Tag: नागरिक संतप्त

खड्ड्यांतून प्रवास, टोल मात्र कायम! महामार्गावर झाडे नसल्याने नागरिक संतप्त

महाराष्ट्र
हिमायतनगर/भोकर (प्रतिनिधी) एकीकडे खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि दुसरीकडे सुरूच असलेली टोल वसुली… यामुळे वाहनधारकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. सरसम म्हसोबा नाण्यापासून पुढे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी खोल खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक बनला आहे. अपघातांचा धोका वाढला असतानाही संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. वाहनधारकांच्या मते, रस्त्याची दुरुस्ती न करता टोल वसुली सुरू ठेवणे हा सरळसरळ अन्याय आहे. “सुविधा शून्य, शुल्क पूर्ण” अशी परिस्थिती निर्माण झाली असून, रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. दरम्यान, भोकर–हिमायतनगर (१६१ ए) राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. रुंदीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली; मात्र त्यानंतरची वृक्षलागवड आणि संगोपन पूर्णपणे फसल्याचे दिसून येत आहे. परिणामी...
‘गुणवत्तेचा बळी’ की विकासाचा दिखावा? जि.प. बांधकाम विभागातील मनमानीवर नागरिक संतप्त

‘गुणवत्तेचा बळी’ की विकासाचा दिखावा? जि.प. बांधकाम विभागातील मनमानीवर नागरिक संतप्त

महाराष्ट्र
हिमायतनगर| जिल्हा परिषद बांधकाम उत्तर विभागात प्रभारी कार्यकारी अभियंत्यांच्या कारकिर्दीत विकासकामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निकृष्ट कामे, अंदाजपत्रकाकडे दुर्लक्ष आणि कंत्राटदारांच्या मर्जीप्रमाणे सुरू असलेल्या कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. नियमित कार्यकारी अभियंत्यांची बदली झाल्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांकडे सूत्रे गेल्यापासून कामांच्या दर्जात लक्षणीय घसरण झाल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. रस्ते व इतर बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता खालावलेली असताना, कंत्राटदारांची बिले मात्र मंजूर झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण व सिमेंटीकरण अपूर्ण असतानाही कामे पूर्ण दाखवून आर्थिक व्यवहार उरकले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. परिणामी, कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळत नसल्याची तीव...
error: Content is protected !!