पेरणीपूर्वी बियाण्यांची चाचणी करा; दुबार पेरणीचे संकट टाळा
कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन, उगवण क्षमता तपासूनच पेरणीचा निर्णय घ्या
नांदेड, अनिल मादसवार| खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांनी घरचे किंवा बाजारातून खरेदी केलेले बियाणे थेट पेरणीसाठी न वापरता त्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. कमी पाऊस, बदलते हवामान आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची गुणवत्ता तपासणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या हंगामात पावसाचे अनिश्चित स्वरूप लक्षात घेता एकदाच योग्य पेरणी होणे महत्त्वाचे आहे. निकृष्ट किंवा कमी उगवणक्षम बियाण्यामुळे रोपांची संख्या घटते, दुबार पेरणीचा खर्च वाढतो आणि उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी साध्या पद्धतीने बियाण्यांची चाचणी करून त्यांचा दर्जा निश्चित करावा, असे कृषी विभागाने म्हटले आहे.
गोण...
