Tag: हिंगोली

अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

सामाजिक
१०९८ हेल्पलाईनवर कळवा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हिंगोली| येत्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये, यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास १०९८ या निशुल्क हेल्पलाईनवर त्वरित कळवावे, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय २१ वर्षां...
भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत; ४४ जिल्हा प्रभारींची नियुक्ती

भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत; ४४ जिल्हा प्रभारींची नियुक्ती

राजकारण
नांदेडची जबाबदारी सुनील राणेंकडे, संभाजीनगरसाठी संजय कौडगे नांदेड| आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यभर मोठा निर्णय घेत ४४ जिल्हा प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयानुसार नांदेड आणि बीड जिल्ह्यांची जबाबदारी सुनील दत्ताजी राणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी संजय कौडगे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने लवकरच पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान, जिल्हा प्रशिक्षण वर्ग, एसआयआर अभियान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय २६ एप्रिल रोजी मन की बात कार्यक्रमाचेही नियोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील इतर नियुक्त्यांमध्ये चैतन्य...
नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी धडक मोहीम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी धडक मोहीम

क्राइम
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले असून, अवघ्या १५ दिवसांत ८१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ७१ गुन्हे दाखल करून तब्बल १ कोटी १९ लाख ९५ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ही व्यापक मोहीम राबविण्यात आली. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात कडक कारवाई करण्यात आली. जिल्हानिहाय कारवाई : नांदेड : २८ गुन्हे, ३१ आरोपी अटक, ₹३१.७० लाखांचा मुद्देमाल परभणी : १३ गुन्हे, १८ आरोपी अटक, ₹९.२० लाखांचा मुद्देमाल हिंगोली : ११ गुन्हे, ७ आरोपी अटक, ₹८.५७ लाखांचा मुद्देमाल लातूर : १९ गुन्हे, २५ आरोपी अटक, ₹७०.४७ लाखांच...
error: Content is protected !!