केळी उत्पादकांच्या संतापाचा उद्रेक; भावघसरणीमुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव, बाजार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
नांदेड, प्रतिनिधी| केळीच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, न्याय्य भाव मिळावा आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीला आळा बसावा यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना बाजारात केळीला मिळणारा भाव मात्र कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चही निघत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा वाढला असून, केळी बागा टिकवणेही कठीण झाले आहे.
यावेळी शेतकरी शिष्टमंडळाने केळी दर नियंत्रणासाठी स्वतंत्र जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी, व्यापारी आणि दलालांच्या व्यवहारात पारदर्शकता आणावी, तसेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी केली. शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले की, दर ठरविताना शे...
