हिमायतनगर तालुका कृषी विभागाच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप; निकृष्ट बियाणे, मार्गदर्शनाचा अभाव आणि विविध योजनांतील गैरव्यवहाराचे गंभीर आरोप
कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे आर्थिक संकटात सापडून एखाद्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्यास जबादार कोण??
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या निष्क्रिय कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निकृष्ट बियाणे, वेळेवर न मिळणारे अहवाल, मार्गदर्शन शिबिरांचा अभाव आणि शासकीय योजनांतील कथित गैरव्यवहारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळं तालुका कृषी अधिकारी व कृषी दुकानदार यांनी मिलिभगत करून शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारली गेली कि काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका कृषी अधिकारी व गुण नियंत्रण अधिकारी यांनी हिमाय...
