Tag: जीवघेण्या उष्णतेपासून बचावासाठी

उष्माघात : जीवघेण्या उष्णतेपासून बचावासाठी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

उष्माघात : जीवघेण्या उष्णतेपासून बचावासाठी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

लेख
राज्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट सुरू असून नांदेडसह अनेक भागांमध्ये तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात (Heat Stroke) होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही एक गंभीर वैद्यकीय अवस्था असून वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. उष्माघात म्हणजे काय? उष्माघात ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढते आणि शरीराला स्वतःचे तापमान नियंत्रित करता येत नाही. सामान्यतः शरीर घामाद्वारे थंड होते, मात्र उष्माघातात ही प्रक्रिया अयशस्वी ठरते. उष्माघाताची लक्षणे उष्माघात झालेल्या व्यक्तीत खालील लक्षणे दिसून येतात: त्वचा लाल, गरम व कोरडी होणे श्वास घेण्यास त्रास चक्कर येणे, थकवा मळमळ, उलट्या तीव्र डोकेदुखी हृदयाचे ठोके वेगाने वाढणे गोंधळ, चिडचिडेपणा प्रमुख कारणे ...
error: Content is protected !!