कोट्यवधींच्या नाल्यांचा भोंगळ कारभार उघड; अल्प पावसातच घाण पाणी वस्तीत, महामार्ग विभागाविरोधात संताप!
हिमायतनगर परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातून गेलेल्या धानोडा भोकर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील कथित निकृष्ट दर्जाचा कारभार आता नागरिकांच्या आरोग्यावर बेतू लागला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले नाले अल्पशा पावसातच फेल ठरत असून, नाल्यांतील घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी थेट शहरातील सखल वस्त्यांमध्ये घुसत आहे. त्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेसह गंभीर आरोग्य धोक्याचा सामना करावा लागत आहे.
शहराच्या दोन्ही बाजूंना बांधण्यात आलेल्या नाल्यांमध्ये पाण्याचा उतार, नैसर्गिक प्रवाह आणि जलनिस्सारणाचा कोणताही शास्त्रीय विचार न करता मनमानी पद्धतीने काम करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते उलट वस्त्यांमध्ये साचत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, याच निकृष्ट कामाविरो...
