Tag: ₹4 हजार द्या…

₹4 हजार द्या… मगच पाणी कनेक्शन घ्या?” — हिमायतनगरात नळजोडणीवर विना पावती वसुलीचा आरोप

₹4 हजार द्या… मगच पाणी कनेक्शन घ्या?” — हिमायतनगरात नळजोडणीवर विना पावती वसुलीचा आरोप

महाराष्ट्र
पाणीपुरवठा योजना जनतेसाठी की ठेकेदार–पदाधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी? नागरिकांमध्ये संताप; ₹22 लाखांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात नव्याने सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घरगुती नळ कनेक्शन देताना प्रत्येक लाभार्थ्याकडून तब्बल ₹4,000 रोख रक्कम घेतली जात असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, रक्कम भरल्याशिवाय खोदकाम, जोडणी अथवा पुढील प्रक्रिया होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे शासनाची पाणीपुरवठा योजना नागरिकांसाठी आहे की काहींच्या आर्थिक फायद्यासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. हिमायतनगर शहराची कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी सुमारे सात–आठ वर्षांपूर्वी 19 कोटींपेक्षा अधिक निधीची नळयोजना मंजूर करण्यात आली होती. मात्र कामाच्या संथ गतीमुळे आणि दर्जाबाबत यापूर्वी झालेल्या आरोपांमुळे ही योजना अनेकदा चर्चेत राहिली. एवढा...
error: Content is protected !!