बाबा… तुमच्यासाठी! : कुटुंब संस्थेच्या पुनर्जागरणातून संस्कारित राष्ट्रनिर्मितीचा संकल्प
"राष्ट्र संसदेत घडत नाही; ते प्रत्येक घरात घडते. आणि घर घडते ते आईच्या मायेने, वडिलांच्या त्यागाने आणि संस्कारांच्या अखंड परंपरेने."
आज भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, अवकाश संशोधन, अर्थव्यवस्था आणि डिजिटल क्रांती यांमध्ये भारताने अभूतपूर्व प्रगती केली आहे. परंतु या विकासाच्या प्रवासात एक प्रश्न सातत्याने अस्वस्थ करतो—ज्यांच्या खांद्यावर उद्याचा भारत उभा राहणार आहे, त्या पिढीचे चारित्र्य कोण घडविणार?
उत्तर स्पष्ट आहे—कुटुंब संस्था.
कुटुंब ही केवळ रक्ताच्या नात्यांची चौकट नाही; ती संस्कृतीचा श्वास आहे, मूल्यांचे विद्यापीठ आहे आणि राष्ट्रनिर्मितीची पहिली प्रयोगशाळा आहे. म्हणूनच मानवी इतिहासात राज्य, न्याय, शिक्षण किंवा अर्थव्यवस्था यांच्याही आधी कुटुंब संस्थेचा जन्म झाला.
मानवाने भटक्या जीवनातून स्थिर जीवनाकडे वाटचाल केली, शेतीचा...

