“महिलांच्या हक्कांना विरोध करणाऱ्यांना जनता उत्तर देईल” — डॉ. सान्वी जेठवाणी
नांदेड| देशातील महिलांना अधिक राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी केंद्र सरकारने मांडलेले संविधान (१३१वा दुरुस्ती) विधेयक, २०२६ लोकसभेत आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्यामुळे अपयशी ठरले आहे. या विधेयकाद्वारे महिलांसाठी आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकसभेची सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव होता.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सान्वी जेठवाणी यांनी स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले की, “महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या या ऐतिहासिक विधेयकाला विरोध करणे म्हणजे महिलांच्या हक्कांनाच विरोध करणे आहे. अशा प्रवृत्तीला जनता निश्चितच उत्तर देईल.”
डॉ. जेठवाणी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर टीका करत म्हटले की, “काँग्रेस आणि त्यांचे नेतृत्व महिलांच्या सक्षमीकरणाबाबत केवळ बोलते, पण प्रत्यक्ष कृतीत मात्र ते अपयशी ठरते. या विधेयकाला विरोध करून त्यांनी महिलांना ...
