मराठवाडा महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकतो : ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी
जलसंपदा, शेती, उद्योग आणि पर्यटनाची सांगड घालण्याची गरज; एसआरटीएम विद्यापीठात विशेष व्याख्यान
नांदेड | मराठवाड्याकडे सुपीक जमीन, जलसंपदा, कुशल मनुष्यबळ, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनाची मोठी क्षमता असून कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान आणि वारसा पर्यटन यांची प्रभावी सांगड घातल्यास हा प्रदेश महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा सिंचन प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) माधव भंडारी यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्ययन केंद्रातर्फे डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘मराठवाडा : काल, आज व उद्या’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. भंडारी यांनी आपल्या व्याख्यानात सा...

