पावसाने फिरवली पाठ; हिमायतनगरात खरीप धोक्यात, कृषी विभागाच्या भूमिकेवरही शेतकऱ्यांचा संताप
उगवलेली पिके करपू लागली; बोगस बियाण्यांच्या संशयाने शेतकरी हवालदिल
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात पावसाने अचानक दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून, उगवलेली पिके करपू लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून समाधानकारक पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आणि हळद पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. वेळेत पाऊस झाला नाही तर हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
मान्सूनच्या सुरुवातीला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र दोन-तीन दिवसांच्या हलक्या सरींनंतर पावसाने पाठ फिरवली. परिणामी जमिनीतील ओलावा संपत चालला असून, अनेक शेतांमध्ये उगवलेली रोपे करपू लागली आहेत. हलक्या जमिनीवरील पिकांची अवस्था सर्वाधिक गंभीर आहे. ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण असून, अनेक ठिकाणी शेतकरी पावसासा...
