सिमेंटच्या जंगलात हरवत चालले नांदेडचे ‘वसंतराव नाईक उद्यान’!
विकासाच्या घोषणांत हिरवाईचा बळी; झाडे तहानलेली, प्रशासन मात्र आश्वासनांत रमलेले
नांदेड,गोविंद मुंडकर| एकेकाळी "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" अशी संस्कृती जपणाऱ्या महाराष्ट्रात आता "सिमेंटवल्ली आम्हा विकासचरे" अशी नवी परंपरा सुरू झाली की काय, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती नांदेडमध्ये निर्माण झाली आहे. कारण शहरातील नागरिकांचा श्वास मानले जाणारे वसंतराव नाईक उद्यान आज स्वतःच श्वासासाठी धडपडत आहे.
नागरिकांच्या आरोग्याचे, पर्यावरणाचे आणि भावी पिढ्यांच्या हरित भवितव्याचे स्वप्न पाहत वसंतराव नाईक सोसायटीने ही प्रशस्त जागा उद्यानाच्या संरक्षण व विकासासाठी महानगरपालिकेकडे सुपूर्द केली होती. मात्र संरक्षण झाले की उपेक्षा, हा प्रश्न आज या उद्यानात पाऊल ठेवताच पडतो.
स्वातंत्र्य सैनिक नगर, शोभा नगर, वसंतराव नाईक नगर परिसरातील हजारो नागरिक रोज सकाळ-संध्याकाळ येथे फिरण्यासाठी येतात. पण त्यांचे...
