Tag: कंधार

कंधार शहराच्या वैभवामध्ये भर पाडण्यासाठी सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करणार- आमदार प्रताप पाटील चिखलीकर

कंधार शहराच्या वैभवामध्ये भर पाडण्यासाठी सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करणार- आमदार प्रताप पाटील चिखलीकर

राजकारण
कंधार, सचिन मोरे| कंधार शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभीकरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला असून आगामी काळामध्ये शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे, वीर शिरोमणी महाराणा प्रताप या सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचे भव्य दिव्य स्वरूपात सुशोभीकरण करून कंधार शहराच्या वैभवात भर पडण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ४१.५१ लक्ष रुपये कामाचे सुशोभीकरण करणे या कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी दुपारी संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रामराव पवार,तहसीलदार रामेश्वर गोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय भो...
मुलाच्या मृत्यूच्या विरहात चार तासातच बापही गतप्राण.!

मुलाच्या मृत्यूच्या विरहात चार तासातच बापही गतप्राण.!

सामाजिक
कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यातील फुलवळ येथील हुसेन काशीमसाब निछलकर वय ४३ वर्ष यांचे अल्पशा आजाराने ता. १ एप्रिल रोज बुधवारी दुपारी २ वाजता दुःखद निधन झाले. त्याचे दुःख अनावर झाल्याने थकलेला बाप काशीम लालासाब निछलकर वय ७० वर्ष हे मुलाच्या मृत्यूच्या विरहात अवघ्या चार तासांतच म्हणजेच ठीक ६ वाजता गतप्राण झाले असल्याने फुलवळ गावावर शोककळा पसरली आहे. फुलवळ येथील हुसेन निछलकर यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालखीची असताना देखील मोठ्या धैर्याने ते संकटाशी सामना करत आपल्या कुटुंबाचे पालन पोषण हे रात्रंदिवस काबाड कष्ट करीत करत होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या आजारावर बरेच दिवस झाले उपचार चालूच होता. असे असताना देखील त्यांनी हिम्मत न हरता परिस्थितीला सामोरे गेले पण आज अचानक वडील व मुलाचा मृत्यू झाल्यामुळे निछलकर कुटुंबीयांवर फार मोठे संकट कोसळले. या कुटुंबियांना राज...
बोगस भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याविरोधातील उपोषण स्थगित; प्रशासनाचे लेखी आश्वासन

बोगस भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याविरोधातील उपोषण स्थगित; प्रशासनाचे लेखी आश्वासन

करियर
नांदेड| बोगस नोकरभरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याविरोधात सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले. 81 वर्षीय संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव गणपतराव कदम यांच्या उपोषणासमोर प्रशासन झुकल्याचे चित्र पाहायला मिळाले. श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, कंधारचे अध्यक्ष व्यंकटराव कदम यांनी 23 मार्चपासून 17 मागण्यांसह दोन प्रमुख मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. यामध्ये बोगस नोकरभरती, बदली व पदोन्नती रद्द करणे, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे तसेच बोगस शालार्थ आयडी रद्द करून शासनाचे नुकसान वसूल करण्याची मागणी होती. प्रशासनाचे लेखी आश्वासन - 27 मार्च रोजी सायंकाळी शिक्षणाधिकारी (नियोजन) दिलीप रावजी बनसोडे यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यांशी चर्चा झाली. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित संस्थेतील अनियमिततेबाबत अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सादर केल...
error: Content is protected !!