Tag: तीव्र पाणीटंचाई

हिमायतनगरात तीव्र पाणीटंचाई; नागरिक त्रस्त, लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचा आरोप

हिमायतनगरात तीव्र पाणीटंचाई; नागरिक त्रस्त, लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचा आरोप

महाराष्ट्र, सामाजिक
लोकप्रतिनिधींना जबाबदारीची जाणीव करून देणारी वामन पाटील यांची पोस्ट चर्चेत हिमायतनगर,अनिल मादसवार | शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत. तब्बल ४४ अंश सेल्सिअस तापमानात पाण्याअभावी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वॉर्डमध्ये अद्यापही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत लोकप्रतिनिधींना जाब विचारला आहे. नगरपंचायत प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच आमदार-खासदार यांनी तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करत “जनतेची सेवा करण्यासाठीच आपणास निवडून दिले आहे; कृपया जबाबदारीची जाणीव ठेवा,” अशी साद त्यांनी घातली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, काही भागात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा ...
भोकर तालुक्यातील जाकापुरमध्ये तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांची प्रशासनाकडे धाव

भोकर तालुक्यातील जाकापुरमध्ये तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांची प्रशासनाकडे धाव

सामाजिक
नांदेड/भोकर | भोकर तालुक्यातील जाकापुर येथे भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. विहिरी कोरड्या पडल्या असून पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. ग्रामस्थांना रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी जागरण करावे लागत असून, अनेकांना लांब अंतर पायपीट करून केवळ एक घागर पाणी मिळवावे लागत आहे. महिलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर याचा सर्वाधिक परिणाम होत असून, दैनंदिन गरजाही भागवणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती 2026 मध्येही कायम असल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना एवढा संघर्ष करावा लागणे ही गंभीर बाब असल्याची बाब सोशल मीडियाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न श्रीधर जाधव यांनी केला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ टँकरद्वारे प...
error: Content is protected !!