मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा
इतिहास जागरासाठी लोकप्रतिनिधी व अध्यात्मिक गुरुंच्या पुढाकाराची गरज
नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहीर केलेला उपक्रम हा नक्कीच दूरदृष्टीचा आणि प्रेरणादायी आहे. मात्र, अशा उपक्रमांचा प्रभाव केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता तो समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, हीच खरी गरज आहे.
आजची तरुण पिढी माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असली तरी आपल्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांविषयी तिची जाणीव अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येते. विशेषतः मराठवाडा मुक्ती संग्रामासारखा स्वातंत्र्यलढा जो अन्याय, दडपशाही आणि रजाकारांच्या अत्याचाराविरुद्ध उभ्या राहिलेल्या जनतेच्या एकजुटीचा सर्वोच्च नमुना होता तो नव्या पिढीपर्यंत सखोलपणे पोहोचणे अत्यावश्यक आहे.
या संग्रामात असंख्य ज्ञात-अज्...
