणि त्या यशस्वीपणे साध्य केल्या. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्या केवळ स्वतःपुरत्याच...
कन्यादान योजनेतून सामूहिक विवाह सोहळा : खर्चात बचत, समाजात ऐक्याची भावना

कन्यादान योजनेतून सामूहिक विवाह सोहळा : खर्चात बचत, समाजात ऐक्याची भावना

लेख
कन्यादान योजना : सामूहिक विवाहातून आर्थिक दिलासा आणि सामाजिक परिवर्तन राज्यातील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील विवाहाचा वाढता आर्थिक बोजा लक्षात घेऊन शासनाने कन्यादान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देत खर्चात बचत आणि सामाजिक समता निर्माण करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न केला जात आहे. 🔸 योजनेचे स्वरूप - समाजातील गरजू कुटुंबांना विवाहासाठी मोठा खर्च करावा लागू नये, यासाठी विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांमार्फत सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांना शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे कमी खर्चात विधीवत विवाह पार पाडणे शक्य होते. 🔸 अटी व शर्ती - या योजनेचा लाभ प्रामुख्याने अनुसूचित जाती (नवबौद्धांसह) तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत मागासवर्गीय कुटुंबांना दिला जातो. सामूहिक विवाहात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना अ...
“चळवळीतील उपेक्षित बाप माणूस – बसवंतराव मुंडकर”

“चळवळीतील उपेक्षित बाप माणूस – बसवंतराव मुंडकर”

लेख
“चळवळीतील उपेक्षित बाप माणूस – बसवंतराव मुंडकर”हे पुस्तक वाचनात आले, आणि मी बिलोलीच्या आठवणीत कितीतरी वेळ हरवून गेले. हे पुस्तक केवळ एका व्यक्तीचे चरित्र नाही, तर एका काळाचा, एका विचाराचा आणि एका निःस्वार्थ जीवनतत्त्वज्ञानाचा साक्षीदार आहे. कै. बसवंतराव मुंडकर यांचे व्यक्तिमत्त्व वाचताना आपण एखाद्या साध्या माणसात दडलेला असामान्य तेज अनुभवतो. कै. बसवंतराव मुंडकर हे नाव मोठ्या पदांमुळे किंवा प्रसिद्धीमुळे गाजलेले नाही; उलट त्यांच्या कार्याची खरी उंची त्यांच्या साधेपणात, प्रामाणिकपणात आणि निःस्वार्थ वृत्तीत दिसून येते. त्यांनी कधीही स्वतःच्या कार्याचा गाजावाजा केला नाही, पण समाजासाठी जगण्याची त्यांची वृत्ती प्रत्येक पानातून ठळकपणे जाणवते. म्हणूनच ते “किंग” नव्हे, तर “किंग मेकर” होते—इतरांना घडवणारे, प्रेरणा देणारे. शालेय जीवनापासूनच त्यांच्यातील नेतृत्वगुण स्पष्ट दिसतात. गोवा मुक्ती संग्राम...
मूक वेदनेपासून स्वाभिमानापर्यंत : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली स्त्री मुक्ती

मूक वेदनेपासून स्वाभिमानापर्यंत : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली स्त्री मुक्ती

लेख, स्थानिक
भारतीय समाजजीवनाच्या प्रदीर्घ इतिहासात स्त्रीच्या वाट्याला अनेकदा अंधारच आला. तिच्या हातात कर्तव्यांची ओझी होती, पण अधिकारांची शिदोरी नव्हती. तिच्या डोळ्यांत स्वप्ने होती; परंतु त्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी आकाश नव्हते. तिच्या कुशीत संसार जन्म घेत होता, पण तिच्या स्वतःच्या जीवनाला सन्मानाचे स्थान दिले जात नव्हते. कधी परंपरेच्या नावाखाली, कधी धर्माच्या नावाखाली, तर कधी समाजव्यवस्थेच्या कठोर चौकटीत स्त्रीला केवळ सहन करणे, गप्प राहणे आणि आयुष्यभर झिजत राहणे— एवढेच जणू तिच्या वाट्याला आले होते. शतकानुशतके चालत आलेल्या या मूक वेदनेने तिच्या अस्तित्वावर जणू सावली टाकली होती. अशा या वेदनांनी व्यापलेल्या काळात एक महामानव उभा राहिला—भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी स्त्रीच्या डोळ्यांतले अश्रू पाहिले आणि त्या अश्रूंमागची असह्य वेदना ओळखली. त्यांनी स्त्रीकडे दयेने नव्हे, तर न्यायाच...
महिला आर्थिक विकास महामंडळ ; महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

