Tag: नांदेड

दिव्यांगांच्या रखडलेल्या मानधनासाठी राहुल साळवे यांचा आंदोलनाचा इशारा

दिव्यांगांच्या रखडलेल्या मानधनासाठी राहुल साळवे यांचा आंदोलनाचा इशारा

सामाजिक
नांदेड| संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे रखडलेले मानधन तात्काळ जमा करावे, अन्यथा ८ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात साळवे यांनी म्हटले आहे की, नांदेड शहर व जिल्ह्यातील काही निवडक लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून १५ ते २० दिवसांपूर्वी मानधन जमा करण्यात आले असले, तरी अनेक दिव्यांग बांधवांना अद्यापही ही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत असून, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रखडलेले मानधन तात्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, तसेच या विलंबाची सखोल चौकशी करून भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समितीने केली आह...
नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयात दिव्यांगांसाठी ‘शाईन विथ ॲबिलिटी’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात

नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयात दिव्यांगांसाठी ‘शाईन विथ ॲबिलिटी’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात

सामाजिक
नांदेड| दिव्यांगांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी या उद्देशाने शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय, नांदेड येथे 28 मार्च 2026 रोजी ‘शाईन विथ ॲबिलिटी’ या शीर्षकाखाली विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वीणा पाटील या होत्या. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. छाया पोटे यांनी जबाबदारी सांभाळली. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद, नांदेड येथील समाज कल्याण अधिकारी श्री. सत्येंद्र आवुलवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात श्री. आवुलवार यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शासकीय योजना, विविध सवलती तसेच करिअरच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन करत सकारात्मक दृष्टिकोन...
एका दिवसात 500 विनातिकीट प्रवासी पकडले

एका दिवसात 500 विनातिकीट प्रवासी पकडले

महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार | प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने 26 मार्च 2026 रोजी व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवली. सकाळी 6 ते सायंकाळी 8 या कालावधीत झालेल्या या कारवाईत तब्बल 500 अनधिकृत प्रवासाची प्रकरणे उघडकीस आली असून एकूण ₹3,42,580 इतकी वसुली करण्यात आली. या विशेष मोहिमेवर सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश कुमार सिंह यांनी देखरेख ठेवली. 28 तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी 25 गाड्यांमध्ये सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान 449 विनातिकीट प्रवाशांकडून ₹2,14,410 भाडे आणि ₹1,15,190 दंड वसूल करण्यात आला. तसेच 15 अनियमित प्रवास प्रकरणांतून ₹3,730 भाडे व ₹3,750 दंड वसूल झाला. याशिवाय 36 अनबुक्ड सामान प्रकरणांतून ₹5,500 रक्कम वसूल करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नेहमी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि सोबतचे सामान नियमां...
गोदावरी पात्रात अवैध वाळू उपशावर पोलिस-महसूलचा संयुक्त ‘धडक’ छापा

गोदावरी पात्रात अवैध वाळू उपशावर पोलिस-महसूलचा संयुक्त ‘धडक’ छापा

क्राइम
नांदेड| नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलिस व महसूल विभागाने संयुक्तरित्या मोठी कारवाई करत तब्बल 90 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत ही कारवाई राबविण्यात आली. उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, नायगाव तालुक्यातील इज्जतगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता, नदीपात्रातून लोखंडी फावड्यांच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालात 60 लोखंडी फावडी बोट – अंदाजे किंमत ₹20 लाख 30 ...
बोगस भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याविरोधातील उपोषण स्थगित; प्रशासनाचे लेखी आश्वासन

बोगस भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याविरोधातील उपोषण स्थगित; प्रशासनाचे लेखी आश्वासन

करियर
नांदेड| बोगस नोकरभरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याविरोधात सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले. 81 वर्षीय संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव गणपतराव कदम यांच्या उपोषणासमोर प्रशासन झुकल्याचे चित्र पाहायला मिळाले. श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, कंधारचे अध्यक्ष व्यंकटराव कदम यांनी 23 मार्चपासून 17 मागण्यांसह दोन प्रमुख मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. यामध्ये बोगस नोकरभरती, बदली व पदोन्नती रद्द करणे, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे तसेच बोगस शालार्थ आयडी रद्द करून शासनाचे नुकसान वसूल करण्याची मागणी होती. प्रशासनाचे लेखी आश्वासन - 27 मार्च रोजी सायंकाळी शिक्षणाधिकारी (नियोजन) दिलीप रावजी बनसोडे यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यांशी चर्चा झाली. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित संस्थेतील अनियमिततेबाबत अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सादर केल...
नांदेडजवळ कामठा येथे पोलीस उप महानिरीक्षक उमाप यांच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड

नांदेडजवळ कामठा येथे पोलीस उप महानिरीक्षक उमाप यांच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड

क्राइम
नांदेड| नांदेड शहराजवळील गाडेगाव रोडवरील कामठा गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 41 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 11.47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उप महानिरीक्षकांना ‘खबर’ हेल्पलाइनवरून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार 27 मार्च रोजी पथकाने कामठा परिसरात जगनलाल देविलाल यादव यांच्या जागेवरील टिनशेडमध्ये सुरू असलेल्या ‘पपलू’ नावाच्या जुगारावर छापा टाकला. या धाडीत आरोपींकडून: ₹1,50,950 रोकड, 37 मोबाईल फोन, 12 मोटारसायकली असा एकूण ₹11,47,950 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 112/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सपोनि संतोष ज...
पाच निवडणुकांत शिवसेनेला टक्कर देणारे शंकरअण्णा धोंडगे आता भगव्या वाटेवर

