हिमायतनगर तालुक्यात डिझेल टंचाईचे संकट; पेरणीपूर्वी शेतकरी चिंतेत

नांदेड | नांदेड जिल्ह्यात सध्या डिझेल टंचाईची समस्या गंभीर होत असून, याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. पेरणीचा हंगाम तोंडावर असताना ट्रॅक्टर, पाण्याचे पंप आणि मशागतीची कामे डिझेलअभावी ठप्प होण्याची वेळ आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आधीच कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आता डिझेल टंचाईचे नवे आव्हान उभे राहिले आहे. शेतीच्या वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी त्रस्त असताना आवश्यक इंधन उपलब्ध होत नसल्याने अनेक कामांवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

याबाबत युवा शेतकरी श्रीदत्त पवार पाटील सोनारीकर यांनी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधत डिझेल पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली आहे. “बळीराजा जगला तरच देश जगेल,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे.

Oplus_16908288

दरम्यान, सोशल मीडियावरही या मागणीला मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक शेतकरी व नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!