अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
१०९८ हेल्पलाईनवर कळवा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली| येत्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये, यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास १०९८ या निशुल्क हेल्पलाईनवर त्वरित कळवावे, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय २१ वर्षां...