महिला आर्थिक विकास महामंडळ ; महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

लेख
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण आणि अंगीकृत उपक्रम असून, महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. २४ फेब्रुवारी १९७५ रोजी महिला सक्षमीकरणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या महामंडळाची स्थापना करण्यात आली. पुढे २० जानेवारी २००३ रोजी माविमला महिला विकासासाठी राज्यस्तरीय “शिखर संस्था” म्हणून मान्यता देण्यात आली. माविम केंद्र व राज्य शासनाच्या विविध महिला सक्षमीकरण योजनांची राज्यस्तरीय नोडल एजन्सी म्हणून अंमलबजावणी करते. तसेच शासन विभाग, वित्तीय संस्था, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसहाय्य गट यांच्यात समन्वय साधून एक मजबूत दुवा म्हणून कार्य करते. माविमचे मुख्यालय मुंबई येथे असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्याची कार्यालये कार्यरत आहेत. माविमचे ध्येय व उद्दिष्टे- माविमचे मुख्य ध्येय म्हणजे निरंतर विकास प्रक्रियेद्वारे महिलांसाठी सामाजिक, आर्थिक व राजन...
बाबासाहेबांचे संविधान म्हणजे…एकसंघ भारताची पोलादी चौकट

बाबासाहेबांचे संविधान म्हणजे…एकसंघ भारताची पोलादी चौकट

लेख
14 एप्रिल हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्र शासन तसेच देशातील विविध संस्थांकडून त्यांच्या कार्याचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. 'विश्वरत्न', 'भारतरत्न', 'घटनाकार” आणि 'भारत भाग्यविधाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ राष्ट्र म्हणून बांधून ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य केले.त्यामुळेच त्यांच्या जयंती दिनी संपूर्ण देशात त्यांना आदरांजली व्यक्त केली जाते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतची जनता आजच्या दिवशी महामानवापुढे नतमस्तक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान व त्यावर आधारित लोकशाही जोपर्यंत भारतात आहे, एकसंघ भारतासाठी कायद्याची पोलादी चौकट कायम आहे.त्यांना आ...
तेजस्वी वारसा जपणारे — शंतनू डोईफोडे

तेजस्वी वारसा जपणारे — शंतनू डोईफोडे

लेख
मराठवाड्याच्या पत्रकारितेच्या विश्वात परंपरा, विचारसंपन्नता आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालणारी काही मोजकीच व्यक्तिमत्त्वे ठळकपणे उठून दिसतात. त्या परंपरेचा तेजस्वी वारसा जपणारे आणि त्यात स्वतःच्या कर्तृत्वाची नवी भर घालणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री शंतनू सुधाकरराव डोईफोडे होय. प्रगल्भ आणि प्रतिभावंत पत्रकार म्हणून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, त्या सुधाकररावजी डोईफोडे यांच्या संस्कारक्षम घरात जन्म घेणे ही केवळ योगायोगाची गोष्ट नसून, ती एक जबाबदारीची आणि प्रेरणेची परंपरा आहे. या परंपरेचा वारसा केवळ जपणे नव्हे, तर त्याला आधुनिक काळाशी सुसंगत अशी दिशा देणे, हे आव्हान शंतनू डोईफोडे यांनी समर्थपणे स्वीकारले आहे. त्यांच्या कार्यातून ही परंपरा अधिक व्यापक, अधिक प्रभावी आणि अधिक अर्थपूर्ण होताना दिसते. सुधाकरराव डोईफोडे यांनी आपल्या धारदार लेखणीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य के...
सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

लेख
भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे. महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्...
error: Content is protected !!