पाच निवडणुकांत शिवसेनेला टक्कर देणारे शंकरअण्णा धोंडगे आता भगव्या वाटेवर

राजकारण
नांदेड| राजकारणात बदल हा शाश्वत असतो, याची प्रचिती पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. तब्बल पाच विधानसभा निवडणुकांत शिवसेनेविरुद्ध लढत देणारे ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे आता शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. २९ मार्च रोजी लोहा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन बांधणार आहेत. नव्वदच्या दशकात “भीक नको, हवे घामाचे दाम” या घोषणेने राज्यभर आंदोलने उभारणारे शंकरअण्णा धोंडगे हे शरद जोशी (Sharad Joshi) यांच्या विचारातून घडलेले नेते. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर संघर्ष करत अनेकदा जेलही भोगली. प्रभावी वक्तृत्व आणि शेतकऱ्यांशी असलेला थेट संवाद यामुळे त्यांनी मोठा कार्यकर्ता वर्ग तयार केला. १९९५ पासून कंधार विधानसभा मतदारसंघात त्यांनी अपक्ष आणि नंतर विविध पक्षांतून निवडणुका लढवत शिवसेनेशी थेट मुकाबला केला. त्या क...
नांदेडमध्ये प्रथमच शिवकालीन सुवर्ण होन, नाणी व शस्त्रांचे भव्य प्रदर्शन

नांदेडमध्ये प्रथमच शिवकालीन सुवर्ण होन, नाणी व शस्त्रांचे भव्य प्रदर्शन

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड शहरात इतिहासप्रेमींसाठी एक खास पर्वणी ठरणारे शिवकालीन सुवर्ण होन (सोन्याचे नाणे), प्राचीन नाणी व शस्त्रांचे भव्य प्रदर्शन प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. नांदेड किल्ल्याचे किल्लेदार व नांदेड किल्ला संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येत आहे. हे प्रदर्शन शुक्रवार, दि. ३ एप्रिल ते रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नंदगिरी किल्ला, होळी परिसर, नवा मोंढा, नांदेड येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात शिवरायांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेले दुर्मिळ सुवर्ण होन (सोन्याची नाणी) तसेच चक्रधर संग्रहालय, चिखली (बुलडाणा) येथील सुमारे ६०० प्राचीन नाण्यांचा अनमोल संग्रह पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच महावली शहाजी राजे भोसले ऐतिहासिक वस्तू जतनवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ऐतिहासिक शस्त्रांचेही वि...
हरवलेलं सोनं परत; प्रामाणिकपणाने जिंकली मने

हरवलेलं सोनं परत; प्रामाणिकपणाने जिंकली मने

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण हिमायतनगर येथे पाहायला मिळाले. बोऱगडी येथील शेतकरी प्रभू शेणेवाड यांची हरवलेली सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे परत देत काही तरुणांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी शेतकरी प्रभू शेणेवाड यांनी हिमायतनगर येथील प्रतिष्ठित व्यापारी संदीप पळशीकर यांच्या अभिषेक ट्रेडिंग कंपनी येथे कापूस विक्रीसाठी नेला होता. त्या गडबडीत त्यांची 1 तोळा वजनाची सोन्याची अंगठी हरवली. बराच शोध घेतल्यानंतरही अंगठी सापडत नसल्याने त्यांनी ती हरवली असे गृहित धरले होते. दरम्यान, हिमायतनगर येथे वाहन भरताना रमेश बनसोडे यांच्यासोबत काम करणाऱ्या फकीरा सोळंके यांना ती अंगठी सापडली. कोणत्याही मोहाला बळी न पडता त्यांनी तत्काळ प्रामाणिकपणा दाखवत संबंधित शेतकऱ्याचा शोध घेत अंगठी परत केली. ...
आईच्या कष्टांना यशाची किनार

आईच्या कष्टांना यशाची किनार

रोजगार/सरकारी योजना, स्थानिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | जिद्द, चिकाटी आणि आईच्या कष्टांचे मोल जाणणाऱ्या मुलाची कहाणी म्हणजे सरसम बु. येथील रोहित संदीप बिच्चेवार यांचे यश होय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रोहित यांनी नांदेड जिल्हा पोलीस भरतीत उल्लेखनीय यश मिळवले असून त्यांच्या निवडीमुळे गावासह परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर घरावर दुःखाचे सावट आले होते. मात्र या कठीण काळात त्यांच्या आईने हार न मानता कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. “मुलांना शिकवून मोठे करायचे” या निर्धाराने त्यांनी रोहितला सतत प्रेरणा दिली. आईचे कष्ट आणि संघर्ष पाहून रोहित यांनीही स्वतःला अभ्यास व मैदानी चाचण्यांसाठी पूर्णतः झोकून दिले. या अथक परिश्रमाचे फळ मिळत रोहित यांची नांदेड जिल्हा पोलीस दलात निवड झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील आणि काका यांना दिले आहे. रोहितच्या या य...
error: Content is protected !!