कर्जमाफीत मोठा दिलासा! ५० हजारांची अट रद्द; २ लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' अंतर्गत कर्जमाफीच्या लाभासाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करण्यात आल्याची घोषणा विधानसभेत केली. त्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, या योजनेद्वारे राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी, व्यापारी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माहितीनुसार ही योजना राबविण्यात येत आहे.
२ लाखांपेक्षा जास्त थकबाकीदारांनाही दिलासा
पूर्वी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता. मात्र नव्या निर्णयानुसार अशा शेतकऱ्यांना...

