Tag: नागरिक त्रस्त

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मंगरूळमधील नागरिक त्रस्त

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मंगरूळमधील नागरिक त्रस्त

सामाजिक
जीवितहानीची वाट पाहताय का? हिमायतनगर | तालुक्यातील मौजे मंगरूळ गावातील विद्युत समस्यांकडे महावितरण प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, एखाद्याचा जीव गेल्यानंतरच उपाययोजना केली जाणार का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. मंगरूळ येथील रहिवासी गंगाधर पुंजाराम पांडलवाड यांनी उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभागीय कार्यालय हिमायतनगर यांच्याकडे विविध विद्युत कामांसंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला आहे. पांडलवाड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ऑक्टोबर 2025 पासून संबंधित कामांसाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, आजपर्यंत कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत 16 एप्रिल रोजी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनासही बाब आणून द...
हिमायतनगरात तीव्र पाणीटंचाई; नागरिक त्रस्त, लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचा आरोप

हिमायतनगरात तीव्र पाणीटंचाई; नागरिक त्रस्त, लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचा आरोप

महाराष्ट्र, सामाजिक
लोकप्रतिनिधींना जबाबदारीची जाणीव करून देणारी वामन पाटील यांची पोस्ट चर्चेत हिमायतनगर,अनिल मादसवार | शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत. तब्बल ४४ अंश सेल्सिअस तापमानात पाण्याअभावी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वॉर्डमध्ये अद्यापही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत लोकप्रतिनिधींना जाब विचारला आहे. नगरपंचायत प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच आमदार-खासदार यांनी तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करत “जनतेची सेवा करण्यासाठीच आपणास निवडून दिले आहे; कृपया जबाबदारीची जाणीव ठेवा,” अशी साद त्यांनी घातली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, काही भागात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा ...
असरजन नाका–वाघाळा रस्ता खड्डेमय; वर्षभरापासून नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी

असरजन नाका–वाघाळा रस्ता खड्डेमय; वर्षभरापासून नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी

सामाजिक
नांदेड (प्रतिनिधी)मनपा हद्दीतील असरजन नाका ते वाघाळा दरम्यानचा रस्ता ड्रेनेज लाईनच्या कामामुळे पूर्णतः नादुरुस्त झाला असून गेल्या वर्षभरापासून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. खड्डेमय रस्ता, चिखल आणि अडकणारी वाहने यामुळे परिसरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रभाग क्रमांक २० मधील त्रिमूर्ती नगर, विठ्ठल नगर, साईबाबा नगर आणि श्रीराम नगर या भागात जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. या परिसरात पोलीस कर्मचारी, डॉक्टर तसेच सैन्यदलातील जवानांचे कुटुंबीय वास्तव्यास असूनही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ड्रेनेज काम अपूर्ण; रस्ता अधांतरी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ता मधोमध खोदण्यात आला; मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे, तर अनेक ठिकाणी कनेक्शनही देण्यात आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे ...
error: Content is protected !!